शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
2
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
3
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
4
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
5
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
6
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
7
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
8
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
9
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
10
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
11
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
12
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
13
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
14
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
15
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
16
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
17
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
18
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
19
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
20
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद जिल्ह्यातील प्रकल्पांना दमदार पावसाची अपेक्षा; धरणे मृतसाठ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 18:41 IST

जिल्ह्यात मध्यम प्रकल्प १६ आहेत. त्या प्रकल्पात सद्य:स्थितीत शून्य टक्का पाणीसाठा आहे.

ठळक मुद्देआता टंचाईचे नियोजन शासनाकडे७३ लघु प्रकल्प कोरडेठाक

औरंगाबाद : जिल्ह्यातील प्रकल्पांना दमदार पावसाची अपेक्षा आहे. जून महिना संपला; परंतु या २३ दिवसांत प्रकल्प क्षेत्रांत पाऊस न झाल्यामुळे ते प्रकल्प अजूनही कोरडेच आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात जायकवाडी हे मोठे धरण असून, ते सध्या मृतसाठ्यात आहे. या वर्षी धरण क्षेत्रात फार कमी पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी जूनअखेरपर्यंत ११२ मि.मी. पाऊस धरण क्षेत्रात झाला होता. 

जिल्ह्यात मध्यम प्रकल्प १६ आहेत. त्या प्रकल्पात सद्य:स्थितीत शून्य टक्का पाणीसाठा आहे. २०५ दशलक्ष घनमीटर पाणी साठवण क्षमता त्या प्रकल्पांत आहे. मध्यम प्रकल्पांत सुखना, लहुकी, गिरिजा, वाकोद, खेळणा, अजिंठा अंधारी, अंबाडी, गडदगड, पूर्णा नेवपूर, अंजना पळशी, शिवना टाकळी, टेंभापुरी, ढेकू, कोल्ही, नारंगी, बोरदहेगाव यांचा समावेश आहे. ३० जून रोजी या प्रकल्पांच्या हद्दीत शून्य टक्का पाऊस झाला आहे. यातील १२ प्रकल्प कोरडे पडले आहेत. ४ प्रकल्प जोत्याच्या खाली आहेत. जिल्ह्यात १,३७२ गावे आहेत. त्यापैकी ७४३ गावे आणि २३८ वाड्यांवर टँकरने पाणीपुरवठा आहे. १,०६४ टँकर सध्या सुरू असून, १९ लाख २३ हजार ६३४ नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो आहे. ५३२ विहिरी प्रशासने अधिग्रहित केलेल्या आहेत. पावसाचे प्रमाण कमी असल्याने टंचाईच्या नियोजनासाठी वाढीव अनुदानाची गरज पडू शकते. 

७३ लघु प्रकल्प कोरडेठाक९३ लघु प्रकल्पांतील ७३ प्रकल्प कोरडे पडले आहेत. ११ प्रकल्पांत जोत्याखाली पाणी आहे. ९ प्रकल्पांत २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणी आहे. ९३ लघु प्रकल्पांत सध्या फक्त १ टक्का पाणी शिल्लक आहे. १८८ दशलक्ष घनमीटर पाणी सध्या त्या प्रकल्पांत असून, सदरील प्रकल्पांत गेल्या वर्षी ७.१४ टक्के पाणी होते.

आता टंचाईचे नियोजन शासनाकडेटंचाईचे नियोजन आता शासनाच्या अखत्यारीत जाणार आहे. दर तीन महिन्यांच्या नियोजनानुसार जिल्हा प्रशासनाने नियोजन केले. ३० जूनपर्यंत टंचाईचे नियोजन होते. तसेच नवीन अध्यादेशानुसार टंचाई, आपत्ती नियोजनावर काम करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे जबाबदारी देण्यात आली आहे.जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे पेरण्यांचा टक्का घसरला आहे. प्रकल्पातही कमी पाणीसाठा आहे. याचा प्रशासन आढावा घेत असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. ७ लाख हेक्टरच्या आसपास शेतकऱ्यांचा आकडा जिल्ह्यात आहे. खरीप पेरणीचे अहवाल घेतले जात आहेत. त्यानुसार प्रशासन नियोजन करणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले. 

टॅग्स :RainपाऊसJayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीAurangabadऔरंगाबाद