शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगळुरूला धक्का, अहमदाबादमध्ये खेळवली जाणार IPL 2026 ची फायनल, प्लेऑफचं वेळापत्रक जाहीर
2
पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात...
3
सम्राट चौधरींचा मंत्रिमंडळ विस्तार 'पावसात वाहून गेला'; गांधी मैदानात चिखलाचे साम्राज्य
4
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
5
"नुसतं नावाला 'घरचं मैदान', पिच बनवताना आम्हाला विचारत नाहीत.."; DC च्या कोचचा राग अनावर
6
इराकची जगाला मोठी 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच...
7
Top Marathi News LIVE: प. बंगालमध्ये निकालानंतर हिंसाचार थांबेना, जमावाने लेनिनचा पुतळा तोडला...
8
नशीब असावं तर थलापती विजयसारखं...! आधी TVK चा मोठा विजय अन् आता समोरून आली Good News
9
तामिळनाडूच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; AIADMK चा TVK ला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय!
10
Punjab Blast: पंजाब हादरलं! ३ तासांत २ मोठे धमाके; अमृतसर आणि जालंधरमध्ये नेमकं काय घडलं? वाचा संपूर्ण टाइमलाईन
11
एका फुग्यावरून वाद अन् तरुणाचा बळी! उत्तम नगर मर्डर केसमध्ये धक्कादायक खुलासे
12
लोन फेडलं नाही तर बँक जप्त करू शकते तुमची प्रॉपर्टी; RBI नं जारी केले नवे ड्राफ्ट नियम
13
पश्चिम बंगालचा निकाल येताच अखिलेश यादव यांचा मोठा निर्णय; समाजवादी पार्टीने IPAC सोबतची डील केली रद्द
14
DC vs CSK : वाऱ्यानं बेल्स पडल्या, मग Nitish Rana आउट कसा? डेड बॉल का नाही? नियम काय सांगतो?
15
दिवाळखोर होण्याचं संकट टळलं! कंपनीला क्लिन चीट, शेअरला २०%चं अपर सर्किट; ३० दिवसांत ३३% ची वाढ
16
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' ४ मुलांकांच्या स्त्रिया साक्षात लक्ष्मीचं रूप; घरात आणतात अपार सुख-समृद्धी
17
विजय यांच्या टीव्हीकेला पाठिंबा द्या, अन्यथा..., ३० आमदारांचा इशारा, तामिळनाडूत अण्णा द्रमुक फुटीच्या उंबरठ्यावर?
18
मुंबई विमानतळावर ७ मे रोजी ६ तासांचा 'ब्लॉक'; धावपट्टीच्या देखभालीसाठी विमान सेवा राहणार बंद
19
Sanju Samson: संजू सॅमसन सुसाट! डेव्हिड वॉर्नरचा रेकॉर्ड मोडला, एबी डिव्हिलियर्सचा विक्रम धोक्यात
20
अजबच! एकाच आईच्या जुळ्या मुली, पण दोघींचेही वडील वेगवेगळे; DNA रिपोर्टमधून खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अर्ध्यावरती डाव मोडला....

By admin | Updated: June 4, 2014 01:29 IST

बीड : सुखाचे दिवस कधी त्यांच्या वाट्याला आलेच नाहीत़ गोपीनाथराव मुंडे आणि विरोधी बाकातील खुर्ची़़़़ हे ठरलेले नाते़

बीड : सुखाचे दिवस कधी त्यांच्या वाट्याला आलेच नाहीत़ गोपीनाथराव मुंडे आणि विरोधी बाकातील खुर्ची़़़़ हे ठरलेले नाते़ युतीच्या काळातील साडेचार वर्ष वगळल्यास ते कायम सत्तेबाहेर राहिले़ गेल्या आठवड्यात मुंडे यांची केंद्रात कॅबिनेटमंत्री म्हणून वर्णी लागली़ डाव आता कुठे रंगात आला होता; पण मंत्रिपद मिळाल्यावर दहाव्या दिवशीच मुंडे यांनी निरोप घेतला़ गोपीनाथराव मुंडे म्हटले की, आठवतो एक रुबाबदार व स्वाभिमानी चेहरा़ संघर्षाचा प्रवास करुन सत्तेतील उच्चस्थानापर्यंत भरारी घेणारा नेता़ भाजपाला वाड्या, वस्त्या, तांड्यावर नेऊन पोहोचविण्याचे काम त्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थतीत केले़ ते जणू राज्यातील भाजपाचा चेहराच बनले होते़ जि़प़ सदस्य ते केंद्रीय ग्रामविकास मंत्री ही उत्तुंग भरारी काही पाच- दहा वर्षात झाली नाही़ या प्रवासात मुंडे यांना पदोपदी अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला़ आणीबाणीच्या आंदोलनातून मुंडेंचे नेतृत्व खर्‍या अर्थाने बहरले़ ज्या भाजपाची जिल्ह्याला ओळख नव्हती त्या भाजपाला घराघरात अन् मनामनात पोहोचविण्याचे काम मुंडे यांनी प्रामाणिकपणे केले़ त्यांनी कधीही फळाची लालसा ठेवली नाही, त्यामुळेच न मागता त्यांना सर्वकाही मिळत गेले़ १९७८ मध्ये गोपीनाथराव मुंडे हे पहिल्यांदाच जिल्हा परिषदेत निवडून गेले़ त्यानंतर १९८० मध्ये रेणापूर मतदारसंघातून ते प्रथमच आमदार झाले़ दरम्यानच्या काळात त्यांच्याकडे भाजपाचे प्रदेशाध्यक्षपदही आले़ १९९५ मध्ये राज्यात युतीची सत्ता आली़ यावेळी गोपीनाथराव मुंडे यांच्याकडे उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली़ ज्या प्रमोद महाजनांच्या सोबतीने ते राजकारणात आले त्या महाजन यांचे अकाली निधन झाले़ त्यामुळे मुंडे एकाकी पडले़ महाजनांनंतर मुंडे संपले़़ असे सांगितले जात होते; परंतु मुंडे या धक्क्यातूनही बाहेर आले़ त्यानंतर आप्तस्वकियांनी गोपीनाथराव मुंंडे यांच्यापुढील अडचणी वाढविल्या़ ज्यांना मुंडेंनी गुलाल लावला तेच मुंडेंपासून वेगळे झाले़ यावेळच्या लोकसभा निवडणुकीत तर गोपीनाथराव मुंडे यांच्यावर वैयक्तिक पातळीवर टीकेची अक्षरश: झोड उठविण्यात आली़ मात्र, या टीकांना भीक न घालता मुंडे यांनी विरोधकांचे वार परतवून लावले़ मुंडे मोठ्या मताधिक्याने दुसर्‍यांदा लोकसभेत निवडून गेले़ नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये त्यांना मंत्रिपदही मिळाले़ केंद्रातील सत्तेत बीडला मुंडेंच्या रुपाने मोठा वाटा मिळाला़ २६ मे रोजी त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली़ मंत्री झाल्यापासून ते अतिशय आनंदी होते़ मंत्रिमंडळ बैठक, भेटीगाठी यामध्ये ते नऊ दिवस व्यस्त होते़ मंगळवारी सकाळी ते बीडला जाण्यासाठी निघाले; पण काळाने आघात केला़ मुंडेंचे स्वप्न अधुरे राहिले गोपीनाथराव मुंडे मंत्री झाल्यावर पहिल्यांदाच मंगळवारी बीडला येत होते़ मात्र, काळाने मुंडेंना सर्वांपासून हिरावून नेले़ त्यांच्या स्वागतसाठी आणलेली फुले श्रद्धांजलीसाठी वापरण्याचा दुर्दैवी प्रसंग कार्यकर्त्यांवर आला़ आयुष्यभर ज्यांच्या वाट्याला संघर्ष आला ते मुंडे आता मंत्री झाल्याने सर्वांनाच त्यांचे कौतूक वाटत होते़ दु:खाचे दिवस संपले आता सुखाचे पर्व सुरु झाले असे वाटत असतानाच मंत्रिपद भेटल्यावर अवघ्या दहाव्या दिवशी ते सत्तेचा भरला संसार सोडून गेले़ त्यामुळे त्यांनी पाहिलेले सामान्य माणसाच्या हिताचे व ग्रामोन्नतीचे स्वप्न अधुरेच राहिले़ (प्रतिनिधी) सुरुवात अन् शेवट भाजपातच ... गोपीनाथराव मुंडे यांनी आपला संघर्षमय प्रवास कधी थांबविला नाही की कधी त्यांनी तत्वांशी तडजोड देखील केली नाही़ त्यांनी राजकारणाची सुरुवात भाजपातच केली अन् शेवटचा श्वासही भाजपातच घेतला़ एकीकडे सत्ता अन् दुसरीकडे पक्ष असे दोन पर्याय होते; परंतु मुंडे यांनी सत्तेपेक्षा विचारांना प्राधान्य दिले़ त्यामुळे पक्षातही त्यांची ‘इमेज’ कायम होती़