शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
4
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
5
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
6
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
7
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
8
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
9
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
10
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
11
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
12
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
13
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
14
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
15
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
16
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
17
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
18
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
19
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
20
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश

आंघोळीविना पहिल्यांदाच गुढीपाडवा!; औरंगाबाद महापालिकेच्या नावाने नागरिकांची ओरड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 14:51 IST

सुदर्शननगर, सुरेवाडी, मयूरनगरमध्ये नागरिकांचा संताप

औरंगाबाद : महापालिकेच्या इतिहासात प्रथमच औरंगाबादकरांना शनिवारी आंघोळीविना नवीन वर्ष गुढीपाडवा साजरा करावा लागला. सिडको-हडकोसह जळगाव रोडवरील विविध वॉर्डांमध्ये राहणाऱ्या लाखो नागरिकांना मागील ७ दिवसांपासून पाणीच मिळाले नाही. प्रत्येक वॉर्डात महापालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे. नगरसेवक वॉर्डात पायही ठेवू शकत नाहीत, एवढे वातावरण तापले आहे. पाणी प्रश्न पेटलेला असताना लोकसभा निवडणुकांसाठी मते मागायला कसे जावे, असा प्रश्न राजकीय पक्षांना पडला आहे.

हिंदू संस्कृतीप्रमाणे गुढीपाडव्यापासून नवीन वर्ष सुरू होते. पाडव्याचा मुहूर्त साधण्यासाठी अनेक नागरिक वर्षभर वाट पाहतात. पाडव्याला हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे. शनिवारी पाडव्याच्या दिवशी नागरिकांना  आंघोळ करून पूजा करायची असते. घरासमोर गुढी उभारावी लागते. हे धार्मिक विधी आंघोळीशिवाय शक्यच नाहीत. घरात आंघोळीसाठी पाणीच नसेल तर पाडवा कसा साजरा करणार? शिवसेना-भाजप युतीचे प्राबल्य असलेल्या वॉर्डातील नागरिकांना पाडव्याच्या दिवशी मनपाने एक थेंबही पाणी दिले नाही. सुदर्शननगर, सुरेवाडी, मयूरनगर आदी वॉर्डांतील नागरिकांना मागील सहा ते सात दिवसांपासून पाणीच देण्यात आलेले नाही.

घरात पिण्यासाठीही पाणी नसल्याचे चित्र आहे. पाणी प्रश्नावरून नागरिक वैतागून घर सोडत असल्याने अनेक नगरसेवकांनी आपले मोबाईल बंद करून ठेवले आहेत. वॉर्डातील नागरिकांनी फोन केला तर अनेक नगरसेवक फोनच उचलत नाहीत. नगरसेवकांनी सहज वॉर्डात फेरफटका मारला तर नागरिक पाण्यासाठी भंडावून सोडत आहेत. वॉर्डात पाय ठेवणेही नगरसेवकांना मुश्कील झाले आहे. शनिवारी ‘लोकमत’प्रतिनिधीने टीव्ही सेंटर भागातील विविध वॉर्डांमध्ये फेरफटका मारला असता विदारक चित्र समोर आले. महापालिका वेळेवर पाणी देऊ शकत नसेल तर किमान टँकरने नागरिकांना पाणी द्यायला हवे. 

जाधववाडीत दोन एप्रिलला पाणी दिलेजाधववाडी भागात २ एप्रिल रोजी अत्यंत कमी दाबाने मनपाने पाणीपुरवठा केला होता. तेव्हापासून आजपर्यंत पाणीच आले नाही. कधी येईल, याचाही नेम नाही. अधिकारी नगरसेवकाचे अजिबात ऐकत नाहीत. टँकर देत नाहीत. पाण्यामुळे नगरसेवकपदाचे राजीनामे देऊन मोकळे व्हावे असेही काहींनी नमूद केले.

तीन आठवड्यांपासून पाणी नाहीसुदर्शननगर भागात तर नागरिकांना तीन आठवड्यांपासून पाणीच मिळत नाही. पाणीपुरवठा सुरू होताच वीजपुरवठा खंडित होतो. महापालिकेने पाण्याची वेळ बदलूनही पाणी दिल्यास वीजपुरवठा खंडित होतो. मोटार लावल्याशिवाय एक हंडाही पाणी मिळत नसल्याचे नागरिकांनी सांगितले. चार दिवसांपूर्वी तरुणांनी टाकीवर भांडणे करून एक टँकर आणला होता. टँकरने पाणी देताना अर्ध्यापेक्षा जास्त पाणी वाया जाते.

मयूरनगरचे हालमयूरनगर भागात मागील ७ दिवसांपासून पाणी आले नाही. नगरसेवक दररोज पाण्याच्या टाकीवर जाऊन बसतात. अधिकारी म्हणतात, प्रलंबित पाण्याचे टप्पे झाल्यावर तुमच्या वॉर्डाला पाणी देण्यात येईल. नेमके कधी देणार हे सांगत नाहीत.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाwater shortageपाणीकपातWaterपाणी