शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादचे मोठे यश ! जीवन गुणवत्तेत शहर देशामध्ये १३ व्या स्थानावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 11:40 IST

Ease of Living Index केंद्र शासनाकडून २०१८ पासून सर्वेक्षणाला सुरुवात

ठळक मुद्दे औरंगाबादचे जीवनमान चंदीगड, नाशिक, नागपूर, पिंपरी चिंचवड, जयपूरपेक्षा चांगलेराहण्यायोग्य शहरांच्या यादीत औरंगाबाद ३४ व्या क्रमांकावर

औरंगाबाद : केंद्र सरकारकडून राहण्यायोग्य सर्वोत्तम शहरांची यादी गुरुवारी दुपारी (इज ऑफ लिव्हिंग इन्डेक्स) जाहीर करण्यात आली आहे. ऐतिहासिक औरंगाबाद शहराचा क्रमांक मागील वर्षी ६३ वा होता. अवघ्या वर्षभरात शहराने गरुड झेप घेत ३४ वे स्थान मिळविले. अत्यंत भूषणावह बाब म्हणजे नागरिकांच्या जीवन गुणवत्तेत शहराने चक्क १३ वे स्थान पटकावले.

''इज ऑफ लिव्हिंग इन्डेक्स'' पहिल्यांदा २०१८ मध्ये जारी करण्यात आला होता. या सर्वेक्षणात प्रशासन, शिक्षण, स्वच्छता आणि सुरक्षा यांसारख्या अनेक गोष्टींच्या आधारावर प्रश्न विचारले जातात. त्याचप्रमाणे गुणवत्ता, आर्थिक योग्यता, विकासाची स्थिरता या तीन गोष्टींचा विचार मुख्यत्वे केला जातो. केंद्रीय गृहनिर्माण आणि नगर विकास मंत्री हरदीपसिंह पुरी, गृहनिर्माण आणि नगर विकास खात्याचे सचिव दुर्गा शंकर मिश्रा, स्मार्ट सिटीज मिशनचे संचालक कुणाल कुमार आणि राहुल कपूर यांच्या उपस्थितीत गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे वेगवेगळ्या शहरांची क्रमवारी घोषित करण्यात आली.

औरंगाबादला इज ऑफ लिव्हिंग इन्डेक्समध्ये एकूणच ३४ वा क्रमांक मिळाला आहे, जो नाशिक, रांची आणि जबलपूरसारख्या शहरांपेक्षा उच्च आहे. औरंगाबादची जीवनमान गुणवत्ता चंदीगड, नाशिक, नागपूर, पिंपरी चिंचवड आणि जयपूरसारख्या शहरांपेक्षा चांगली आहे. औरंगाबादचा सिटी स्कोअर ५२.९० आहे, जी सरासरी स्कोअर ५२.३८ च्या सिटी स्कोअरपेक्षा चांगला आहे. नगरपालिका कामगिरी निर्देशांकात औरंगाबाद १० लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये ४७ व्या क्रमांकावर आहे. मुनिसिपल परफॉर्मन्स इंडेक्सचे परिणाम जाहीर करण्यात आले. यात औरंगाबादने देशात ४७ वा क्रमांक मिळवला. शहराने गव्हर्नन्स या निकषात चांगली कामगिरी केली आहे.

शहराची रँकिंग अत्यंत उत्साहवर्धककेंद्र शासनाने घोषित केलेल्या रँकिंगबद्दल बोलताना मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय म्हणाले की, रँकिंग उत्साहवर्धक आहे आणि हे दाखवत आहे की मागच्या वर्षात मनपा, स्मार्ट सिटी आणि अन्य संस्थांद्वारे चांगले काम झालेले आहे. शहरातील विकासकामांचा वेग असाच कायम राहिला तर पुढच्या वर्षी यापेक्षा चांगल्या परिणामांची अपेक्षा करू शकतो.

सर्वेक्षणात कोणकोणत्या गोष्टींना महत्त्वसर्वेक्षणात संस्थात्मक (इन्स्टिट्यूशनल), सामाजिक (सोशल), आर्थिक (इकॉनॉमिक) आणि भौतिक सुविधा (फिजिकल) असे चार प्रमुख निकष तपासले जातात. त्याचप्रमाणे शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्य, सुरक्षितता, रोजगार निर्मिती, वाहतूक, गृहनिर्माण, पाणी पुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, प्रदूषण, वीजवापर, सार्वजनिक मोकळ्या जागा अशा इतर पूरक निकषांवर प्रमुख शहरांची काटेकोर तपासणी करण्यात येते. त्यासाठी, संबंधित शहरातील काही नागरिकांशी संवाद साधण्यात येतो. नागरिकांकडून ऑनलाइन स्वरूपातही शहरातील राहणीमानाच्या दर्जाविषयी त्यांची मते जाणून घेण्यात येतात. या सर्व माहितीचे विश्लेषण केल्यानंतर राहण्यायोग्य सर्वोत्तम शहरांची क्रमवारी निश्चित केली जाते.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका