शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
6
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
7
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
8
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
9
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
10
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
11
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
12
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
13
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
14
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
15
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
16
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
17
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
18
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
19
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
20
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी

अखेर पर्यटनस्थळे अनलॉक; मर्यादित प्रवेश, कोरोना नियमांचे पालन करण्याच्या आदेशासह परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 1:07 PM

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी बुधवारी सकाळी आदेश काढत काही नियमांसह गुरुवारी ( दि. १७ ) सकाळी ६ वाजेपासून जिल्ह्यातील पर्यटनस्थळे, ऐतिहासिक वास्तू उघडण्यास परवानगी दिली.

ठळक मुद्देजिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळे बंद असणार आहेत. सकाळ आणि संध्याकाळच्या सत्रात प्रत्येकी १००० पर्यटकांना प्रवेश

औरंगाबाद : ऐतहासिक पर्यटन स्थळे, स्मारके, संग्रहालय सुरु करण्याच्या भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने (एएसआय) सोमवारी दिलेल्या आदेशाची जिल्ह्यात गुरुवारपासून ( दि. १७ ) अंमलबजावणी करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी याबाबत अंतिम निर्णय घेत सकाळ आणि संध्याकाळच्या सत्रात मर्यादित प्रवेश संख्या आणि कोरोना नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या आदेशासह ही परवानगी दिली आहे.  

भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणच्या (एएसआय) अंतर्गत असलेली ऐतिहासिक पर्यटन स्थळे, स्मारके, संग्रहालये १६ जूनपासून उघडण्याचे आदेश भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने दिले होते. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी एएसआयच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्याशी पत्रव्यवहार केला. यानंतर जिल्हाधिकारी चव्हाण यांनी बुधवारी सकाळी गुरुवारपासून ( दि. १७ ) जिल्ह्यातील पर्यटन स्थळे, स्मारके आणि संग्रहालये उघडण्याची परवानगी दिली. यानुसार भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणच्या अंतर्गत औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात असलेली जगप्रसिद्ध वेरूळ- अजिंठा लेणी, बीबी का मकबरा, दौलताबाद किल्ला आणि खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर या ऐतिहासिक वास्तू अनलॉक होणार आहेत.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मागील अनेक दिवसांपासून पर्यटन स्थळे बंद आहेत. अनेक बाबी अनलॉक झाल्यानंतर पर्यटनस्थळे खुली करण्यात यावीत अशी मागणी करण्यात येत आहे. यानुसार एएसआयने सोमवारी जारी केलेल्या आदेशात म्हटले की, १६ जूनपासून एएसआयच्या अंतर्गत असलेली सर्व स्मारके, पुरातन स्थळे सुरू करण्यात यावीत, ही स्मारके, पुरातन स्थळे सुरू करताना संबंधित राज्य आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापनांच्या नियमांची अंमलबजावणी करणे बंधनकारक असल्याचेही स्पष्ट केले. यानंतर एएसआयच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट देत ऐतिहासिक वास्तू उघडण्याविषयी निर्णय घेण्यासाठी चर्चा केली. यानंतर जिल्हाधिकारी चव्हाण यांनी बुधवारी सकाळी आदेश काढत काही नियमांसह गुरुवारी ( दि. १७ ) सकाळी ६ वाजेपासून जिल्ह्यातील पर्यटनस्थळे, ऐतिहासिक वास्तू उघडण्यास परवानगी दिली. सकाळ आणि संध्याकाळच्या सत्रात प्रत्येकी १००० पर्यटकांना यावेळी परवानगी देण्यात आली आहे. तसेच मास्क वापर, सामाजिक अंतर अशा कोरोना नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. दरम्यान, जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळे बंद असणार आहेत. 

टॅग्स :tourismपर्यटनAurangabadऔरंगाबादAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद