शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही बिनशर्त पाठिंबा सगळं गुजरातला देण्यासाठी दिलाय का? आदित्य ठाकरेंचा मनसैनिकांना खोचक टोला
2
17000 राजकारणी, अब्जाधीशांनी देश बुडविला; पाकिस्तानींनी दुबईत घेतली तब्बल 23000 घरे
3
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
4
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
6
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
7
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
8
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
9
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
10
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
11
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत
12
मजबूत अर्थव्यवस्थेसाठी स्थिर सरकार आवश्यक; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मत
13
मध्यमवर्गीयांची पिळवणूक हेच काँग्रेसचे धोरण; पीयूष गोयल यांची टीका
14
पालिकेच्या मान्यताप्राप्त ऑडिटरचाच स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा रिपोर्ट! धक्कादायक माहिती समोर
15
रोड शो, रथयात्रांमुळे वाहतूककोंडी; वाहतुकीचे नियोजन करता करता मुंबईत पोलिसांच्या येते नाकीनऊ
16
धीरज वाधवानला सीबीआयकडून अटक; १७ बँकांकडून घेतलेल्या कर्जापैकी ३४ हजार कोटींचा अपहार
17
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
18
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
19
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
20
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी

'आजीचे नातीला हळद लावणे राहून गेले'; जालना रोडवर भरधाव कारने दोन महिलांना चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2020 8:00 PM

काकू आणि आजीचा जागीच मृत्यू

औरंगाबाद : जालना रोडवरील धूत हॉस्पिटलसमोर एका भरधाव कारने तीन पादचारी महिलांना जोरदार धडक दिल्याची घटना सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. यात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून एक महिला गंभीर जखमी आहे. जखमीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.'आशामती विष्णू गायकवाड ( ४० ), तुळसाबाई  दामोधर गायकवाड (७० ) अशी मृतांची नावे आहेत, तर अहिल्याबाई गायकवाड (७० ) असे जखमी महिलेचे नाव आहे. मृत आणि जखमी महिला जालना जिल्ह्यातील देवठाण येथील रहिवासी आहेत. 

याबाबत अधिक माहिती अशी की, आशामती विष्णू गायकवाड ( ४० ), तुळसाबाई  दामोधर गायकवाड (७० ) व अहिल्याबाई गायकवाड (७० ) या देवठाण येथून नातीच्या लग्नासाठी शहरात आल्या होत्या. लग्न रविवारी असून आज नातीची हळद होती. तिघीही बसमधून उतरून रस्त्याच्या बाजूला थांबल्या. यावेळी चिखलठाणाकडून भरधाव वेगाने एक कार येत होती. दरम्यान धूत हॉस्पिटलसमोर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या कडेला उभ्या तिनही महिलांवर धडकली. यानंतर कार त्याच वेगात पुढे जात रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका टपरीवर धडकून थांबली. नागरिकांनी लागलीच जखमींना रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी दोघींना तपासून मृत घोषित केले. दरम्यान, चालक फरार झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.   

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूAurangabadऔरंगाबाद