शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
4
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
5
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
6
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
7
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
8
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
9
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
10
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
11
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
12
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
13
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
14
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
15
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
16
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
17
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
18
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
19
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
20
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र

अखेर रामलीला मैदानावरील अतिक्रमण हटवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 4:55 PM

महसूल विभाग व नगरपालिकेच्या वतीने सकाळी सात वाजेपासूनच अतिक्रमण हटविण्यास सुरुवात केली.

ऑनलाईन लोकमत
 
हिंगोली : रामलीला मैदानावरील अतिक्रमणधारकांना अतिक्रमण स्वत:हून  काढून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र; यास न जुमानत अतिक्रमण जैसे थे होते. यामुळे आज महसूल विभाग व नगरपालिकेच्या वतीने सकाळी सात वाजेपासूनच अतिक्रमण हटविण्यास सुरुवात केली. 
 
पालिकेच्या वतीने शहरातील अतिक्रमण हटविण्यासाठी ४ जुलै हि तारीख निश्चित करण्यात आली होती.  परंतु; या दिवशी आषाढी एकादशी असल्याने संपूर्ण पोलीस बंदोबस्त नर्सी येथे होता. यामुळे या हि मोहीम तेव्हा रद्द झाली होती. ती  काढण्यात येणाºया अतिक्रमणाची अजूनही तारीखी निश्चित झालेली नसली तरी महसूल विभागाने मात्र शनिवारी अगदी सकाळी सात वाजेपासूनच अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली. अचानक सुरु झालेल्या मोहिमेमुळे अतिक्रमणधारकांना पळता भुई थोडी झाली होती.
 
पोलीस बंदोबस्त असल्याने अतिक्रमणधारक आपलेच दुकान असल्याचे सांगण्यासही घाबरत होते. अतिक्रमण मोहीम सुरु असतानााच काही अतिक्रमणधारक धाडस करुन दुकानातील साहित्य इतरत्र हलविण्याचा प्रयत्न करताना दिसत होते. आॅटो, टेम्पो, हातगाडा, बैलगाडी अशा मिळेल त्या वाहनाचा आधार घेत जिवाच्या आकांताने त्यांची खटाटोप सुरू होती. तर दुसरीकडे जसजसा जेसीबी जवळ येत होता, तशी काळजात धडकी भरत होती.
 
यात अनेकांनी केवळ महागड्या वस्तू वाचविण्याचा प्रयत्न केला. जेसीबीसमोर जे दुकान येईल, त्याचा संपूर्ण नायनाट केला जात होता. अनेक खोके तर जागीच दाबले. पत्र्याचे शेड पाडले. लोखंडी पक्के शेडही यात धाराशाही पडले.  अतिक्रमणावर जेसीबी फिरविल्यानंतर नागरिक बोंब ठोकत होते. मात्र पोलीस सतर्क व तगड्या संख्येत असल्याने काहीच तरणोपाय नव्हता. काहीजण तर बस्तान हलविताना पडून जखमीही झाले. तसेच या ठिकाणी मोठा जमाव जमला होता.
 
सकाळी सात वाजता सुरु झालेली अतिक्रमण मोहीम दुपारी १ च्या सुमारास शांत झाली होती. नेहमीच गर्दी असलेल्या  रामलीला मैदानावरील दुकाने हटविल्याने, मोकळे मैदान तयार झाले. मात्र जेसीबीच्या साह्याने नुकसान झालेल्या दुकानाचे साहित्य सायंकाळपर्यंत अतिक्रमणधारक गोळा करीत होते. तर काही आहे त्या आवस्थेत सोडून आपले साहित्य नेण्यासाठी धावपळ करीत होते.  
 
सगळीकडे टप-या नेणारी वाहने
अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू असताना शहरातील सर्वच रस्त्यांवर टप-या  वाहून नेणारीच वाहने, हातगाडे दिसत होते. आता यापुढे व्यवसाय कसा व कुठे करायचा, या चिंतेत हे ओझे वाहून नेत ही मंडळी डोळ्यातून अश्रुही ढाळत होती. मात्र; अतिक्रमण करूनच बस्तान असल्याने कैफियत तरी मांडायची कुठे? हाही प्रश्नच होता.