शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

होरपळलेल्या सत्ताधाऱ्यांच्या विधानसभेसाठी जोर‘बैठका’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 12:43 IST

शहरातील कचरा, पाणी प्रश्नाने मनपातील सत्ताधारीही चांगलेच पोळून निघाले आहेत.

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीचा अनुभव पाहता विकासकामे करूनच जनतेसमोर जावे लागणार हे सत्ताधाऱ्यांना कळून चुकले आहे. शहरातील कचरा, पाणी प्रश्नाने मनपातील सत्ताधारीही चांगलेच पोळून निघाले आहेत. विकासकामे मार्गी लावण्यासाठी महापौरांनी बैठकांवर जोर दिला आहे. २ मे रोजी चार वेगवेगळ्या विभागांच्या मॅरेथॉन बैठका बोलावल्या आहेत.

शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांची शहरी भागात मते मागताना यंदा बरीच दमछाक झाली. त्यावरून आगामी विधानसभा आणि महापालिकेच्या निवडणुका हिंदुत्वाच्या मुद्यावर अजिबात लढता येणार नाहीत, हे स्पष्ट झाले. शहरातील मतदारांनी मागील ३० वर्षांमध्ये शिवसेना-भाजप युतीला भरभरून मते दिली. या तुलनेत सत्ताधाऱ्यांनी नागरिकांना काय दिले...? नऊ दिवसांनंतर पाणी, कचऱ्याचे डोंगर, खराब रस्ते, २०० पेक्षा अधिक वसाहतींना टँकरनेही पाणी मिळत नाही, अशी अवस्था आहे. कधी हिंदुत्वाच्या तर कधी जातीय समीकरणाच्या आधारावर युतीने निवडणुका जिंकल्या. यंदा लोकसभा निवडणुकीत युतीचे कोणतेच कार्ड यशस्वी झाले नाही. मत मागायला गेलेल्या राजकीय कार्यकर्त्यांना असंख्य प्रश्न विचारून नागरिकांनी भंडावून सोडले होते. युतीच्या नेत्यांनी यापूर्वी शहरात असे चित्र कधीच बघितले नव्हते.

लोकसभा निवडणुकीतून बोध घेतलेल्या युतीच्या नेत्यांना पुढील विधानसभा, मनपाच्या निवडणुका सोप्या वाटत नाहीत. समांतर जलवाहिनी, कचरा प्रक्रिया प्रकल्प, भूमिगत गटार योजना, खराब रस्ते आदी महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. समांतर जलवाहिनीसाठी कितीही पैसा लागू द्या, पण निर्णय घ्या, असे वारंवार मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतरही मनपा पर्याय शोधू शकली नाही. आता राज्य शासनानेच यात मार्ग काढावा, असा आग्रह मनपा पदाधिकाऱ्यांतर्फे राज्य शासनाकडे धरण्यात येणार आहे. ३ जानेवारी रोजी मुख्यमंत्र्यांनी शहरातील रस्ते गुळगुळीत करण्यासाठी आणखी १२५ कोटींचा निधी देतो असे जाहीर केले. 

मागील चार महिन्यांत मनपातील सत्ताधारी, प्रशासनाला रस्त्यांची साधी यादी तयार करता आलेली नाही. मुख्यमंत्र्यांनी दोनदा स्थानिक भाजप नेत्यांसमोर यादीची आठवण करून दिल्यावरही मनपाला जाग आली नाही. २ मे रोजी महापौर नंदकुमार घोडेले काही महत्त्वाच्या प्रकल्पांवर चार वेगवेगळ्या विभागांची बैठक घेणार आहेत. विशेष बाब म्हणजे या बैठकीला आयुक्त डॉ. निपुण विनायक उपस्थित राहतील किंवा नाही, यावर साशंकता व्यक्त होत आहे.

प्रत्येक निर्णयात कोलदांडासत्ताधारी आणि प्रशासन ही एका वाहनाची दोन चाके समजल्या जातात. मागील वर्षभरात सत्ताधाऱ्यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांवर पाणी फेरण्याचे काम प्रशासनाने केले. पदाधिकाऱ्यांनी एखाद्या कामाची शिफारस केली एवढे मनात ठेवून ते कामच रद्द करण्याचा धक्कादायक निर्णय प्रशासनाने घेतला. पाणीपट्टीतील वाढीव रक्कम कमी करा, असा ठराव सर्वसाधारण सभेने घेतला. त्यानंतरही प्रशासन अंमलबजावणी करायला तयार नाही.  

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाPoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाBJPभाजपाAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019