शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
2
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
3
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
4
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
5
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
6
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...
7
"या हॉटेलवर डॉक्टर तरुणीला का बोलावलं होतं?"; सुषमा अंधारे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे नाव घेत काय म्हणाल्या?
8
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
9
Orkla India IPO च्या जीएमपीमध्ये मोठी तेजी; 'या' तारखेपासून लावू शकणार बोली, केव्हा होणार लिस्टिंग?
10
वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईकसाठी बांगलादेशात 'पायघड्या'; भारतात आहे MOST WANTED
11
ढासू परतावा...! ₹100 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, 5 वर्षांती दिला 6455% परतावा; आता रेल्वेकडून मिळाली मोठी ऑर्डर
12
Mumbai Pune Mumbai 4: स्वप्नील-मुक्ताची जोडी पुन्हा एकत्र, 'मुंबई पुणे मुंबई ४'ची घोषणा, बघा व्हिडीओ
13
श्रेयस अय्यरला झालेली दुखापत किती गंभीर, आता कशी आहे प्रकृती? बीसीसीआयने दिली महत्त्वाची माहिती
14
युक्रेनचा रशियावर मोठा ड्रोन हल्ला! १९३ ड्रोनमधून गोळीबार, मॉस्कोतील दोन विमानतळ बंद
15
'वॉशिंग्टन पोस्ट'चा अहवाल LIC ने फेटाळला; अदानी समूहात फक्त ४% गुंतवणूक, मग सर्वाधिक पैसा कुठे?
16
Mid-Size SUV: २० लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये घरी आणा 'या' ५ जबरदस्त मिड- साइज एसयूव्ही कार!
17
Video: घरात अन् महाराष्ट्रात जिथं असाल तिथे मराठीत बोला, नाहीतर...; अजित पवारांचं आवाहन
18
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
19
८ वर्षाचं नातं क्षणातच विसरली, पत्नीनं केलेल्या कांडामुळे पती झाला शॉक; चिठ्ठी लिहिली अन्...
20
MCX वर आपटले होते, पण सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले, खरेदी करणार असाल तर पाहा लेटेस्ट रेट

‘हर घर जल’ गावे घोषित, वॉटर ग्रीडच्या कामांमुळे अडले घोडे, ग्रामस्थांचे नळ कोरडेच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 20:03 IST

जिल्ह्यात मागील दोन वर्षांपासून तब्बल ६६३ कोटी रुपयांच्या निधीतून जलजीवन मिशन अंतर्गत ११४५ योजनांची कामे हाती घेण्यात आली आहेत.

छत्रपती संभाजीनगर : जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण झालेल्या १८१ गावांतील ७३ हजार २५२ घरांना नळजोडणी देण्यात आली आहे. सध्या जिल्ह्यातील ५३८ गावे ‘हर घर जल’ म्हणून घोषित करण्यात आली आहेत. तरीही अनेक गावांत नळाला पाणीच येत नाही, तर काही गावांना प्रति माणसी ५५ लिटर ऐवजी कधी कधी १०-२० लिटर एवढाच पाणीपुरवठा होत असल्याचे वास्तव आहे.

जिल्ह्यात मागील दोन वर्षांपासून तब्बल ६६३ कोटी रुपयांच्या निधीतून जलजीवन मिशन अंतर्गत ११४५ योजनांची कामे हाती घेण्यात आली आहेत. जिल्ह्यातील १२४१ गावांसाठी योजनांची कामे जि.प. पाणीपुरवठा विभाग आणि जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून केली जात आहेत. सुरुवातीला मार्च अखेरपर्यंत हे ‘मिशन’ पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे राज्यभरातच मुदतीच्या आत पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण होऊ शकली नाहीत. अखेर शासनाने या ‘मिशन’ अंतर्गत रखडलेल्या कामांसाठी सप्टेंबर अखेरपर्यंत मुदवाढ दिली. त्यानुसार योजनांच्या कामाने गती घेतली आहे.

सध्या ५७५ गावांसाठी राबविण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा योजनांची ५५६ कामे पूर्ण झाली असून ५३८ गावे ‘हर घर जल’ म्हणून घोषित करण्यात आली, तर १५७ गावे प्रमाणित करण्यात आली आहेत. यापैकी १८१ गावांतील ७३ हजार २५२ घरांना नळजोडणी देण्यात आल्याची आकडेवारी समोर आली आहे. असे असले तरी नळजोडणी दिलेल्या अनेक गावांतील नळांना घरापर्यंत पाणीच येत नाही. नियमानुसार प्रतिदिन प्रति माणसी ५५ लिटर पाणी देण्याचे ‘जलजीवन मिशन’चे उद्दिष्ट आहे. मात्र, अनेक धरणांनी तळ गाठला आहे, तर वैजापूर, गंगापूर, पैठण, सिल्लोड या चार तालुक्यांसाठी ‘वॉटर ग्रीड’च्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जाणार आहे. सध्या वॉटर ग्रीडचे काम प्रगतिपथावर असल्यामुळे अनेक गावांमध्ये प्रतिमाणसी ५५ लिटर पाणी देणे शक्य झालेले नाही, हे वास्तवही समोर आले आहे.

ग्रामसभेने घ्यावा लागतो ठरावजल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनांची कामे व गावातील प्रत्येक कुटुंबाच्या घरी नळजोडणी दिल्यानंतर ‘हर घर जल’ प्रमाणित करण्यात येते. त्यानंतर त्या ग्रामपंचायतींनी ग्रामसभा घेऊन आपले गाव ‘हर घर जल’ घोषित करावे लागते. त्यानंतर केंद्र सरकारच्या या जल जीवन मिशनच्या पोर्टलवर या गावांची नोंद केली जाते.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादWaterपाणी