शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
7
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
8
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
9
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
10
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
11
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
12
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
13
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
14
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
15
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
16
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
17
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
18
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
19
विना नंबरप्लेटच्या भरधाव पोर्शे गाडीने तरुण तरुणीला उडवले; दोघांचा जागीच मृत्यू, पुण्यातील घटना
20
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती

मराठवाड्यातील १६४ मंडळांत अतिवृष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 7:13 AM

मुसळधार पावसामुळे तीन जिल्ह्यांतील पिके धोक्यात

औरंगाबाद : मराठवाड्यातील १६४ मंडळांमध्ये १०० मि.मी.,पेक्षा जास्तीचा पाऊस झाल्यामुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान होण्याचे संकट उभे राहिले आहे. तीन जिल्ह्यांतील पिके अतिरिक्त पावसामुळे धोक्यात आली असून, काही जिल्ह्यांमध्ये अजूनही दमदार पावसाची अपेक्षा आहे. १६ आॅगस्टपासून सुरू झालेल्या पावसामुळे हिंगोली, नांदेड, परभणी जिल्ह्यांतील खरीप हंगामातील पिकांचा नाश होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.हिंगोलीतील ३० पैकी १९ मंडळांत १०० मि.मी. पेक्षा अधिक पाऊस झाला आहे. त्यामुळे त्या मंडळांतर्गत येणाऱ्या खरीप पिकांची शेती पाण्याखाली आली आहे. परभणी जिल्ह्यातील ३९ पैकी १३ मंडळांत पावसाने हाहाकार उडविला आहे, तर नांदेड जिल्ह्यातील ८० पैकी ५० मंडळांत १०० मि.मी. पेक्षा जास्तीचा पाऊस झाल्यामुळे तेथील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याबाबत जिल्हा प्रशासनाला विभागीय प्रशासनाने आदेश दिले आहेत.औरंगाबादमधील ६५पैैकी १६ मंडळांत जालन्यातील ४९ पैकी १९ मंडळांत १०० मि.मी. पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. या दोन्ही जिल्ह्यांत पावसाची अपेक्षा असून खरीप हंगामाच्या पिकांना त्याची गरज आहे. बीडमधील ६३ पैकी १७ मंडळांत अतिवृष्टी नोंदविली गेली आहे, तर लातूरमधील ५३ पैकी २२ आणि उस्मानाबादमधील ४२ पैकी ८ मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. त्यामुळे ५ जिल्ह्यांत खरीप हंगामाला पावसाची गरज आहे. आजवर ५९ टक्के पावसाची नोंद मराठवाड्यात झाली आहे.खरीप हंगामात ९ हजार कोटींची गुंतवणूकमराठवाड्याचे खरीप पिकांखालील क्षेत्र ४९ लाख ११ हजार हेक्टर असून, त्यापैकी ४४ लाख १९ हजार हेक्टरवर पेरणी झालेली आहे. हेक्टरनिहाय पीकपेरणीच्या खर्च सूत्रानुसार अंदाज बांधला, तर खरीप हंगामात नांगरणी, पेरणी, मजुरी, बियाणे, खतांच्या खरेदीसाठी करण्यात आलेली अंदाजे ९ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झालेली आहे.

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबाद