शहरं
Join us  
Trending Stories
1
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
2
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
6
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
7
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
8
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
9
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
10
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
12
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
13
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
14
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
15
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
16
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
17
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

उन्हाळा संपला तरी सिडको-हडकोत आठ दिवसांनंतरही पाणी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2019 11:17 PM

जायकवाडीत पाणीपातळी झपाट्याने खालावत आहे. जेमतेम ११० एमएलडी पाणी दररोज शहरात आणण्यासाठी मनपाच्या पाणीपुरवठा विभागाला प्रचंड तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यातच सिडको-हडकोतील नागरिकांना आठ दिवसांनंतरही पाणी मिळायला तयार नाही. उन्हाळा संपला तरी सिडको-हडकोतील पाणीपुरवठा सुरळीत करण्यात मनपाला यश आलेले नाही.

ठळक मुद्देनागरिकांचा संताप : नगरसेवकाने टँकरचा पाणीपुरवठा बंद पाडला

औरंगाबाद : जायकवाडीत पाणीपातळी झपाट्याने खालावत आहे. जेमतेम ११० एमएलडी पाणी दररोज शहरात आणण्यासाठी मनपाच्या पाणीपुरवठा विभागाला प्रचंड तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यातच सिडको-हडकोतील नागरिकांना आठ दिवसांनंतरही पाणी मिळायला तयार नाही. उन्हाळा संपला तरी सिडको-हडकोतील पाणीपुरवठा सुरळीत करण्यात मनपाला यश आलेले नाही. मंगळवारी सकाळी नगरसेवक नितीन चित्ते यांनी एन-५ पाण्याच्या टाकीवर धाव घेऊन टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा बंद पाडला.सिडको-हडकोत मागील चार महिन्यांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. नागरिकांना आठ ते दहा दिवसांनंतर पाणी मिळत आहे. उन्हाळ्यात या भागातील नागरिकांना पाण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागला. पाण्यासाठी एन-५, एन-७ येथील जलकुंभावर अनेकदा आंदोलनेही झाली. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला सिडको-हडकोकडे लक्ष देता आले नाही. मंगळवारी पुन्हा एकदा नगरसेवक नितीन चित्ते यांनी आंदोलन केले. वॉर्डात आठ दिवसांनंतरही पाणी न आल्याने त्यांनी एन-५ येथील जलकुंभावर धाव घेतली. नागरिकांना पाणी न देता टँकर का भरले जात आहेत? म्हणून त्यांनी आक्षेप घेतला. त्यांनी टँकरचा पाणीपुरवठा बंद पाडला.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी