शहरं
Join us  
Trending Stories
1
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
2
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
3
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
4
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
5
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
6
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
7
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
8
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
9
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
10
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
11
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
12
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
13
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
14
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
15
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
16
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
17
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
18
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
19
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
20
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
Daily Top 2Weekly Top 5

झरा आटला, जीव थकला़़़

By admin | Updated: March 13, 2016 14:42 IST

नांदेड - तापमानात वाढ होत असल्याने दिवसेंदिवस पाणीटचाईचे चटके सोसावे लागत आहेत.

नांदेड - तापमानात वाढ होत असल्याने दिवसेंदिवस पाणीटचाईचे चटके सोसावे लागत आहेत. त्याचा परिणाम विहिरी, बोअरमधील पाणीपातळी घटल्याने आजघडीला मुखेड तालुक्यातील ७४ गावांत ५९ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तालुक्यातील सावरगाव, दापका गुंडोपंत, जांब, बाऱ्हाळी, रत्त्नातांडा, मानसिंगतांडा यासह अनेक वाडी-तांड्यावर पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे याठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असून टँकर आल्यानंतर पाणी भरण्यासाठी नागरिकांसह महिला लहान मुलांची झुंबड उडत आहे. अनेक ठिकाणी पाणी घेण्यावरुन किरकोळ भांडणतंटेही होत आहेत. पिण्याच्या पाण्याचाच प्रश्न निर्माण झाल्याने अंघोळीला वापरलेले पाणी धुण्यासाठी पुन्हा वापरण्यात येत असल्याचे चित्रही मुखेड तालुक्यातील काही भागात पहावयास मिळाले. याशिवाय जनावरांच्या चाऱ्यासह पिण्याच्या पाण्याच प्रश्न गंभीर होत असल्याने मोठ्या संख्येने जनावरे विक्रीसाठी आठवडी बाजारात आणली जात आहेत. त्यामुळे जनावरांचे भावही कमी झाले असून घेण्यासाठी कोणीही धजावत नसल्याचेही चित्र दिसत आहे. पाणीटंचाईमुळे अनेक गावातील नागरिक स्थलांतरित होत असून पिण्याच्या पाण्यासोबतच जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे़ ही परिस्थिती पुढील महिन्यात अधिक भयावह होणार आहे़ दुष्काळाच्या झळांनी वाडी, वस्ती, तांड्यावरील गोरगरीब माणूस होरपळून निघाला आहे़ पिण्यासाठी पाणी नाही, हाताला काम नाही़़़ अशा परिस्थितीत जगायचे कसे? असा प्रश्न उपस्थित करून शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब माणूस शेतशिवार वाऱ्यावर सोडून व घराला कुलूप लावून मुलांबाळांसह वाट मिळेल तिकडे निघाला आहे़ गावात राहिलेले मात्र पाण्यासाठी संघर्ष करत आहेत़ मुखेड तालुक्यातील दापका आणि भवानीतांडा या गावातील पाण्यासाठी चाललेली ही लढाई भयान अशी आहे़ अबालवृद्धांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे़ उन्हाच्या चटक्यांसोबतच पाण्याच्या झळांनी गावे ओस पडली आहेत़