शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

आंघोळीविना पहिल्यांदाच गुढीपाडवा!; औरंगाबाद महापालिकेच्या नावाने नागरिकांची ओरड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 14:51 IST

सुदर्शननगर, सुरेवाडी, मयूरनगरमध्ये नागरिकांचा संताप

औरंगाबाद : महापालिकेच्या इतिहासात प्रथमच औरंगाबादकरांना शनिवारी आंघोळीविना नवीन वर्ष गुढीपाडवा साजरा करावा लागला. सिडको-हडकोसह जळगाव रोडवरील विविध वॉर्डांमध्ये राहणाऱ्या लाखो नागरिकांना मागील ७ दिवसांपासून पाणीच मिळाले नाही. प्रत्येक वॉर्डात महापालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे. नगरसेवक वॉर्डात पायही ठेवू शकत नाहीत, एवढे वातावरण तापले आहे. पाणी प्रश्न पेटलेला असताना लोकसभा निवडणुकांसाठी मते मागायला कसे जावे, असा प्रश्न राजकीय पक्षांना पडला आहे.

हिंदू संस्कृतीप्रमाणे गुढीपाडव्यापासून नवीन वर्ष सुरू होते. पाडव्याचा मुहूर्त साधण्यासाठी अनेक नागरिक वर्षभर वाट पाहतात. पाडव्याला हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे. शनिवारी पाडव्याच्या दिवशी नागरिकांना  आंघोळ करून पूजा करायची असते. घरासमोर गुढी उभारावी लागते. हे धार्मिक विधी आंघोळीशिवाय शक्यच नाहीत. घरात आंघोळीसाठी पाणीच नसेल तर पाडवा कसा साजरा करणार? शिवसेना-भाजप युतीचे प्राबल्य असलेल्या वॉर्डातील नागरिकांना पाडव्याच्या दिवशी मनपाने एक थेंबही पाणी दिले नाही. सुदर्शननगर, सुरेवाडी, मयूरनगर आदी वॉर्डांतील नागरिकांना मागील सहा ते सात दिवसांपासून पाणीच देण्यात आलेले नाही.

घरात पिण्यासाठीही पाणी नसल्याचे चित्र आहे. पाणी प्रश्नावरून नागरिक वैतागून घर सोडत असल्याने अनेक नगरसेवकांनी आपले मोबाईल बंद करून ठेवले आहेत. वॉर्डातील नागरिकांनी फोन केला तर अनेक नगरसेवक फोनच उचलत नाहीत. नगरसेवकांनी सहज वॉर्डात फेरफटका मारला तर नागरिक पाण्यासाठी भंडावून सोडत आहेत. वॉर्डात पाय ठेवणेही नगरसेवकांना मुश्कील झाले आहे. शनिवारी ‘लोकमत’प्रतिनिधीने टीव्ही सेंटर भागातील विविध वॉर्डांमध्ये फेरफटका मारला असता विदारक चित्र समोर आले. महापालिका वेळेवर पाणी देऊ शकत नसेल तर किमान टँकरने नागरिकांना पाणी द्यायला हवे. 

जाधववाडीत दोन एप्रिलला पाणी दिलेजाधववाडी भागात २ एप्रिल रोजी अत्यंत कमी दाबाने मनपाने पाणीपुरवठा केला होता. तेव्हापासून आजपर्यंत पाणीच आले नाही. कधी येईल, याचाही नेम नाही. अधिकारी नगरसेवकाचे अजिबात ऐकत नाहीत. टँकर देत नाहीत. पाण्यामुळे नगरसेवकपदाचे राजीनामे देऊन मोकळे व्हावे असेही काहींनी नमूद केले.

तीन आठवड्यांपासून पाणी नाहीसुदर्शननगर भागात तर नागरिकांना तीन आठवड्यांपासून पाणीच मिळत नाही. पाणीपुरवठा सुरू होताच वीजपुरवठा खंडित होतो. महापालिकेने पाण्याची वेळ बदलूनही पाणी दिल्यास वीजपुरवठा खंडित होतो. मोटार लावल्याशिवाय एक हंडाही पाणी मिळत नसल्याचे नागरिकांनी सांगितले. चार दिवसांपूर्वी तरुणांनी टाकीवर भांडणे करून एक टँकर आणला होता. टँकरने पाणी देताना अर्ध्यापेक्षा जास्त पाणी वाया जाते.

मयूरनगरचे हालमयूरनगर भागात मागील ७ दिवसांपासून पाणी आले नाही. नगरसेवक दररोज पाण्याच्या टाकीवर जाऊन बसतात. अधिकारी म्हणतात, प्रलंबित पाण्याचे टप्पे झाल्यावर तुमच्या वॉर्डाला पाणी देण्यात येईल. नेमके कधी देणार हे सांगत नाहीत.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाwater shortageपाणीकपातWaterपाणी