शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

औरंगाबाद जिल्ह्यातील प्रकल्पांना दमदार पावसाची अपेक्षा; धरणे मृतसाठ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 18:41 IST

जिल्ह्यात मध्यम प्रकल्प १६ आहेत. त्या प्रकल्पात सद्य:स्थितीत शून्य टक्का पाणीसाठा आहे.

ठळक मुद्देआता टंचाईचे नियोजन शासनाकडे७३ लघु प्रकल्प कोरडेठाक

औरंगाबाद : जिल्ह्यातील प्रकल्पांना दमदार पावसाची अपेक्षा आहे. जून महिना संपला; परंतु या २३ दिवसांत प्रकल्प क्षेत्रांत पाऊस न झाल्यामुळे ते प्रकल्प अजूनही कोरडेच आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात जायकवाडी हे मोठे धरण असून, ते सध्या मृतसाठ्यात आहे. या वर्षी धरण क्षेत्रात फार कमी पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी जूनअखेरपर्यंत ११२ मि.मी. पाऊस धरण क्षेत्रात झाला होता. 

जिल्ह्यात मध्यम प्रकल्प १६ आहेत. त्या प्रकल्पात सद्य:स्थितीत शून्य टक्का पाणीसाठा आहे. २०५ दशलक्ष घनमीटर पाणी साठवण क्षमता त्या प्रकल्पांत आहे. मध्यम प्रकल्पांत सुखना, लहुकी, गिरिजा, वाकोद, खेळणा, अजिंठा अंधारी, अंबाडी, गडदगड, पूर्णा नेवपूर, अंजना पळशी, शिवना टाकळी, टेंभापुरी, ढेकू, कोल्ही, नारंगी, बोरदहेगाव यांचा समावेश आहे. ३० जून रोजी या प्रकल्पांच्या हद्दीत शून्य टक्का पाऊस झाला आहे. यातील १२ प्रकल्प कोरडे पडले आहेत. ४ प्रकल्प जोत्याच्या खाली आहेत. जिल्ह्यात १,३७२ गावे आहेत. त्यापैकी ७४३ गावे आणि २३८ वाड्यांवर टँकरने पाणीपुरवठा आहे. १,०६४ टँकर सध्या सुरू असून, १९ लाख २३ हजार ६३४ नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो आहे. ५३२ विहिरी प्रशासने अधिग्रहित केलेल्या आहेत. पावसाचे प्रमाण कमी असल्याने टंचाईच्या नियोजनासाठी वाढीव अनुदानाची गरज पडू शकते. 

७३ लघु प्रकल्प कोरडेठाक९३ लघु प्रकल्पांतील ७३ प्रकल्प कोरडे पडले आहेत. ११ प्रकल्पांत जोत्याखाली पाणी आहे. ९ प्रकल्पांत २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणी आहे. ९३ लघु प्रकल्पांत सध्या फक्त १ टक्का पाणी शिल्लक आहे. १८८ दशलक्ष घनमीटर पाणी सध्या त्या प्रकल्पांत असून, सदरील प्रकल्पांत गेल्या वर्षी ७.१४ टक्के पाणी होते.

आता टंचाईचे नियोजन शासनाकडेटंचाईचे नियोजन आता शासनाच्या अखत्यारीत जाणार आहे. दर तीन महिन्यांच्या नियोजनानुसार जिल्हा प्रशासनाने नियोजन केले. ३० जूनपर्यंत टंचाईचे नियोजन होते. तसेच नवीन अध्यादेशानुसार टंचाई, आपत्ती नियोजनावर काम करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे जबाबदारी देण्यात आली आहे.जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे पेरण्यांचा टक्का घसरला आहे. प्रकल्पातही कमी पाणीसाठा आहे. याचा प्रशासन आढावा घेत असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. ७ लाख हेक्टरच्या आसपास शेतकऱ्यांचा आकडा जिल्ह्यात आहे. खरीप पेरणीचे अहवाल घेतले जात आहेत. त्यानुसार प्रशासन नियोजन करणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले. 

टॅग्स :RainपाऊसJayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीAurangabadऔरंगाबाद