शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

होरपळलेल्या सत्ताधाऱ्यांच्या विधानसभेसाठी जोर‘बैठका’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 12:43 IST

शहरातील कचरा, पाणी प्रश्नाने मनपातील सत्ताधारीही चांगलेच पोळून निघाले आहेत.

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीचा अनुभव पाहता विकासकामे करूनच जनतेसमोर जावे लागणार हे सत्ताधाऱ्यांना कळून चुकले आहे. शहरातील कचरा, पाणी प्रश्नाने मनपातील सत्ताधारीही चांगलेच पोळून निघाले आहेत. विकासकामे मार्गी लावण्यासाठी महापौरांनी बैठकांवर जोर दिला आहे. २ मे रोजी चार वेगवेगळ्या विभागांच्या मॅरेथॉन बैठका बोलावल्या आहेत.

शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांची शहरी भागात मते मागताना यंदा बरीच दमछाक झाली. त्यावरून आगामी विधानसभा आणि महापालिकेच्या निवडणुका हिंदुत्वाच्या मुद्यावर अजिबात लढता येणार नाहीत, हे स्पष्ट झाले. शहरातील मतदारांनी मागील ३० वर्षांमध्ये शिवसेना-भाजप युतीला भरभरून मते दिली. या तुलनेत सत्ताधाऱ्यांनी नागरिकांना काय दिले...? नऊ दिवसांनंतर पाणी, कचऱ्याचे डोंगर, खराब रस्ते, २०० पेक्षा अधिक वसाहतींना टँकरनेही पाणी मिळत नाही, अशी अवस्था आहे. कधी हिंदुत्वाच्या तर कधी जातीय समीकरणाच्या आधारावर युतीने निवडणुका जिंकल्या. यंदा लोकसभा निवडणुकीत युतीचे कोणतेच कार्ड यशस्वी झाले नाही. मत मागायला गेलेल्या राजकीय कार्यकर्त्यांना असंख्य प्रश्न विचारून नागरिकांनी भंडावून सोडले होते. युतीच्या नेत्यांनी यापूर्वी शहरात असे चित्र कधीच बघितले नव्हते.

लोकसभा निवडणुकीतून बोध घेतलेल्या युतीच्या नेत्यांना पुढील विधानसभा, मनपाच्या निवडणुका सोप्या वाटत नाहीत. समांतर जलवाहिनी, कचरा प्रक्रिया प्रकल्प, भूमिगत गटार योजना, खराब रस्ते आदी महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. समांतर जलवाहिनीसाठी कितीही पैसा लागू द्या, पण निर्णय घ्या, असे वारंवार मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतरही मनपा पर्याय शोधू शकली नाही. आता राज्य शासनानेच यात मार्ग काढावा, असा आग्रह मनपा पदाधिकाऱ्यांतर्फे राज्य शासनाकडे धरण्यात येणार आहे. ३ जानेवारी रोजी मुख्यमंत्र्यांनी शहरातील रस्ते गुळगुळीत करण्यासाठी आणखी १२५ कोटींचा निधी देतो असे जाहीर केले. 

मागील चार महिन्यांत मनपातील सत्ताधारी, प्रशासनाला रस्त्यांची साधी यादी तयार करता आलेली नाही. मुख्यमंत्र्यांनी दोनदा स्थानिक भाजप नेत्यांसमोर यादीची आठवण करून दिल्यावरही मनपाला जाग आली नाही. २ मे रोजी महापौर नंदकुमार घोडेले काही महत्त्वाच्या प्रकल्पांवर चार वेगवेगळ्या विभागांची बैठक घेणार आहेत. विशेष बाब म्हणजे या बैठकीला आयुक्त डॉ. निपुण विनायक उपस्थित राहतील किंवा नाही, यावर साशंकता व्यक्त होत आहे.

प्रत्येक निर्णयात कोलदांडासत्ताधारी आणि प्रशासन ही एका वाहनाची दोन चाके समजल्या जातात. मागील वर्षभरात सत्ताधाऱ्यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांवर पाणी फेरण्याचे काम प्रशासनाने केले. पदाधिकाऱ्यांनी एखाद्या कामाची शिफारस केली एवढे मनात ठेवून ते कामच रद्द करण्याचा धक्कादायक निर्णय प्रशासनाने घेतला. पाणीपट्टीतील वाढीव रक्कम कमी करा, असा ठराव सर्वसाधारण सभेने घेतला. त्यानंतरही प्रशासन अंमलबजावणी करायला तयार नाही.  

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाPoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाBJPभाजपाAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019