शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
3
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
4
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
5
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
6
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
7
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
8
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
9
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
10
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
11
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
12
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
13
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
14
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
15
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
16
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
17
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
18
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
19
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
20
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
Daily Top 2Weekly Top 5

चाचणीत जलशुद्धीकरण केंद्र नापास! तज्ज्ञ अधिकाऱ्यांकडून वारंवार चुका, वाढीव पाण्याला विलंब

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 19:43 IST

१५ ऑगस्टपूर्वी शहराला २६ एमएलडी तरी वाढीव पाणी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, चाचणी अयशस्वी ठरल्याने लवकर वाढीव पाणी मिळण्याची शक्यता धूसर बनली आहे.

छत्रपती संभाजीनगर : शहराला वाढीव पाणी मिळण्यासाठी फारोळा येथे २६ एमएलडी क्षमतेचे नवीन जलशुद्धीकरण केंद्र उभारले. याची टेस्टिंग गुरुवारपासून सुरू करण्यात आली. पहिल्याच दिवशी चाचणीमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या (मजीप्रा) तज्ज्ञ अधिकाऱ्यांना अपयश आले. जलशुद्धीकरण केंद्रात पडत असलेले पाणी परत जलवाहिनीद्वारे उलट दिशेने जात असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. त्यामुळे चाचणी थांबवून तांत्रिक त्रुटी दूर करण्याचे काम सुरू झाले. हे काम किती दिवस चालेल, हे निश्चित नाही. १५ ऑगस्टपर्यंत तरी वाढीव पाणी मिळण्याची चिन्हे नाहीत.

पाणीपुरवठा योजनांवर काम करण्याचा दांडगा अनुभव महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना आहे. त्यामुळे शासनाने २४० कोटींच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम मजीप्राकडे सोपविले. या कामातही प्रचंड उणिवा असल्याचे दिसत आहे. योजनेचे काम पूर्ण होईपर्यंत शहराला वाढीव पाणी मिळावे, या हेतूने २०० कोटी रुपये खर्च करून ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत टाकली. त्यासाठी लागणारे जलशुद्धिकरण केंद्रच मजीप्राने तयार केले नव्हते. दीड वर्षाच्या प्रतीक्षेनंतर कसेबसे जलशुद्धीकरण केंद्र तयार झाले. २६ एमएलडी पाण्यासाठी गुरुवारपासून चाचणी सुरू केली. पहिल्या दिवशी यातील पाणी उलट दिशेने जात असल्याचे लक्षात आले. पाणी शुद्ध होण्यात अनेक अडचणी येत असल्याने टेस्टिंग थांबविण्यात आली. शुक्रवारीही चाचणीचे काम झाले नाही. कारण गुरुवारी दिसलेल्या अडचणींवर मार्ग काढण्याचे काम सुरू आहे. लवकरच चाचणी सुरू होईल.

१५ ऑगस्टपूर्वी पाणी मिळणे अशक्यमजीप्राने चाचणीसाठी ७०० आणि ९०० मिमी व्यासाच्या जलवाहिन्या बंद ठेवल्या होत्या. त्यामुळे शहराला कमी पाणी मिळू लागले. १५ ऑगस्टपूर्वी शहराला २६ एमएलडी तरी वाढीव पाणी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, चाचणी अयशस्वी ठरल्याने लवकर वाढीव पाणी मिळण्याची शक्यता धूसर बनली आहे.

नागरिकांना वेठीस धरणारे दोषी कोण? १) ९०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीतून ७५ एमएलडी वाढीव पाणी मिळेल, असा दावा अगोदर करण्यात आला होता. प्रत्यक्षात १२ एमएलडी पाणी फारोळ्यापर्यंत येऊ लागले. नवीन जलशुद्धीकरण केंद्र सुरू झाल्यावर किमान २६ एमएलडी पाणी मिळेल, असे दिवास्वप्न शहरवासीयांना दाखविण्यात आले. जलशुद्धीकरण केंद्र उभारणाऱ्या कंत्राटदाराला ६ महिन्यांपासून वारंवार मुदतवाढ दिली जात आहे. संपूर्ण शहराला वेठीस धरणाऱ्या दोषींवर मजीप्रा कोणती कारवाई करणार आहे? २०० कोटींच्या कामाला प्रकल्प सल्लागार समिती आहे, तर तांत्रिक अडचणी येतातच कशा?

२) नवीन जलशुद्धीकरण केंद्रातील चाचणी फसली. फिल्टर बेट, ड्रेनमधील पाणी उलट येत आहे. त्यामुळे परत दुरुस्तीचे काम करावे लागणार? यामध्ये वेळ आणि पैसा खर्च होणार आहे. या उधळपट्टीला जबाबदार कोण? कंत्राटदाराला दररोज दंड लावण्यात येतोय, अशी घोषणा केली. प्रत्यक्षात दंडाची ही रक्कम वसूल होणार आहे का? या दंडामुळे शहरवासीयांना होणारा पाण्याचा त्रास कमी होणार का? मजीप्रा हा तज्ज्ञ शासकीय विभाग असताना अशा मोठ्या चुका होतातच कशा?

३) १९७३ पासून शहराची तहान भागविणारी ७०० मिमी व्यासाची जलवाहिनी कायमस्वरूपी बंद करा, असा आग्रह मजीप्राचा मनपासमोर आहे. ही जलवाहिनी सध्या शहराला ३५ ते ४० एमएलडी पाणी देते. ही जलवाहिनी बंद केली तर नवीन जलवाहिनीतून ७५ एमएलडी पाणी मिळेल, असा अजब दावा केला जातोय. मनपाने हा प्रस्ताव मान्य केला तरी ९०० मिमीमधून खात्रीशीर ७५ एमएलडी पाणी मिळायला तर हवे.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरWaterपाणीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका