शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश
2
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
3
भारताच्या ड्रग्ज तस्करांवरील कारवाईमुळे दाऊद इब्राहिमला धक्का; आता दक्षिण आफ्रिका आणि मेक्सिकोमधील नवीन ठिकाणांचा घेतोय शोध
4
भरला संसार मोडून प्रियकरासोबत पळाली ३ मुलांची आई, जाताना पैसे अन् दागिनेही लुटून गेली; पतीची पोलिसांत धाव
5
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
6
VIRAL : पत्नीच्या चारित्र्यावर संशय आला, पती अचानक बेडरूममध्ये शिरला अन् बेड उघडताच समोर आलं भयाण वास्तव!
7
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
8
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
9
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
10
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
11
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
12
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
13
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
14
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
15
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
16
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
17
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
18
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
19
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
20
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

अतिक्रमणे जमीनदोस्त

By admin | Updated: June 24, 2014 00:43 IST

परभणी: परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील रेल्वेस्टेशन, न्यायालय परिसरातील अनाधिकृत अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली. ही कारवाई सोमवारी सकाळी करण्यात आली.

परभणी: परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील रेल्वेस्टेशन, न्यायालय परिसरातील अनाधिकृत अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली. ही कारवाई सोमवारी सकाळी करण्यात आली.२३ जून रोजी सकाळी ६.३० वाजता महापालिकेच्या वतीने अतिक्रमण उठविण्यास सुरुवात करण्यात आली. आयुक्त अभय महाजन यांनी २१ जून रोजी या संदर्भात बैठक घेऊन उपायुक्त दीपक पुजारी, रणजीत पाटील, प्रभाग समिती ब चे अशोक पाटील, स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड, राजू झोडपे यांना अतिक्रमणे काढून घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. परिसरातील २५ कच्ची दुकाने, दोन पक्की दुकाने, आठ पानपट्ट्या पाडण्यात आल्या. पोलिस उपाधीक्षक प्रणय अशोक यांच्या नियंत्रणाखाली पोलिस पथक कार्यरत होते. दंगा नियंत्रण पोलिस पथक, स्वच्छता विभागाचे कर्मचारी दिमतीला होते. जेसीबी मशीनद्वारे अतिक्रमण काढण्यात आले. वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत नागेश जोशी, मेहराज अहेमद, के. बी. हैबते, गणेश लहाने, राजकुमार जाधव, विद्युत विभागाचे शेख महेबुब हे देखील उपस्थित होते. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी विद्युत मीटर काढण्यासाठी मदत केली. अनाधिकृत अतिक्रमणे पूर्णपणे काढून घेण्यात आली आहेत. पोलिस उपअधीक्षक प्रणय अशोक यांनी या ठिकाणी स्वत: उपस्थित राहून अतिक्रमणे काढून घेण्यास भाग पाडले. शहरात अनधिकृत अतिक्रमणे कोणीही करु नयेत, तसा प्रयत्न केल्यास कडक कारवाई केली जाईल, असे पोलिस प्रशासन व महापालिकेच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने सहा महिन्याखाली अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेण्यात आली होती. त्यावेळी नव्याने रुजू झालेल्या जिल्हाधिकारी एस. पी. सिंह यांच्या अतिक्रमण मोहिमेस जनतेतून पाठिंबा मिळत होता. बरीच अतिक्रमणे यावेळी काढण्यात आली. परंतु, त्यानंतर राजकीय दबावामुळे ही मोहीम थंड झाली. निवडणुका संपल्यानंतर मोहीम पुन्हा सुरु होणार असल्याचे सुतोवाच जिल्हाधिकाऱ्यांनी केले होते. त्याचाच एक भाग म्हणून महानगरपालिकेने ही कारवाई केली आहे. जनतेतून या मोहिमेचे स्वागत होत आहे.वीस वर्षापासून होती अतिक्रमणेमहानगरपालिकेच्या वतीने काढण्यात आलेली अतिक्रमणे ही मागील वीस वर्षापासूनची होती. महानगरपालिकेने तातडीने ही करवाई केली व जुनी अतिक्रमणे हटविली. ही मोहीम पुढे अशीच चालू रहावी, अशी अपेक्षा शहरवासियांकडून व्यक्त होत आहे. शहराच्या सर्वच भागात अतिक्रमणांचे प्रकार वाढले आहेत. दरवर्षी ही कारवाई होते. पाठोपाठ अतिक्रमणधारक पुन्हा त्या जागेवर कब्जा करतात. कारवाई पूर्ण झाल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी अतिक्रमण होऊ नये, याची दक्षताही महानगरपालिकेने घेणे गरजेचे आहे. अन्यथा हा केवळ वार्षिक उपक्रमच ठरु शकतो.