शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

मध्यरात्री दिले १६९ विद्यार्थ्यांना हॉलतिकीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 00:51 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या फर्दापूर येथील नॅशनल महाविद्यालयाच्या १६९ विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज शुक्रवारी मध्यरात्री भरून घेत हॉलतिकीट दिले

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या फर्दापूर येथील नॅशनल महाविद्यालयाच्या १६९ विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज शुक्रवारी मध्यरात्री भरून घेत हॉलतिकीट दिले. मात्र, यातील केवळ ३९ विद्यार्थ्यांनीच शनिवारी परीक्षा दिली असल्याची माहिती प्रभारी परीक्षा संचालक डॉ. दिगंबर नेटके यांनी दिली.विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सोयगाव तालुक्यातील फर्दापूर येथील नॅशनल महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी परीक्षेसंदर्भात केलेला प्रताप परीक्षेच्या पहिल्या दिवशी उघडकीस आला. महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या १६९ विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्जच विद्यापीठाकडे पाठविण्यात आले नव्हते. विलंब झालेला असल्यामुळे अति विलंब शुल्काचे १,६०० रुपये लागणार होते. हा दंड भरण्याऐवजी या सत्राची परीक्षा पुढील वेळी देऊत, अशी भूमिका घेतली. मात्र, परीक्षेच्या दिवशी विद्यार्थी परीक्षेसाठी गेले असता हा प्रकार उघडकीस आला. याची कुणकुण प्रसारमाध्यमांना लागल्यामुळे सर्वत्र गोंधळ उडाला. परीक्षा संचालकांनी संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडे तात्काळ खुलासा करण्याचे आदेश दिले. यातच पहिला पेपर संपला होता. जर विद्यार्थ्यांनी पहिले सत्र दिले नसेल, तर दुसºया सत्राची परीक्षा देता येत नाही, असा नियम आहे. यामुळे एक दिवसाची परीक्षा संपली असली तरी अति विलंब शुल्काची रक्कम भरून दुस-या दिवशी विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू देण्याची तयारी परीक्षा विभागाने केली होती. यासाठी सायंकाळपर्यंत सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज आणि विलंब शुल्क भरण्यास सांगितले. यावरही महाविद्यालयाने सायंकाळपर्यंत काहीच कार्यवाही केली नाही. शेवटी संस्थाचालक आमदार अब्दुल सत्तार यांच्यापर्यंत हा प्रकार गेल्यानंतर त्यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्यांसह कर्मचा-यांना सोबत घेऊन विद्यापीठात धाव घेतली. कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांच्यासोबत चर्चा करीत विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू द्या, सर्व विद्यार्थ्यांचे विलंब शुल्क भरण्यास तयार असल्याचे रात्री ९ वाजता स्पष्ट केले. यासाठी १६९ विद्यार्थ्यांच्या विलंब परीक्षा शुल्कापोटी ५० हजार रुपये तात्काळ भरण्यात आले. उर्वरित रक्कम भरण्यासाठी हमीपत्र दिले. यानंतर परीक्षा विभागाने तत्परता दाखवत सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज भरून घेत मध्यरात्री १२ वाजता हॉलतिकीट दिले. यातील केवळ ३९ विद्यार्थ्यांनीच शनिवारी परीक्षा दिली आहे. यातील पहिले दोन पेपर न देणाºया विद्यार्थ्यांनी पुढील एक जरी पेपर दिला तरी ते दुसºया सत्रासाठी पात्र ठरत असल्यामुळे आ. सत्तार यांनी सर्वच विद्यार्थ्यांचा दंड भरण्याची भूमिका घेतली.‘त्या’ केंद्रावर सहकेंद्रप्रमुखच नाहीविद्यापीठ प्रशासनाने ऐनवेळी परीक्षा केंद्र दिलेल्या स्व. कमलनारायण जैस्वाल महाविद्यालयाला शनिवारी भेट दिली. तेव्हा पहिल्या दिवशीपेक्षा वेगळे चित्र पाहावयास मिळाले. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना जमिनीवर बसून परीक्षा द्यावी लागली, तर याच महाविद्यालयात असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना मैदानावर बसून शिकावे लागले. मात्र, शनिवारी विद्यार्थ्यांची संख्या सकाळ आणि दुपारच्या सत्रात विभागल्यामुळे नियोजन करता आले. सहा खोल्यांमधील बाकड्यांवर परीक्षार्थी दाटीवाटीने बसल्याचे पाहणीत आढळून आले. यावेळी विचारपूस केली असता, विद्यापीठाने सहकेंद्रप्रमुख पाठवला नसल्याचे स्पष्ट झाले.