शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय पक्षात गटबाजी

By admin | Updated: July 14, 2014 01:02 IST

कंधार : ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रदेश पातळीवर शह-काटशहाचे राजकारण नेत्याकडून खेळले जात आहे़

कंधार : ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रदेश पातळीवर शह-काटशहाचे राजकारण नेत्याकडून खेळले जात आहे़ त्याची लागण तालुकास्तरावर झाली आहे़ त्यातच प्रमुख राजकीय पक्षात गटबाजी उफाळून आल्याने सामान्य कार्यकर्त्यांत कमालीची नाराजी पसरल्याचे चित्र आहे़मन्याड खोऱ्यात शेकाप व काँग्रेस पक्षात चुरशीच्या निवडणुका होत असत़ पक्षीय पातळीवर नेते धोरणावरून, मुद्यावरून एकमेकांचे वाभाडे काढत असत़ त्यात पक्षीय कार्यक्रम, सर्वसामान्यांचे हित यावर अधिक भर दिला जात असे़ कालांतराने राजकीय पक्षांची संख्या वाढत गेली़ नेते-कार्यकर्त्यांची संख्या मोठी झाली़ भरपूर कार्यकर्त्यात निष्ठा मात्र नेत्यात विभागत गेल्या़ तरीही राज्य व देशपातळीवरील नेतृत्वाला मानणारा कार्यकर्ता गटबाजीने (ता़स्तरीय) पुरता वैतागल्याच्या घटना जुलै महिन्यात घडल्या़ आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून काही नेत्यांना आमदारकीचे स्वप्न पडू लागत असल्याने गटबाजीने दर्शन होत असल्याचे बोलले जात आहे़केंद्र शासनाच्या महागाई विरोधात काँग्रेस पक्षाने कंधारात आंदोलन केले़ आंदोलनापेक्षा त्यात उघडपणे गटबाजी समोर आली़ बॅनरवरील मजकूर व त्यावर असलेल्या नावाला एका गटाने आक्षेप घेतला़ घोषणाबाजी कोणती करायची? यावर बरीच एकमेकावर शेरेबाजी करण्यात आली़ लोहा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेल्याने काँग्रेस पक्षातील कार्यकर्ते निष्क्रीय होण्यापेक्षा नेतेच सैरभैर झाले आहेत़ केंद्रात भाजपा (एनडीए) सरकार आल्याने तालुक्यात उत्साह संचारला़ नेते-कार्यकर्ते सर्वसामान्यांशी एकरूप होवून जनतेचे प्रश्न प्रभावीपणे मांडतील, अशी भावना व्यक्त होवू लागली़ परंतु लोकसभा निवडणुकीत अतिशय एकमेकांशी विचार-विनिमय करून प्रचार यंत्रणा राबविणारे अचानक एकमेकांचे उणे-दुणे काढू लागले़ उभे दोन गट मजबूतपणे समोर आले़ लोकसभा निवडणुकीतील उत्साह विधानसभा निवडणुकीत दिसणार का असा प्रश्न भाजपा कार्यकर्त्यांतून विचारला जात आहे़ लोकसभा निवडणुकीत भाजपा-सेनेत कंधार-लोह्यात विसंवाद आला होता़ निवडणुकीनंतर भाजपातील गटबाजी उघडपणे समोर आली़ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दिग्गज दोन नेत्यात गटबाजी असल्याचे मतदारसंघातील सर्वच नागरिकांना माहीत आहे़ कार्यकर्ते दोन गटात विभागले आहेत़ वरिष्ठ पातळीवर दोन नेत्यांवर कार्यकर्त्यांची निष्ठा असली तरी स्थानिक पातळीवर मात्र गटबाजीत कार्यकर्ते जोडले गेले आहेत़ येथील दोन्ही नेते जाहीरपणे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करतात़ (वार्ताहर)कार्यकर्ते संभ्रमातमनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याचे जाहीर केले़ यामुळे पक्षात राज्यपातळीवर मोठा उत्साह संचारला़ परंतु कंधार तालुक्यात मात्र गटबाजी विकोपाला गेली आहे़ ११ जुलै रोजी एका गटाने धरणे आंदोलन केले़ त्याला दुसऱ्या गटाने आक्षेप घेत कार्यक्षेत्राचा प्रश्न उपस्थित केला़ पक्ष प्रतिमा खराब होत असल्याची बाब समोर आणली व दुसऱ्या पक्षाचे हस्तक असल्याचा आरोप केला़ पक्षाच्या वतीने १४ जुलैला मोर्चा आयोजित केल्याचे जाहीर केले़ मुळ व उपरे असा मनसेतील वाद विकोपाला जाण्याची चिन्हे मानली जातात़ एकपक्ष असूनही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मात्र गटबाजी समोर आली़