शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

ऐतिहासिक दौलताबाद किल्ल्याला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 00:24 IST

वैशाख वणवा : वनसंपदा खाक; वन्यजीवांची होरपळ, पक्ष्यांची घरटीही जळाली

दौलताबाद : ऐतिहासिक दौलताबाद किल्ल्याला शुक्रवारी दुपारी आग लागल्याने लाखमोलाची वनसंपदा जळून खाक होऊन वन्यजीवांची होरपळ झाली. रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे प्रयत्न सुरु होते. दरवर्षी किल्ल्याला आग लागते, परंतु याकडे कुणीही गांभीर्याने लक्ष देत नसल्याने ऐतिहासिक ठेव्याला धोका निर्माण झाला आहे. एवढी मोठी घटना घडूनही वन अधिकारी किंवा कर्मचारी इकडे फिरकले नाहीत.आगीचे कारण कळू शकले नाही. जमिनीपासून जवळपास ७०० फूट उंचावर आग लागल्याने तेथे जाणेही अवघड असल्याने सर्वांचे प्रयत्न अयशस्वी झाले. किल्ला कर्मचारी व औरंगाबाद मनपाच्या अग्निशमन दलाच्या जवानांनीही आग विझविण्यासाठी अनेक युक्त्या करुन पाहिल्या, परंतु तेही हतबल होऊन परतले.दौलताबाद किल्ल्याच्या डोंगराला दुपारी चार वाजेच्या सुमारास गणपती मंदिराजवळून आग लागली. यानंतर १० ते १२ किल्ला कर्मचाऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. उन्हाचा पारा जास्त असल्याने त्यात वाराही सुटल्याने बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केले. दौलताबाद किल्ला हा जगप्रसिद्ध असून दररोज हजारो पर्यटक येथे भेटी देतात. किल्ला परिसर एकूण ३०० एकरचा असून मुख्य किल्ल्याच्या डोंगरालाच पाच एकरमध्ये ही आग लागली. कडक उन्हामुळे मोजकेच पर्यटक किल्ल्यावर होते, त्यांनी आग पाहताच सुरक्षितस्थळी धाव घेतली.वन्यजीवांची होरपळ; पक्ष्यांची घरटेही खाकया आगीत वनसंपदा खाक झाली. पक्षी व सरपटणाºया प्राण्यांनाही या आगीची झळ पोहोचली. या परिसरात मोरांची संख्या जास्त आहे. आग लागताच पक्षी या झाडावरुन त्या झाडावर सैरावैरा उडताना दिसत होते. झाडांवरील अनेक पक्ष्यांची घरटी जळून खाक झाली. मोरही सुरक्षित स्थळी धावताना दिसले. खंदकमध्येही आग पसरल्याने मोठी झाडे खाक झाली. येथील पक्ष्यांचा चिवचिवाट मनाला सुन्न करणारा होता. किल्ल्यावर बारादरी, गणपती मंदिर, संत जनार्दन स्वामी महाराज यांच्या पादुका, अनेक तोफा असून या ऐतिहासिक वास्तू मात्र सुरक्षित आहे.दोन वर्षांपूर्वी कर्मचाºयाचा मृत्यूमागील एक वर्ष वगळता प्रत्येक वर्षी या किल्ल्याच्या डोंगराला आग लागते. यावर उपाययोजना कुणीही करीत नसल्याने किल्ल्याला हानी पोहोचत आहे. दोन वर्षापूर्वी अशीच आग लागल्यानंतर ती विझविण्याच्या प्रयत्नात अब्दुल कदीर या कर्मचाºयाचा होरपळून मृत्यू झाला होता. यावर गांभीर्याने विचार होण्याची गरज आहे.भारतीय पुरातत्व अधिकारी, कर्मचाºयांचे शर्थीचे प्रयत्नया किल्ल्यावरील भारतीय पुरातत्व विभागाचे संरक्षण सहायक संजय बी. रोहनकर यांनी सांगितले की, आज आगीची माहिती मिळताच मी स्वत: कर्मचारी मच्छिंद्र देवरे, सतीश गायकवाड, बाबासाहेब आढाव, आसाराम काळे, सीताराम धनाईत, संजय घुसळे, फकीरचंद गायकवाड यांच्यासह दहा -बारा कर्मचारी घेऊन घटनास्थळी गेलो. जॅकेट घालून व दहा उपकरणे घेऊन आग विझवायला सुरुवात केली. परंतु वारा व उन्हामुळे आमचे सर्व प्रयत्न असफल झाले. या आगीत मात्र ऐतिहासिक वास्तूचे काहीही नुकसान झाले नाही. पर्यटकही सुरक्षित असून सीसीटीव्ही कॅमेºयाची वीजही लगेच बंद केली. 

टॅग्स :Fortगडfireआग