शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये चार्टर्ड विमान डोंगररांगांना धडकले; विमानाचा भीषण स्फोट, Video...
2
जपानच्या किनाऱ्यावर बोटींची पळापळ...! खोल समुद्रात जाण्यासाठी एकामागोमाग एक रांग,  १० फूट उंच त्सुनामीचा इशारा
3
Jammu Accident : २१ निष्पापांचा बळी घेणाऱ्या 'त्या' बसवर होते ८ चालान; उधमपूर अपघाताची इनसाईड स्टोरी!
4
मोठी बातमी! राजस्थानमधील रिफायनरीला भीषण आग, पंतप्रधान मोदी उद्या उद्घाटन करणार होते...
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशी खरंच रडला? सामना संपल्यानंतरच्या एका Video मुळे रंगलीये तुफान चर्चा
6
कामाची गोष्ट! तुम्हीही फोनच्या कव्हरमध्ये पैसे ठेवता? आताच व्हा सावध, सवय ठरेल जीवघेणी
7
सुभाषचंद्र बोस यांना 'राष्ट्रपुत्र' म्हणून घोषित करण्यात यावे! याचिकेवर सर्वोच्च न्यायालय संतप्त; म्हणाले...
8
Dharashiv Crime: 'तुझा काटाच काढतो', २० वर्षाच्या सुजितची काकानेच जमिनीच्या वादातून केली हत्या
9
"बायडन असो वा ट्रम्प, अमेरिकेचं वागणं सारखंच"; इराणने झिडकारला चर्चेचा प्रस्ताव; नेमकं कारण काय?
10
Numerology: शांत, अबोल तरी आत्मविश्वासाने परिपूर्ण असतात 'या' जन्मतारखेच्या व्यक्ती; पण....
11
Raja Shivaji Trailer: सगळ्यांच्या छाताडावर पाय रोवून हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहतोय आम्ही...; छत्रपतींच्या भूमिकेत रितेशची गर्जना, पाहा ट्रेलर
12
मद्यावर अल्कोहोलच्या प्रमाणानुसार कर लागणार, असे झाले तर हे राज्य पहिले ठरणार...
13
"व्ही.के.सिंग याने कशी अजित पवारांच्या अपघाताची कागदपत्रे नष्ट केली, याचा...", रोहित पवारांचा खळबळजनक आरोप
14
३२ धावांमध्ये टिपले ५ बळी... बांगलादेशच्या नाहिद राणाने न्यूझीलंडच्या फलंदाजांचा उधळला 'डाव'
15
'आम्ही डॉलरऐवजी चिनी युआनमध्ये व्यापार करू', UAE चा अमेरिकेला इशारा; युद्धावरून सुनावले
16
Bhuban Badyakar : 'कच्चा बादाम' फेम भुबन बड्याकरची मोठी फसवणूक; मनोरंजन सृष्टीतील लोकांनी स्वप्नं दाखवली अन्...
17
धक्कादायक! इराण देखील एमव्ही तूस्का जहाजाला घेरणार होता, पण क्रू मेंबरचे कुटुंब होते म्हणून...; युद्ध पेटणार...
18
महामार्गांवर नो पार्किंग; ढाबे आणि हॉटेल्सवरही बंदी; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल!
19
पश्चिम बंगालच्या निवडणुकीआधी वेगळीच खेळी; दारूच्या दुकानांबद्दल झाला मोठा निर्णय
20
डिजिटल लाइफस्टाईलचा धोका; तरुणांच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवर होतोय मोठा परिणाम 
Daily Top 2Weekly Top 5

नवीन मीटर बसवूनही वीज बिलांचा घोळ कायम

By admin | Updated: September 5, 2014 00:56 IST

तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा वीज उपकेंद्रांतर्गत वीज ग्राहकांना अचूक वीज बिल मिळावे, वीज चोरीस आळा बसावा, यासाठी १५०० मिटर नव्याने बसविण्यात आले.

तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा वीज उपकेंद्रांतर्गत वीज ग्राहकांना अचूक वीज बिल मिळावे, वीज चोरीस आळा बसावा, यासाठी १५०० मिटर नव्याने बसविण्यात आले. मात्र विजेचे बील जुन्याच मिटरच्या रिडींगआधारे दिली जात असून, यामुळे प्रत्यक्षात विजेचा वापर व बिलावरील देयक यात मोठी तफावत असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. माळुंब्रा वीज उपकेंद्रांतर्गत चार वीज उपकेंद्र आहेत. २२ गावातील जवळपास ८ ते १० हजार वीज ग्राहक आहेत. ८ महिन्यापूर्वी तत्कालीन कनिष्ठ अभियंता राजेंद्र पाठक यांनी ग्राहकांना अचूक वीज बील मिळावे, विजेची गळती रोखावी, चोरीला आळा बसावा यासाठी १५०० ग्राहकांना नव्याने अत्याधुनिक वीज मिटर बसविले. पण घरातील मिटर दारावर आणले. कुलूपबंद घर याचा होणारा गवगवा यातून वीज मिटर रिडींग घेण्यास अडचण येवू नये, यासाठी उपाययोजना केल्या. पण आठ महिन्यानंतरही माळुंब्रा वीज केंद्रातील ग्राहकांना जुन्याच मिटरच्या रिडींगप्रमाणे वीज बिल दिले जाते. सर्रास चुकीच्या वीज बिलाने ग्राहकांच्या माथी हजारो रुपयाचा भूर्दंड मारला जात आहे. सध्या घरगुती वीज बिलाबाबत वाढत्या तक्रारी असून, अनेक दुरुस्तीचे प्रस्ताव धूळखात तुळजापूर कार्यालयाकडे पडून आहेत. तरी चुकीची वीज बिलाची दुरुस्ती करावी, अशी मागणी वीज ग्राहकांतून होत आहे. (वार्ताहर)मिटरची रिडींग वेळेत व दर महिन्याला झाल्यास ग्राहकांना योग्य वीज देयक मिळेल. पण बील बनविणाऱ्या कर्मचाऱ्यास रिडींगमध्ये वापरलेले युनिटचा मेळ घालत सर्रास महिन्याला १ हजार ते १५०० रुपयाची बिले महिन्याला लादली जातात. दुरुस्तीच्या नावाखाली ग्राहक बील भरण्यास तयार होत नाही. नवीन बसविलेल्या मिटरप्रमाणे बिलाची आकारणी करावी.महिन्यात किती युनिट वीज वापरली याची नोंद दर महिन्याला घेतली जात नाही. त्यामुळे हे काम खासगी एजन्सीला दिले होते. तर मिटर रिडींग घेण्याचे बंद झाले तेंव्हा अंदाजपंचे महिन्यात किती युनिट बील दिले. त्यावरुन चालू महिन्यात तशाच प्रकारे वीज बिलाची आकारणी करुन वीज देयक दिले जात असल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत. ४याबाबत माळुंब्रा उपकेंद्राचे कनिष्ठ अभियंता सावळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, उपकेंद्रांतर्गत ज्या गावांत मिटर बसविले आहेत, त्यातील तीन गावांतील मिटरची नोंद संगणकात करण्याचे राहिले होते. हे काम सध्या प्रगतीपथावर असून, येत्या दोन-तीन दिवसांत ते पूर्ण होणार असून, यानंतर ग्राहकांना बिलाबाबत कसलीही अडचण येणार नाही. तसेच सध्याही ग्राहकाकडून जेवढी वीज वापरली तेवढेच बिल घेण्यात येत असल्याचे ते म्हणाले.