शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

सातारा-देवळाईसाठी स्वतंत्र नगर परिषद स्थापन करा; आमदार सतीश चव्हाण यांची विधान परिषदेत मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 19:09 IST

विधान परिषदेत तारांकित प्रश्नाद्वारे मागणी

ठळक मुद्देसोयी-सुविधांचा अभावदानवे यांची निधीची मागणी

औरंगाबाद : औरंगाबादेतील सातारा-देवळाईच्या विकासासाठी स्वतंत्र नगर परिषद स्थापन करावी, अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी बुधवारी (दि.२६) विधान परिषदेत तारांकित प्रश्नाद्वारे केली.

आ. चव्हाण यांनी सभागृहात तारांकित प्रश्न उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले. सातारा-देवळाई परिसरासाठी तत्कालीन आघाडी सरकारने नगरपालिका स्थापनेची अधिसूचना काढली होती. मात्र २०१६ मध्ये सातारा-देवळाई परिसराचे दोन वॉर्ड करून ते औरंगाबाद महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आले. महापालिकेत समावेश झाल्याने आपल्याला चांगल्या सोयी-सुविधा मिळतील, अशी तेथील नागरिकांची अपेक्षा होती. मात्र महानगरपालिकेने याठिकाणी अद्यापही कुठल्याही प्रकारच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या नसल्याचे सभागृहात सांगितले. 

ड्रेनेज, पिण्याचे पाणी, रस्त्याचा प्रश्न चार वर्षांपासून रखडलेलाच आहे. सेवा-सुविधांअभावी नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांच्या भावनांची मोडतोड करून नगर परिषद दोन वॉर्डात समाविष्ट करून समस्यांचा डोंगर उभा केला आहे.  त्यामुळे सातारा-देवळाईसाठी पुन्हा स्वतंत्र नगर परिषद स्थापन करून त्यासाठी शासनाने आवश्यक तो निधी उपलब्ध करून द्यावा, अशी आग्रही मागणी सभागृहात लावून धरली. 

आ. चव्हाण यांच्या प्रश्नाला उत्तर देताना नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, सातारा-देवळाई परिसरातील नागरिकांना मूलभूत सोयी-सुविधा मिळाव्यात यासाठी मुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्याशी चर्चा केली आहे. शासनाकडून या परिसरासाठी विविध कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, येथील सोयी-सुविधांचा अभाव लक्षात घेता अर्थसंकल्पात यासाठी आर्थिक तरतूददेखील करण्यात आली आहे. तसेच यासंदर्भात याच अधिवेशनात पालकमंत्री व सर्व संबंधितांची बैठक घेण्यात येईल, असे त्यांनी सभागृहात सांगितले.

दानवे यांची निधीची मागणीसातारा- देवळाई विषयावर लक्षवेधी चर्चा करताना या भागाच्या विकासासाठी किमान ४०० कोटींची आवश्यकता आहे, अशी मागणी आ. अंबादास दानवे यांनी सभागृहात चर्चा करताना केली.

टॅग्स :Satish Chavanसतीश चव्हाणSatara areaसातारा परिसरAurangabadऔरंगाबादAmbadas Danweyअंबादास दानवेAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका