शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

राजकीय भुकंपातही राष्ट्रवादी सुसाट; शिवसेना,कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 15:47 IST

ही राजकीय उलथापालथ पैठण तालुक्यातील राजकारणाला मोठी कलाटणी देणारी आहे.

पैठण (औरंगाबाद): राज्यात राजकीय उलथापालथ सुरु असताना पैठण मतदारसंघातील शिवसेनेचे बाजारसमितीचे संचालक, जि.प सदस्या शिल्पा कापसे यांचे पती ज्ञानेश्वर कापसे आणि काँग्रेसचे नगर परिषद गटनेते हसन्नोद्दीन कटयारे यांनी मुंबई येथे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते दत्ता गोर्डे, तालुका अध्यक्ष आप्पासाहेब निर्मळ यांची उपस्थिती होती. 

ही राजकीय उलथापालथ पैठण तालुक्यातील राजकारणाला मोठी कलाटणी देणारी आहे.  जिल्हा परिषद व नगरपरीषद निवडणुकीच्या तोडावर आपेगाव जि.प. सदस्य असलेल्या शिल्पा कापसे यांचे पती  ज्ञानेश्वर कापसे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्याने सेनेला मोठा झटका बसला आहे. बिडकीनचे जि.प. सदस्य विजय चव्हाण यांच्या पाठोपाठ ज्ञानेश्वर कापसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल झाल्याने ग्रामीण भागात राष्ट्रवादी पक्षाची ताकद वाढली आहे. शिवसेनेच्या तिकीटावर ज्ञानेश्वर कापसे यांनी गत निवडणुकीत पत्नीस निवडून आणले होते. यंदाही याच गटातून निवडणूक लढवायची त्यांची ईच्छा आहे. परंतु, अलिकडे त्यांना पक्षातून चांगली वागणूक मिळत नसल्याने ते नाराज होतो. या नाराजीतूनच त्यांनी  शिवसेनेला जयमहाराष्ट् केला.  

कॉंग्रेसचे गटनेते कटयारे राष्ट्रवादीतपैठण नगर परीषदेचे गटनेते तथा काँग्रेस पक्षाचे माजी शहराध्यक्ष हसन्नोद्दीन कटयारे यांनी देखील काँग्रेसची साथ सोडत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. हसनोद्दीन कटयारे यांच्या प्रवेशाने शहरात कमकुवत झालेल्या कॉंग्रेस पक्षाला मोठा झटका बसला आहे. हसनोद्दीन कटयारे यांना जिल्हाध्यक्ष डॉ कल्याण काळे यांनी पैठण शहराध्यक्ष पदावर नियुक्त केले होते. दरम्यान, प्रदेश कॉंग्रेसवर वर्णी लागताच माजी मंत्री अनील पटेल यांनी शहराध्यक्ष पदावर त्यांचे पुत्र निमेश पटेल यांची निवड केली. शहराध्यक्ष पदाचा हा वाद विकोपाला गेला होता शेवटी हसनोद्दीन कटयारे यांना हे पद सोडावे लागले. यामुळे ते नाराज होते व याच नाराजीतून त्यांनी कॉंग्रेस पक्षाला रामराम ठोकला आहे. पक्ष प्रवेशावेळी दत्ता गोर्डे, आप्पासाहेब निर्मळ, अनील घोडके, विजय चव्हाण, आप्पासाहेब गायकवाड, गौतम बनकर,  ज्ञानेश वाघ, कैलास चव्हाण, समद शेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते. 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसAurangabadऔरंगाबादMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ