शहरं
Join us  
Trending Stories
1
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
2
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
4
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
5
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
6
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
7
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
8
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
9
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
10
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
11
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
12
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा
13
Nashik Crime: टोळी संघर्षातून गोळीबार, भाजप नेत्यानंतर म्होरक्या विकी वाघसह साथीदार अडकला जाळ्यात
14
रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्यामागचं 'गंभीर' कनेक्शन; जाणून घ्या सविस्तर
15
Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर
16
रशियाकडून पाकिस्तानला फायटर जेट इंजिनचा पुरवठा? काँग्रेसच्या दाव्यावर भाजपचा पलटवार...
17
आधार अपडेटसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, देशभरातील 6 कोटी मुलांना होणार फायदा
18
Nashik Kumbh Mela: सिंहस्थ कुंभमेळ्यात 'गुगल' दाखवणार गर्दीतून वाट; अडीच हजार CCTV ची शहरावर नजर
19
गुडन्यूज! ५८व्या वर्षी दुसऱ्यांदा बाबा झाला अरबाज खान, पत्नी शूराने दिला गोंडस बाळाला जन्म
20
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 

अतिवृष्टीचा तडाखा! मराठवाड्यात पावसाने घेतला ३४ जणांचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 11:50 IST

लहान, मोठी मिळून ३५१ जनावरे गेली वाहून

औरंगाबाद : मराठवाड्यात ८ ते १५ जुलै दरम्यान झालेल्या जोरदार पावसाने ३४ जणांचा बळी घेतला असून, लहान-मोठी मिळून ३५१ जनावरे पुरात वाहून गेली आहेत. मृत व्यक्तींमध्ये वीजपडून २४ जण, तर पुरात वाहून नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. ८ जुलैपासून मराठवाड्यात सूर्यदर्शन नव्हते. १५ जुलै रोजी दुपारनंतर ढगाळ वातावरणात बदल झाला. सूर्यदर्शन झाल्यामुळे हवेतील गारवा थोड्या प्रमाणात कमी झाला.

विभागातील आठ जिल्ह्यांत २५१ दुधाळ जनावरे दगावली आहेत, तर ओढकाम करणारी १३६ जनावरे दगावली आहेत. २६ मृतांच्या नातेवाइकांना एसडीआरएफच्या निकषाप्रमाणे एक कोटी चार लाख रुपयांचे वाटप करण्यात आल्याचा अहवाल विभागीय प्रशासनाने दिला आहे. ६० हजार हेक्टरपेक्षा अधिक पिकांचे नुकसान झाले असून, पंचनाम्यांचे कामही जिल्हाप्रशासन पातळीवर सुरू असल्याची माहिती प्रशासनाने कळविली आहे.

मागील सात दिवसांतील जोरदार पावसाने ३९० गावांना पुराचा वेढा पडला. यात हिंगोलीतील ६२, नांदेडमधील ३१०, बीडमधील १, लातूरमधील ८, उस्मानाबादमधील दोन गावांचा समावेश आहे. या दोन दिवसांत १६० मोठी, तर ३० लहान जनावरे दगावली आहेत, तर ६० हजार हेक्टर खरिपाची पिके पाण्याखाली आहेत. मराठवाड्यात ८ जुलैपासून जोरदार पाऊस सुरू होता. १५ जुलै रोजी पावसाने उघडीप दिली.

जिल्हा--- मृत्यूऔरंगाबाद--९जालना --७परभणी --१नांदेड --१०बीड --२लातूर --४उस्मानाबाद-- १एकूण-- ३४

टॅग्स :RainपाऊसMarathwadaमराठवाडाAurangabadऔरंगाबादDeathमृत्यू