शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
2
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
3
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
4
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
5
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
6
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
7
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
8
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
9
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
10
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
11
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
12
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
13
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
14
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
15
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
16
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
17
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
18
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
19
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
20
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश

अतिवृष्टीचा तडाखा! मराठवाड्यात पावसाने घेतला ३४ जणांचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 11:50 IST

लहान, मोठी मिळून ३५१ जनावरे गेली वाहून

औरंगाबाद : मराठवाड्यात ८ ते १५ जुलै दरम्यान झालेल्या जोरदार पावसाने ३४ जणांचा बळी घेतला असून, लहान-मोठी मिळून ३५१ जनावरे पुरात वाहून गेली आहेत. मृत व्यक्तींमध्ये वीजपडून २४ जण, तर पुरात वाहून नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. ८ जुलैपासून मराठवाड्यात सूर्यदर्शन नव्हते. १५ जुलै रोजी दुपारनंतर ढगाळ वातावरणात बदल झाला. सूर्यदर्शन झाल्यामुळे हवेतील गारवा थोड्या प्रमाणात कमी झाला.

विभागातील आठ जिल्ह्यांत २५१ दुधाळ जनावरे दगावली आहेत, तर ओढकाम करणारी १३६ जनावरे दगावली आहेत. २६ मृतांच्या नातेवाइकांना एसडीआरएफच्या निकषाप्रमाणे एक कोटी चार लाख रुपयांचे वाटप करण्यात आल्याचा अहवाल विभागीय प्रशासनाने दिला आहे. ६० हजार हेक्टरपेक्षा अधिक पिकांचे नुकसान झाले असून, पंचनाम्यांचे कामही जिल्हाप्रशासन पातळीवर सुरू असल्याची माहिती प्रशासनाने कळविली आहे.

मागील सात दिवसांतील जोरदार पावसाने ३९० गावांना पुराचा वेढा पडला. यात हिंगोलीतील ६२, नांदेडमधील ३१०, बीडमधील १, लातूरमधील ८, उस्मानाबादमधील दोन गावांचा समावेश आहे. या दोन दिवसांत १६० मोठी, तर ३० लहान जनावरे दगावली आहेत, तर ६० हजार हेक्टर खरिपाची पिके पाण्याखाली आहेत. मराठवाड्यात ८ जुलैपासून जोरदार पाऊस सुरू होता. १५ जुलै रोजी पावसाने उघडीप दिली.

जिल्हा--- मृत्यूऔरंगाबाद--९जालना --७परभणी --१नांदेड --१०बीड --२लातूर --४उस्मानाबाद-- १एकूण-- ३४

टॅग्स :RainपाऊसMarathwadaमराठवाडाAurangabadऔरंगाबादDeathमृत्यू