शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
3
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
4
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
5
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
6
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
7
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
8
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
9
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
10
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
11
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
12
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
13
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
14
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
15
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
16
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
17
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
18
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
19
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
20
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...

भिकेचे नव्हे तर सरकारला हक्काचे पाणी द्यावेच लागेल; पाणी प्रश्नांवर मराठवाड्यातील आमदार आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 4:48 PM

सरकारला जायकवाडीला हक्काचे पाणी द्यावेच लागेल अशी आक्रमक भूमिका घेत आज मराठवाड्यातील आमदार औरंगाबादेत एकत्र आले. 

औरंगाबाद : पाणी प्रश्नावर मराठवाड्यावरील होणारा अन्याय आता सहन करणार नाही, सरकारला जायकवाडीला हक्काचे पाणी द्यावेच लागेल अशी आक्रमक भूमिका घेत आज मराठवाड्यातील आमदार औरंगाबादेत एकत्र आले. 

हक्काच्या पाण्यासंदर्भात शहरात मराठवाड्यातील आमदारांच्या एका बैठकीचे आज आयोजन करण्यात आले. यास १४ आमदारांची उपस्थिती होती. यावेळी आमदारांनी आक्रमक भूमिका घेत जायकवाडीत भिकेचे पाणी नको तर हक्काचे पाणी हवे आणि ते सरकारला द्यावेच लागेल अशी भूमिका घेतली.तसेच समन्यायी पाणी वाटपची तातडीने अंमलबजावणी करावी आणि मराठवाड्यातील अर्धवट सिंचन प्रकल्प तातडीने मार्गी लावण्याची मागणी आमदारांनी केली. 

मराठवाडा राजकीय नेतृत्वाबाबत कमनशिबी मराठवाड्याच्या हक्काच्या लढाईचे रणशिंग फुंकण्यासाठी फक्त १४ आमदारांनी हजेरी लावली. राजकीय नेतृत्वाबात मराठवाडा नेहमीच कमनशिबी ठरलाय. पाण्याची लढाई मोठ रुप घेणार असे चित्र निर्माण होणार आहे.

जायकवाडीत अवघा ३३% जलसाठायंदा पावसाने दगा दिल्यामुळे जायकवाडी धरणात अवघा ३३.७२ टक्के साठा राहिला आहे. गतवर्षी जायकवाडी शंभर टक्के भरले होते. परंतु गतवर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल ६६.२८ टक्क्यांनी कमी साठा आहे. परिणामी आगामी काळात भीषण पाणीटंचाईला सामोरे जाण्याची चिन्हे आहेत.मराठवाड्यासाठी जायकवाडी धरणात अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांतील धरणांतून १७२ दलघमी म्हणजे ७ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय आठवडा उलटूनही घेण्यात आलेला नाही. या जिल्ह्यांतील नेत्यांच्या राजकीय दबावापोटी वरील धरणांतील पाणी जायकवाडीत सोडण्यास विलंब होत आहे. त्यामुळे हक्काच्या पाण्यासाठी मराठवाड्यातील सर्वपक्षीय आमदार एकत्र आले आहेत. 

मुंबईत अधिकाऱ्यांची बैठकजायकवाडीत वरील धरणांतून पाणी सोडण्यासंदर्भात मुंबईत आज बैठक होत आहे. या बैठकीस महामंडळाचे कार्यकारी संचालक अजय कोहिरकर यांच्यासह नगर, नाशिकचे अभियंते उपस्थित राहणार आहेत. 

टॅग्स :MarathwadaमराठवाडाWaterपाणीState Governmentराज्य सरकारNashikनाशिकAhmednagarअहमदनगर