शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

भाजपात पहिलीच सभा; अमित शाहंसमोर अशोक चव्हाणांचं मराठा आरक्षणावर भाष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2024 10:49 IST

संभाजीनगरमध्ये अशोक चव्हाण यांनी अमित शाहंसमोर मराठा आरक्षणावर भाष्य केलं. ्

छ. संभाजीनगर - भाजपा नेते आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपाची मोठी सभा झाली. या सभेतून शाह यांनी काँग्रेसच्या घराणेशाहीवर हल्लाबोल केला, तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावरही टीका केली. शाह यांनी मोदी सरकारने केलेल्या कामाची माहिती देत, गेल्या ९ वर्षात महाराष्ट्राला भरभरुन निधी केंद्र सरकारकडून देण्यात आल्याचंही सांगितलं. दरम्यान, येथील सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नुकतेच भाजपात प्रवेश केलेले खासदार अशोक चव्हाण यांचीही भाषणे झाले. यावेळी, चव्हाण यांनी अमित शाहंसमोर मराठा आरक्षणावर भाष्य केलं. 

राज्य सरकारने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं आहे. मात्र, उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील सगेसोयरेच्या अंमलबजावणीवर ठाम असून मराठा समाजाला ५० टक्क्यांच्या आत ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण मिळालं पाहिजे, अशी मागणी करत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी थेट मराठा नेत्यांनाही लक्ष्य केलं होतं. आता, मराठा आरक्षणासंबधितील समितीमध्ये काम केलेल्या अशोक चव्हाण यांनी थेट अमित शाह यांच्यासमोर छत्रपती संभाजीनगरमधील सभेत मराठा आरक्षणावर भाष्य केलं. 

मला भाजपात आल्यानंतर जनसभेला संबोधित करण्याची ही पहिलीच संधी दिली. भाजपा परिवारात मला सामावून घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सर्वांचे लाख लाख धन्यवाद मानतो. भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर २४ तासांतच मला राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली, तो माझ्यावर ठेवलेला मोठा विश्वास आहे, काम करण्याची जबाबदारी मला देण्यात आल्याचे मी समजतो. देशभरात आपण ४०० पारचा संकल्प केला आहे, पण मराठवाडाच नाही, तर महाराष्ट्रातून सर्वाधिक जागा भाजपा महायुतीच्या निवडून येणार, त्यासाठी आम्ही योगदान देणार असल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटलं. 

मराठा आरक्षणाबद्दल मानले आभार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो, असे म्हणत संभाजीनगरच्या सभेतून अमित शाह यांच्यासमोर अशोक चव्हाणांनी मराठा आरक्षणाच्या मुद्दयावरुन सरकारचं अभिनंदन केलं. तसेच, फार वर्षांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न अडकला होता, तो मार्गी लागला. सगेसोयरेंचा प्रश्नही कायदेशीर मार्गाने प्रक्रिया पूर्ण होऊन मार्गी लागणार आहे, त्यामध्ये आम्हाला शंका नाही, असेही चव्हाण यांनी म्हटले. दरम्यान, भाषणाच्या शेवटी अशोक चव्हाण यांनी अब की बार ४०० पारचा नाराही दिला. 

मुंबईचा चेहरामोहरा बदलला

विकसित भारत, विकसित महाराष्ट्र आणि विकसित महाराष्ट्र हेच आमचं पहिलं ध्येय असणार आहे. मराठवाड्यातील लोकांना विकासाची भूक आहे, हा विकास करण्यासाठी देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आणि आपल्या रुपाने मजबूत नेतृत्व मिळालं आहे. देशात रेल्वे कनेक्टीव्ही चांगली झाली, हायवे झाले, शेतकऱ्यांसाठी सन्मान योजना आणल्या गेल्या, ५-७ वर्षात मुंबईचा चेहरामोहरा बदललाय. महाराष्ट्रात जे दृश्य पाहतो, ती केवळ आश्वासन नसून प्रत्यक्षात दिसत आहेत. देशातील तिर्थक्षेत्रांचा विकास मोठा झालाय. एम्स कॉलेजची संख्या १६ वर गेलीय, मेडीकल कॉलेजची संख्या ३८७ वरुन ६५४ वर गेलीय. गरिब नागरिकांसाठी ५ लाखांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचाराची योजना मोदींमुळेच सुरू झाल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटले.

टॅग्स :Amit Shahअमित शाहAshok Chavanअशोक चव्हाणMaratha Reservationमराठा आरक्षणmarathaमराठा