शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

शेतकरी तरुणांना लग्नासाठी लावला जातोय लाखोंचा चुना; फसवणाऱ्यांच्या टोळ्या सक्रिय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 20:44 IST

काही तरुणांनी समाजाच्या दबावाखाली आणि कुटुंबाच्या आग्रहाखातर दलालांमार्फत मुली आणून लग्न केले. पण, काही महिन्यांतच वधूने पोबारा केल्याच्याही घटना घडल्या.

- प्राची पाटील

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील प्रत्येक लहान गावातही लग्न रखडलेले किमान ५० शेतकरी तरुण आहेत. अनेक ठिकाणी लग्नासाठी ‘विकत’ मुली आणण्याचे प्रमाण वाढले आहे. यातूनच शेतकऱ्यांना लग्नाच्या नावाने लाखोंचा गंडा घातला जात आहे. ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी आपबिती सांगितली. लग्नाळू शेतकरी तरुणांचे विवाह आणि त्यातून निर्माण झालेल्या दलालीच्या या बाजारात नात्यांचा आधार प्रेम नव्हे, तर फक्त पैसा आहे.

काही तरुणांनी समाजाच्या दबावाखाली आणि कुटुंबाच्या आग्रहाखातर दलालांमार्फत मुली आणून लग्न केले. पण, काही महिन्यांतच वधूने पोबारा केल्याच्याही घटना घडल्या. नोकरी करणाऱ्यांना लग्नाच्या बाजारात अधिक भाव आहे. वर्षानुवर्षे प्रयत्न करून मुलगी मिळत नसल्याने अनेक जण दलालांच्या या जाळ्यात सहज फसत आहेत. अनेक दलाल बिहार, झारखंड, मध्य प्रदेश यांसारख्या राज्यांतून मुलींना पैसे देऊन आणतात. लग्न ठरवण्यासाठी ३ ते १० लाखांपर्यंत रक्कम घेतात. बनावट कागदपत्रे वापरून लग्न होते आणि काही दिवसांत नवरी आणि एजंटही गायब होतात. या व्यवहारात कोणताही पुरावा नसल्याने तक्रार करतानाही अडचणी येतात.

केस १ -३० वर्षीय बबलूला (नाव बदलले आहे.) शेतीमुळे गावातच काय, दूर-दूरही मुलगी मिळत नव्हती. त्यांना धुळ्यातील एकाने स्थळ दाखवले. त्या बदल्यात २ लाख देण्यात आले. पुढे यात शामराव आणि दीपिका या व्यक्तींनी छत्रपती संभाजीनगरमध्ये आश्रमात लग्नासाठी खूप मुली असल्याचे सांगत त्यांच्याकडून ३ लाख उकळले. मात्र, पुन्हा त्या दोघांचा फोन कधीच लागला नाही. नंतर एका वेगळ्या दलालामार्फत त्यांनी २ लाख देऊन छत्रपती संभाजीनगरमध्ये एका मुलीशी लग्न केले. मात्र ७-८ महिन्यांतच या मुलीनेही सुंबाल्या केला.

केस २-२८ वर्षीय अनिल (नाव बदलले आहे.) याने लग्नासाठी मध्यस्थामार्फत पावरी समाजातील मुलगी निवडली. अडीच लाखांमध्ये सौदा झाला. मुलीच्या गावातील एका जंगलात असलेल्या महादेव मंदिरात साध्या पद्धतीने लग्न झाले. लग्नानंतर पहिल्यांदा मुलीने माहेरी जाण्याचा हट्ट धरला. पतीही तिच्यासोबत गेला, मात्र रस्त्यातच पतीला चकवा देत मुलगी निसटली. त्यानंतर ते कुटुंब पुन्हा कधीही त्यांना त्या गावात दिसले नाही.

पुढाऱ्यांनी शेतकऱ्यांना मुली द्याव्यातशेतकऱ्यांच्या पिकाला योग्य हमीभाव मिळत नाही. त्यामुळे भविष्याचा विचार करून मुली नोकरदारांची निवड करत आहेत. पुढाऱ्यांनी आपल्या मुली शेतकऱ्यांना द्याव्यात. म्हणजे, समाजात चांगला पायंडा पडेल. फसवणूक टाळण्यासाठी शेतकऱ्यांनीही खात्री करूनच मुलीची निवड करावी.- विजय काकडे, मुख्य समन्वयक, भारत क्रांती मिशन

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारीFarmerशेतकरीmarriageलग्न