शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत आंतरराष्ट्रीय उद्योगसमूहांच्या परिषदेसाठी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:04 IST

औरंगाबाद : मराठवाड्याच्या औद्योगिकवाढीसाठी आगामी काळात औरंगाबादेत आंतरराष्ट्रीय उद्योगसमूहांचे व्यवस्थापकीय संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी आदींची परिषद भरविण्यासाठी प्रयत्न केले ...

औरंगाबाद : मराठवाड्याच्या औद्योगिकवाढीसाठी आगामी काळात औरंगाबादेत आंतरराष्ट्रीय उद्योगसमूहांचे व्यवस्थापकीय संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी आदींची परिषद भरविण्यासाठी प्रयत्न केले जाणार असून, त्यांना येथील बलस्थाने सांगून गुंतवणुकीबाबत आकर्षित केले जाईल, असे ‘सीएमआयए’चे अध्यक्ष शिवप्रसाद जाजू व उपाध्यक्ष नितीन गुप्ता यांनी सांगितले.

शुक्रवारी ‘सीएमआयए’च्या नवीन कार्यकारिणी सदस्यांचा पत्रकारांशी संवाद आयोजित करण्यात आला होता. यावेळी सचिव सतीश लोणीकर, उपाध्यक्ष नितीन गुप्ता, सहकोषाध्यक्ष अनिल माली यांची यावेळी उपस्थिती होती.

यावेळी जाजू म्हणाले, चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरच्या वतीने मागील ५३ वर्षांपासून विविध उपक्रम राबवित आहे. मागील दोन वर्षांपासून दहावी- बारावीच्या तरुणांना ‘स्ट्राइव्ह’ या उपक्रमांतर्गत प्रशिक्षण देऊन उद्योगांना कुशल मनुष्यबळ पुरविण्यात येत आहे. याअंतर्गत ६५० विद्यार्थी- विद्यार्थिनींना प्रशिक्षण देण्यात आले आहे. २०१५ नंतर ‘स्टार्ट अप इंडिया’, ‘इनोव्हेशन’ आणि ‘मेक इन इंडिया’ या संकल्पना पुढे आल्या. ‘सीएमआयए’ने ‘मॅजिक’ या संस्थेची स्थापना करून त्याद्वारे नव्याने या क्षेत्रात येणाऱ्या उद्योजक, अभियंत्यांना मार्गदर्शन केले जात आहे. देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयासोबत शुक्रवारी सामंजस्य करार करण्यात आला असून, ‘मॅजिक’च्या माध्यमातून भावी अभियंत्यांना प्रशिक्षित केले जाणार आहे.

गेल्यावर्षी २३ मार्चपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागले. ‘सीएमआयए’, ‘मासिआ’, ‘सीआयआय’, ‘औरंगाबाद फर्स्ट’, जिल्हा व्यापारी महासंघ या सर्व संघटनांनी मिळून उद्योग सुरू राहण्यासाठी प्रशासनास सर्वतोपरी मदत केली. सर्व उद्योगांमध्ये कोरोना नियमावलीचे पालन करण्याबाबत मार्गदर्शन केले. लसीकरणासाठीही पुढाकार घेतला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ‘सीएमआयए’मार्फत उद्योजकांनी ९ कोटींच्या वैद्यकीय उपकरणाची मदत केली. त्यात घाटीमध्ये ऑक्सिजन प्लांट, आरटी – पीसीआर तपासणी यंत्र, व्हेंटिलेटर आदींचा समावेश आहे. सतीश लोणीकर यांनी प्रास्तविक केले. अनिल माली यांनी आभार मानले.

चौकट.........................................

एप्रिलपासून इलेक्ट्रिक सबसिडी थांबली

मराठवाडा व विदर्भ या मागास भागातील उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी इलेक्ट्रिक सबसिडी दिली जात होती. त्यासाठी १२०० कोटींची तरतूद करण्यात आली होती. मात्र, पुणे, मुंबई व ठाणे सोडून राज्यातील अन्य काही भागांचा यामध्ये समावेश करण्यात आल्यामुळे ही रक्कम अपुरी पडत असून, एप्रिलपासून ती थांबली आहे. सबसिडीच्या रकमेत वाढ करून ती लवकरात लवकर सुरू करावी, यासाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत, असे शिवप्रसाद जाजू यांनी सांगितले.