शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

आर्थिक स्रोत घटले, तिजोरीत खडखडाट; महापालिका प्रशासकांसमोर आव्हानांचा ‘डोंगर’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2022 19:30 IST

महापालिका आणि स्मार्ट सिटीतील कामे, अशी दुहेरी कसरत त्यांना करावी लागणार आहे.

औरंगाबाद : महापालिका प्रशासक म्हणून आज सकाळी डॉ. अभिजित चौधरी यांनी पदभार स्वीकारला. महापालिका प्रशासनाने त्यांचे स्वागत केले. चौधरी यांच्यासमोर अनेक विकासकामांचे मोठे आव्हान असणार आहे. महापालिका आणि स्मार्ट सिटीतील कामे, अशी दुहेरी कसरत त्यांना करावी लागणार आहे. दोन्हीकडील तिजाेरीत खडखडाट असताना विकासरथ पुढे कशा पद्धतीने नेणार, याकडे औरंगाबादकरांचे लक्ष लागले आहे.

महापालिकेच्या तिजोरीत खडखडाटएप्रिल २०२० पासून महापालिकेने विकासकामांना ब्रेक लावला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात प्रत्येक वॉर्डाला प्रत्येकी १ कोटी रुपये देण्याची घोषणा झाली असली तरी प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरू झालेली नाही. ११५ कोटींपैकी मोजक्याच ८ ते ९ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक मंजूर झाले आहेत. रस्ते, ड्रेनेज आणि दूषित पाण्याचा प्रश्न अनेक वॉर्डांमध्ये गंभीर बनला आहे. वॉर्ड अभियंते याकडे अजिबात लक्ष द्यायला तयार नाहीत. लोकप्रतिनिधी नसल्यामुळे जुन्या शहरात तर ड्रेनेज चोकअप काढायला एक-एक महिना लागतोय. नवीन विकासकामे करण्यासाठी तिजोरीत पैसा नाही. अगोदरच कंत्राटदारांची जवळपास ३० कोटींची बिले थकीत आहेत. मागील दोन वर्षांमध्ये डागडुजीच्या नावावर जवळपास २० कोटींची बिले लेखा विभागात दाखल झाली.

आर्थिक स्रोत घटलेमालमत्ता कर, पाणीपट्टी आणि नगररचना विभाग हे मनपाच्या आर्थिक उत्पन्नाचे तीन मोठे स्रोत आहेत. सॉफ्टवेअरमधील त्रुटींमुळे मालमत्ता कर, पाणीपट्टी वसुलीत अनेक अडचणी येत आहेत. ८ जुलैपासून शासनाने बांधकाम परवानगी ऑनलाईन द्यावी, असे आदेश दिले. तेव्हापासून नगररचना विभागात एकही नवीन प्रस्ताव आलेला नाही. शासनाकडून दरमहा जीएसटीचा मोबदला म्हणून २४ कोटी रुपये येतात. या निधीतून कर्मचाऱ्यांचा फक्त पगार होतो. विजेचे बिल भरण्यासाठीही अनेकदा मनपाच्या तिजोरीत पैसे नसतात.

स्मार्ट सिटीत सर्व टेंडर झालेस्मार्ट सिटीचा प्रकल्प जवळपास १ हजार कोटींचा आहे. मागील काही वर्षांमध्ये स्मार्ट सिटी प्रशासनाने जवळपास ११५० कोटी रुपयांचे टेंडर काढून वर्कऑर्डरही देऊन टाकले. यामध्ये सर्वात मोठा प्रकल्प म्हणजे सफारी पार्क होय. २५० कोटी रुपये या कामावर खर्च होणार आहेत. याशिवाय ३१७ कोटी रुपये खर्च करून स्मार्ट रस्ते तयार करण्याचे काम सुरू झाले. १७० कोटींचा एमएसआय म्हणजेच सीसीटीव्ही-कमांड सेंटरचा प्रकल्प आहे. १०० स्मार्ट बसेस पूर्ण ताकदीने सुरू करणे विद्यमान सीईओ चौधरी यांच्यासमाेर आव्हान असेल. ६५ कोटींचा स्मार्ट स्कूल, ३० कोटींचा स्मार्ट हेल्थ हे उपक्रमही आहेत. या सर्व कामांवर फक्त देखरेख ठेवणे, नियोजित वेळेत ते पूर्ण करून घेणे एवढेच काम आता उरले आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका