शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
4
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
5
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
6
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
7
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
8
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
9
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
10
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
11
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
12
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
13
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
14
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
15
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
16
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
17
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
18
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
19
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपात पहिलीच सभा; अमित शाहंसमोर अशोक चव्हाणांचं मराठा आरक्षणावर भाष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2024 10:49 IST

संभाजीनगरमध्ये अशोक चव्हाण यांनी अमित शाहंसमोर मराठा आरक्षणावर भाष्य केलं. ्

छ. संभाजीनगर - भाजपा नेते आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपाची मोठी सभा झाली. या सभेतून शाह यांनी काँग्रेसच्या घराणेशाहीवर हल्लाबोल केला, तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावरही टीका केली. शाह यांनी मोदी सरकारने केलेल्या कामाची माहिती देत, गेल्या ९ वर्षात महाराष्ट्राला भरभरुन निधी केंद्र सरकारकडून देण्यात आल्याचंही सांगितलं. दरम्यान, येथील सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नुकतेच भाजपात प्रवेश केलेले खासदार अशोक चव्हाण यांचीही भाषणे झाले. यावेळी, चव्हाण यांनी अमित शाहंसमोर मराठा आरक्षणावर भाष्य केलं. 

राज्य सरकारने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं आहे. मात्र, उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील सगेसोयरेच्या अंमलबजावणीवर ठाम असून मराठा समाजाला ५० टक्क्यांच्या आत ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण मिळालं पाहिजे, अशी मागणी करत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी थेट मराठा नेत्यांनाही लक्ष्य केलं होतं. आता, मराठा आरक्षणासंबधितील समितीमध्ये काम केलेल्या अशोक चव्हाण यांनी थेट अमित शाह यांच्यासमोर छत्रपती संभाजीनगरमधील सभेत मराठा आरक्षणावर भाष्य केलं. 

मला भाजपात आल्यानंतर जनसभेला संबोधित करण्याची ही पहिलीच संधी दिली. भाजपा परिवारात मला सामावून घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सर्वांचे लाख लाख धन्यवाद मानतो. भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर २४ तासांतच मला राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली, तो माझ्यावर ठेवलेला मोठा विश्वास आहे, काम करण्याची जबाबदारी मला देण्यात आल्याचे मी समजतो. देशभरात आपण ४०० पारचा संकल्प केला आहे, पण मराठवाडाच नाही, तर महाराष्ट्रातून सर्वाधिक जागा भाजपा महायुतीच्या निवडून येणार, त्यासाठी आम्ही योगदान देणार असल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटलं. 

मराठा आरक्षणाबद्दल मानले आभार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो, असे म्हणत संभाजीनगरच्या सभेतून अमित शाह यांच्यासमोर अशोक चव्हाणांनी मराठा आरक्षणाच्या मुद्दयावरुन सरकारचं अभिनंदन केलं. तसेच, फार वर्षांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न अडकला होता, तो मार्गी लागला. सगेसोयरेंचा प्रश्नही कायदेशीर मार्गाने प्रक्रिया पूर्ण होऊन मार्गी लागणार आहे, त्यामध्ये आम्हाला शंका नाही, असेही चव्हाण यांनी म्हटले. दरम्यान, भाषणाच्या शेवटी अशोक चव्हाण यांनी अब की बार ४०० पारचा नाराही दिला. 

मुंबईचा चेहरामोहरा बदलला

विकसित भारत, विकसित महाराष्ट्र आणि विकसित महाराष्ट्र हेच आमचं पहिलं ध्येय असणार आहे. मराठवाड्यातील लोकांना विकासाची भूक आहे, हा विकास करण्यासाठी देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आणि आपल्या रुपाने मजबूत नेतृत्व मिळालं आहे. देशात रेल्वे कनेक्टीव्ही चांगली झाली, हायवे झाले, शेतकऱ्यांसाठी सन्मान योजना आणल्या गेल्या, ५-७ वर्षात मुंबईचा चेहरामोहरा बदललाय. महाराष्ट्रात जे दृश्य पाहतो, ती केवळ आश्वासन नसून प्रत्यक्षात दिसत आहेत. देशातील तिर्थक्षेत्रांचा विकास मोठा झालाय. एम्स कॉलेजची संख्या १६ वर गेलीय, मेडीकल कॉलेजची संख्या ३८७ वरुन ६५४ वर गेलीय. गरिब नागरिकांसाठी ५ लाखांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचाराची योजना मोदींमुळेच सुरू झाल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटले.

टॅग्स :Amit Shahअमित शाहAshok Chavanअशोक चव्हाणMaratha Reservationमराठा आरक्षणmarathaमराठा