शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

बीड बायपासची अपघाती मार्गाची ओळख पुसणार; अखेर रुंदीकरणाचे काम झाले सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2020 8:03 PM

आंदोलने, लोकप्रतिनिधी, प्रशासनाच्या पाठपुराव्यानंतर शासनाने दिला निधी

ठळक मुद्देचार उड्डाणपुलांसह १७ कि.मी. रस्त्याचे काम यातून होणार

- विकास राऊत 

औरंगाबाद : बीड बायपासच्या कामाला तीन महिन्यांनंतर मुहूर्त लागला असून, आठवडाभरापासून कामाला सुरुवात झाली आहे. लॉकडाऊनमुळे इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात काम करणाऱ्या हजारो परप्रांतीय मजुरांनी आपल्या गावाकडे धाव घेतल्यामुळे २९१ कोटींच्या बायपासच्या कामाला ग्रहण लागले होते; परंतु मजूर पुन्हा आल्यामुळे कामाने वेग घेतला आहे. 

अपघाती मार्ग म्हणून ओळख असलेल्या या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी मागील काही वर्षांपासून सातारा-देवळाईकरांनी वारंवार आंदोलने केली, तसेच लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर या रस्त्यासाठी निधी दिला आहे. जीएनआय इन्फ्रास्ट्रक्चर या कंत्राटदार कंपनीकडे या कामाचे कंत्राट देण्यात आले असून, याच कंत्राटदार कंपनीने शहरातील रेल्वेस्टेशन ते क्रांतीचौकसह अनेक रस्ते बांधलेले आहेत. ९२ कोटी रुपयांची इतर कामांसाठी तरतूद केली असून, ३८३ कोटींपैकी २९१ कोटींत हा पूर्ण प्रकल्प होणार आहे. ईपीसी हायब्रीड अ‍ॅन्युटी मॉडेलवर या रस्त्याचे काम करण्यात येणार असून, चार उड्डाणपुलांसह १७ कि.मी. रस्त्याचे काम यातून होणार आहे.  

आठवडाभरापासून  दीड किलोमीटरपर्यंत रस्त्याचे काम झाले आहे. पुलांचे कामही सुरू झाले आहे. भूसंपादनासाठी मनपा आणि बांधकाम विभागाने परिश्रम घेतले आहेत. शहरासाठी प्रलंबित असलेल्या प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. अनेक अडथळ्यांची शर्यत पार करून रस्त्याच्या कामाला निधी मिळाला आहे. २ वर्षांचा कालावधी असून, दीड वर्षात काम करण्याचा दावा कंत्राटदार जीएनआयने केला आहे. हायब्रीड अ‍ॅन्युटीमुळे ७० कोटींनी कमी निविदा देण्यात आली आहे. यामध्ये शासनाचा मोठा फायदा झाला आहे, असा दावा बांधकाम विभाग सूत्रांनी केला. 

चार उड्डाणपुलांच्या डिझाईनला मंजुरी एमआयटी, संग्रामनगर, देवळाई चौक आणि केम्ब्रिज शाळेसमोर, असे चार उड्डाणपूल या प्रकल्पात समाविष्ट आहेत. याचे डिझाईन बांधकाम विभागाकडे सादर करण्यात आले आहे. त्याला मंजुरी मिळाल्याची माहिती सूत्रांकडून समजली आहे. पुलांचे काम सुरू झाले आहे. स्वतंत्र अभियंता नियुक्तीसाठी जो खर्च होईल त्याची ५० टक्के रक्कम कंत्राटदाराला द्यावी लागणार आहे. एनएचएआयच्या धर्तीवर ही तरतूद करण्यात आली आहे. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादroad safetyरस्ते सुरक्षाfundsनिधी