शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
7
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
8
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
9
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
10
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
11
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
12
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
13
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
14
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
15
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
16
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
17
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
18
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
19
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
Daily Top 2Weekly Top 5

कंधार-लोह्यातील पुढार्‍यांची अग्नीपरीक्षा

By admin | Updated: May 21, 2014 00:48 IST

गंगाधर तोगरे , कंधार लोकसभा निवडणुकीत भाजपा उमेदवार डॉ़ सुनील गायकवाड यांना विक्रमी मताधिक्य लोहा विधानसभा मतदारसंघात मिळाले़

गंगाधर तोगरे , कंधार लोकसभा निवडणुकीत भाजपा उमेदवार डॉ़ सुनील गायकवाड यांना विक्रमी मताधिक्य लोहा विधानसभा मतदारसंघात मिळाले़ त्यामुळे काँग्रेस-राकाँमधील मातब्बर पुढार्‍यांना आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मोठ्या अग्नीपरीक्षेला सामोरे जावे लागणार आहे़ परंतु भाजपाला आशेची पालवी फुटेल असा उत्साह संचारला आहे़ उमेदवारीचे अडथळे पार करून कोण बाजी मारणार यावर राजकीय चर्र्चेने उधाण आणले आहे़ कंधार-लोहा हा तसा विरोधी पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो़ भाई केशवराव धोंडगे यांनी या भागाचे सर्वाधिक वेळा प्रतिनिधित्व केले़ तरीही गावपातळीपर्यंत काँग्रेस मजबूत स्थितीत राहत आली़ काँग्रेसचे कैग़ोविंदराव मोरे व ईश्वरराव भोसीकर यांना विधानसभेची संधी मिळाली होती़ गुरुनाथराव कुरूडे, प्रतापराव पा़ चिखलीकर यांना प्रत्येकी एक वेळा संधी मिळाली़ तर रोहिदास चव्हाण यांना दोन वेळा संधी मिळाली़ २००९ मध्ये अशोकराव चव्हाण यांनी अत्यंत राजकीय डावपेचाने शंकरअण्णा धोंडगे यांच्यासाठी प्रतिष्ठा वापरली़ काँग्रेसच्या हक्काची विधानसभा राक़ाँ़ला गेल्याने पक्षात मरगळ आली़ २००४ साली विधानसभेत काँग्रेसचे सहयोगी सदस्य असलेले चिखलीकर यांची राजकीय कोंडी झाली़ अशोकराव चव्हाण यांच्याशी घेतलेला राजकीय पंगा काँग्रेस उमेदवारी शेकडो मैल दूर घेवून गेली़ चिखलीकर विरोधात सर्वांची एकजुट झाली़ यासाठी राजकीय व्युहरचना अशोकरावांनी केली़ त्याला यश आले़ परंतु काँग्रेस पक्ष दुबळा झाला़ राष्ट्रवादी काँग्रेसने आपला पक्ष मजबूत होण्याकडे अधिक लक्ष दिले़ कंधार-लोह्यातील ऩप़ निवडणुकीत चिखलीकर विरोधात सर्व पुढारी एकत्रित आले़ परंतु चिखलीकरांना कंधार ऩप़मध्ये रोखण्यात अपयश आले़ लोह्यात मात्र चिखलीकराचा मनोरथ रोखण्यात आला़ हे शहकाटशहाचे राजकारण पक्षापेक्षा व्यक्तीपुरते मर्यादित झाले़ २००४ साली लातूर लोकसभा निवडणुकीचे काँग्रेस उमेदवार आवळे यांच्यासाठी प्रचार यंत्रणा चिखलीकर यांच्याकडे होती़ त्यामुळे पुन्हा चिखलीकर विरोध झाला़ काँग्रेसच्या मोजक्या नेत्या-कार्यकर्त्याचा अपवाद वगळता काँग्रेस-राकाँने भाजपा उमेदवाराचा छुपा प्रचार केला़ त्यामुळे लोहा विधानसभा मतदारसंघात भाजपाला १७ हजारांपेक्षा अधिक मतांची आघाडी मिळाली़ लातूर व लातूर ग्रामीण या दोन मतदारसंघाच्या आघाडीमुळे आवळे निवडून आले़ २००९ ची लोकसभा निवडणूक नमोविरूद्ध काँग्रेस-राकाँ आघाडी अशीच झाली़ त्यात पुन्हा आघाडी धर्म कागदावर पाळण्यात आला़ परंतु मनोमिलन हे काँग्रेस-राकाँचे झाले नाही़ शेकापने आपले स्वतंत्र अस्तित्व दाखविण्यासाठी भाजपा उमेदवाराची प्रचार यंत्रणा अ‍ॅड़मुक्तेश्वर धोंडगे यांनी हाती घेतली़ मोदीमय वातावरण आणि त्याचे मतात रुपांतर करण्यासाठी अ‍ॅड़धोंडगे यांनी जि़प़ सदस्य प्रा़डॉ़ पुरूषोत्तम धोंडगे, बाबूराव कागणे, धोंडिबा भायेगावे, भानुदास गीते, वारकड गुरूजी, उत्तम चव्हाण, शरद मुंडे, गंगाप्रसाद यन्नावार, माधव मुसळे आदींची साथ घेतली़ लोहा विधानसभा निवडणुकीला ५-६ महिन्याचा अवधी आहे़ परंतु लोकसभा निवडणुकीवरून मताच्या बेरीज-वजाबाकीची आकडेमोड मात्र जोरात चालू असून विद्यमान आमदार शंकरअण्णा धोंडगे यांना मोठी राजकीय मशागत करावी लागणार आहे़ त्यातच चिखलीकरांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने शंकरअण्णांच्या उमेदवारीला मोठा अडथळा येणार आहे़ सिंचनाची कामे करण्यावर भर दिला जात असताना ग्रामीण भागातील भाजपाला झालेले मतदान ही मोठी समस्या झाली आहे़ लातूर लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या लोहा विधानसभा मतदारसंघाची आघाडी नेत्रदीपक आहे़ भाजपा उमेदवाराला ९५ हजार २४९ तर काँगे्रसचे बनसोडे गुरूजी यांना ३६ हजार ९३३ मते मिळाली़ मागील लोकसभा निवडणुकीपेक्षा भाजपाला तिप्पट मतांची आघाडी लोह्याने दिली़