शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा
2
Pooja Khedkar Mother: नवी मुंबईतून ट्रक चालकाचं अपहरण, पुण्यातील घरात ठेवले डांबून; पूजा खेडकरच्या आईचा प्रताप
3
रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा
4
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
5
UPI Rule Change: आजपासून मोठा बदल, मोठा दिलासा; आता UPI मधून एका दिवसात करू शकता 'इतक्या' लाखांचं ट्रान्झॅक्शन
6
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
7
Stock Markets Today: आठवड्याची सुस्त सुरुवात, ६० अंकांनी वधारला सेन्सेक्स; रियल्टी, मेटल शेअर्समध्ये खरेदी
8
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केलेली ती चूक भोवणार? टीम इंडियावर कारवाई होणार?
9
PPF Investment: पती पत्नीसाठी डबल नफ्याची ट्रिक! टॅक्सही शून्य, व्याजही जास्त; कसा घ्याल फायदा?
10
युद्ध स्फोटक वळणावर, रशियन ड्रोन्स रोमानियात; युक्रेनचा रशियातील सर्वात मोठ्या तेल प्रकल्पावर भीषण हल्ला
11
राहुल गांधींवर आरोप करण्याऐवजी त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा
12
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
13
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
14
ट्रम्प अन् निर्बंधांमुळे रशियन तेल मिळवण्यात भारताला अडचणी; जहाज कंपन्यांनी दिला नकार
15
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
16
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
17
‘एआय सायकोसिस’ ही स्थिती नेमकी काय आहे? Ai विचारांवर किंवा भावनांवर नियंत्रण ठेवत
18
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
19
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
20
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले

भाजपात पहिलीच सभा; अमित शाहंसमोर अशोक चव्हाणांचं मराठा आरक्षणावर भाष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2024 10:49 IST

संभाजीनगरमध्ये अशोक चव्हाण यांनी अमित शाहंसमोर मराठा आरक्षणावर भाष्य केलं. ्

छ. संभाजीनगर - भाजपा नेते आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपाची मोठी सभा झाली. या सभेतून शाह यांनी काँग्रेसच्या घराणेशाहीवर हल्लाबोल केला, तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावरही टीका केली. शाह यांनी मोदी सरकारने केलेल्या कामाची माहिती देत, गेल्या ९ वर्षात महाराष्ट्राला भरभरुन निधी केंद्र सरकारकडून देण्यात आल्याचंही सांगितलं. दरम्यान, येथील सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नुकतेच भाजपात प्रवेश केलेले खासदार अशोक चव्हाण यांचीही भाषणे झाले. यावेळी, चव्हाण यांनी अमित शाहंसमोर मराठा आरक्षणावर भाष्य केलं. 

राज्य सरकारने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं आहे. मात्र, उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील सगेसोयरेच्या अंमलबजावणीवर ठाम असून मराठा समाजाला ५० टक्क्यांच्या आत ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण मिळालं पाहिजे, अशी मागणी करत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी थेट मराठा नेत्यांनाही लक्ष्य केलं होतं. आता, मराठा आरक्षणासंबधितील समितीमध्ये काम केलेल्या अशोक चव्हाण यांनी थेट अमित शाह यांच्यासमोर छत्रपती संभाजीनगरमधील सभेत मराठा आरक्षणावर भाष्य केलं. 

मला भाजपात आल्यानंतर जनसभेला संबोधित करण्याची ही पहिलीच संधी दिली. भाजपा परिवारात मला सामावून घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सर्वांचे लाख लाख धन्यवाद मानतो. भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर २४ तासांतच मला राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली, तो माझ्यावर ठेवलेला मोठा विश्वास आहे, काम करण्याची जबाबदारी मला देण्यात आल्याचे मी समजतो. देशभरात आपण ४०० पारचा संकल्प केला आहे, पण मराठवाडाच नाही, तर महाराष्ट्रातून सर्वाधिक जागा भाजपा महायुतीच्या निवडून येणार, त्यासाठी आम्ही योगदान देणार असल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटलं. 

मराठा आरक्षणाबद्दल मानले आभार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो, असे म्हणत संभाजीनगरच्या सभेतून अमित शाह यांच्यासमोर अशोक चव्हाणांनी मराठा आरक्षणाच्या मुद्दयावरुन सरकारचं अभिनंदन केलं. तसेच, फार वर्षांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न अडकला होता, तो मार्गी लागला. सगेसोयरेंचा प्रश्नही कायदेशीर मार्गाने प्रक्रिया पूर्ण होऊन मार्गी लागणार आहे, त्यामध्ये आम्हाला शंका नाही, असेही चव्हाण यांनी म्हटले. दरम्यान, भाषणाच्या शेवटी अशोक चव्हाण यांनी अब की बार ४०० पारचा नाराही दिला. 

मुंबईचा चेहरामोहरा बदलला

विकसित भारत, विकसित महाराष्ट्र आणि विकसित महाराष्ट्र हेच आमचं पहिलं ध्येय असणार आहे. मराठवाड्यातील लोकांना विकासाची भूक आहे, हा विकास करण्यासाठी देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आणि आपल्या रुपाने मजबूत नेतृत्व मिळालं आहे. देशात रेल्वे कनेक्टीव्ही चांगली झाली, हायवे झाले, शेतकऱ्यांसाठी सन्मान योजना आणल्या गेल्या, ५-७ वर्षात मुंबईचा चेहरामोहरा बदललाय. महाराष्ट्रात जे दृश्य पाहतो, ती केवळ आश्वासन नसून प्रत्यक्षात दिसत आहेत. देशातील तिर्थक्षेत्रांचा विकास मोठा झालाय. एम्स कॉलेजची संख्या १६ वर गेलीय, मेडीकल कॉलेजची संख्या ३८७ वरुन ६५४ वर गेलीय. गरिब नागरिकांसाठी ५ लाखांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचाराची योजना मोदींमुळेच सुरू झाल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटले.

टॅग्स :Amit Shahअमित शाहAshok Chavanअशोक चव्हाणMaratha Reservationमराठा आरक्षणmarathaमराठा