शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

हर्सूल जलशुद्धिकरण केंद्राचे काम संथगतीने; पूर्णत्वासाठी आता १५ फेब्रुवारीचा नवीन मुहूर्त

By मुजीब देवणीकर | Updated: January 24, 2024 19:07 IST

साडेतीन कोटी रुपये खर्च करून हर्सूल येथे नवीन जलशुद्धिकरण केंद्र उभारण्यात येत आहे.

छत्रपती संभाजीनगर : दरवर्षी उन्हाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागतो. २०२४ चा उन्हाळा सुसह्य व्हावा म्हणून मनपाने जटवाडा रोडवर हर्सूल तलावाजवळ साडेतीन कोटी रुपये खर्च करून नवीन जलशुद्धिकरण केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला. दिवाळीपूर्वी हे काम पूर्ण होईल, असे जाहीर करण्यात आले होते. प्रत्यक्षात नवीन वर्षे सुरू झाले तरी काम पूर्ण झाले नाही. आता मनपाने १५ फेब्रुवारीचा मुहूर्त काढला आहे.

उन्हाळ्यात दरवर्षी जुन्या आणि नवीन शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण होते. त्यामुळे हर्सूल तलावातून अतिरिक्त पाणी वापरण्याचा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने मागील वर्षीच स्वतंत्र जलवाहिनी सुद्धा टाकून दिली. हर्सूलच्या जलशुद्धिकरण केंद्रात हे पाणी येत आहे. जलशुद्धिकरण केंद्रात ५ एमएलडी पाण्यावर प्रक्रिया होऊ शकते. याच ठिकाणी १० एमएलडी क्षमतेचे जलशुद्धिकरण केंद्र उभारण्यास तातडीने मंजुरी दिली. ७.५ दलघमी क्षमतेच्या फिल्टर प्लँट उभारण्यासाठी ३ कोटी ४७ लाख रुपये खर्च होणार आहेत. व्ही. आर. महाजन या कंत्राटदार एजन्सीमार्फत काम सुरू आहे. नवीन जलशुद्धिकरण केंद्रामुळे जुन्या शहरातील १४ वॉर्डांना मुबलक प्रमाणात पाणी मिळेल. दररोज १० एमएलडी पाणीपुरवठा या केंद्रातून करता येईल.

मागील वर्षीचा पाऊस, अवकाळी पावसामुळे हर्सूल तलावात मुबलक प्रमाणात पाणी आहे. मे किंवा जून महिन्यापर्यंत पुरेल एवढे पाणी सध्या तलावात आहे. नवीन जलशुद्धिकरण केंद्र उभारणीस बराच विलंब होत आहे. सर्व काम आरसीसीत असल्याने विलंब होत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. आठ महिन्यांत हे केंद्र पूर्णपणे तयार होणे अपेक्षित होते. आता मनपाने कंत्राटदाराला १५ फेब्रुवारीची डेडलाईन दिली आहे. त्यापूर्वी टेस्टिंग होणे आवश्यक आहे.

छोटी-छोटी कामे बरीच शिल्लकइनलेट चेंबर, चॅनल फ्लश मिक्सर, वॉटरपंपचे स्लॅब आदी अनेक गोष्टी एकमेकांशी निगडित आहेत. ही कामे लवकरात लवकर व्हावीत यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. १५ फेब्रुवारीचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून काम सुद्धा केले जात आहे. याला विलंब झाला तरी दोन चार दिवस मागे पुढे होऊ शकते.- के. एम. फालक,कार्यकारी अभियंता, मनपा.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी