शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
5
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
6
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
7
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
8
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
9
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
10
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
11
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
12
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
13
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
14
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
15
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
16
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
17
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
18
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
19
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!

स्थलांतरित विद्यार्थ्यांच्या शोधात शिक्षणाधिकारी गेल्या गुजरातेत; २२ उसतोड मंजुरांची मुलं परतली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 11:17 IST

ऊसतोडणीसाठी गेलेल्या मजुरांच्या मुलांना शाळेत पाठविण्यासाठी शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण या पथकासह थेट गुजरातमध्ये पोहोचल्या. त्याठिकाणी मजुरांच्या कोपीसमोर बसून संवाद साधत संबंधितांचे मन परिवर्तन केले.

छत्रपती संभाजीनगर : घरची आर्थिक परिस्थिती तोलामोलाची असल्यामुळे ग्रामीण भागातील अनेकांना पोटाची खळगी भरण्यासाठी गाव सोडून पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटकसह गुजरातमध्ये जावे लागते. घरी कोणीच नसल्यामुळे लहान मुलांनाही सोबत नेण्यात येते. त्यामुळे या मुलांची शाळा बंद पडते. अशा मुलांचा शोध घेण्यासाठी प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांच्यासह पथकाने ऊसतोडणीसाठी गेलेल्या मजुरांच्या मुलांच्या शोधासाठी गुजरात राज्य गाठले. त्याठिकाणी कन्नड तालुक्यातील २२ मुलांच्या पालकांचे मन परिवर्तन करीत मुलांना शाळेत पाठविण्यास राजी केले आहे.

जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या मार्गदर्शनात प्राथमिक शिक्षण विभागाने दिवाळीपूर्वी ऊसतोड मजूर स्थलांतर करण्यापूर्वीच अनेक पालकांचे समुपदेशन करीत मुलांना गावी ठेवण्यास भाग पाडले होते. त्यानंतरही काही पालकांना आपल्या पाल्यांना सोबत नेल्यामुळे त्यांना परत आणण्यासाठी बालरक्षक टीम पाठविण्यात आल्या होत्या. त्या माध्यमातून ५२ विद्यार्थ्यांना परत आणण्यात यश मिळाले. त्याचवेळी गुजरात राज्यातील कुकरमुंडा आणि नंदुरबार जिल्ह्यातील तळाेदा या ठिकाणी तब्बल २२ विद्यार्थी असल्याची माहिती मिळाली होती. या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी त्यांच्या पालकांचे समुपदेशन करणे आवश्यक होते. त्यामुळे प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांच्यासह उपशिक्षणाधिकारी नीता श्रीश्रीमाळ, गीता तांदळे, शिक्षण विस्तार अधिकारी संगीता सावळे, मुख्याध्यापक देविसिंग राजपूत, शिक्षक कल्याण पवार, किशोर आगळे, ज्ञानेश्वर वाघ यांची टीम या दोन्ही ठिकाणी पोहोचली. त्या ठिकाणी शिक्षणाधिकाऱ्यांनी ऊसतोड कामगारांच्या समस्या समजावून घेतल्या. त्यानंतर मुलांच्या शिक्षणाचे महत्त्व त्यांना पटवून सांगण्यात आले. तेव्हा पालकांनाही मुलांना परत पाठविण्यास होकार दर्शविला आहे. या मुलांना घेऊन एक टीम छत्रपती संभाजीनगरकडे गुरुवारी (दि. २६) येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली.

मुलांसाठी हंगामी वसतिगृह सुरूऊसतोडणीसाठी गेलेल्या मजुरांच्या मुलांसाठी हंगामी वसतिगृहे सुरू केली आहेत. या वसतिगृहात ही मुले राहू शकतात. त्यामुळे त्यांना पाठविण्यात यावे, अशी विनंतीही शिक्षण विभागाच्या पथकाने केली. तेव्हा मुलांच्या शिक्षणात खंड पडू न देण्याचे आश्वासन पालकांनी दिले.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरEducationशिक्षणStudentविद्यार्थी