शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

स्थलांतरित विद्यार्थ्यांच्या शोधात शिक्षणाधिकारी गेल्या गुजरातेत; २२ उसतोड मंजुरांची मुलं परतली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 11:17 IST

ऊसतोडणीसाठी गेलेल्या मजुरांच्या मुलांना शाळेत पाठविण्यासाठी शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण या पथकासह थेट गुजरातमध्ये पोहोचल्या. त्याठिकाणी मजुरांच्या कोपीसमोर बसून संवाद साधत संबंधितांचे मन परिवर्तन केले.

छत्रपती संभाजीनगर : घरची आर्थिक परिस्थिती तोलामोलाची असल्यामुळे ग्रामीण भागातील अनेकांना पोटाची खळगी भरण्यासाठी गाव सोडून पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटकसह गुजरातमध्ये जावे लागते. घरी कोणीच नसल्यामुळे लहान मुलांनाही सोबत नेण्यात येते. त्यामुळे या मुलांची शाळा बंद पडते. अशा मुलांचा शोध घेण्यासाठी प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांच्यासह पथकाने ऊसतोडणीसाठी गेलेल्या मजुरांच्या मुलांच्या शोधासाठी गुजरात राज्य गाठले. त्याठिकाणी कन्नड तालुक्यातील २२ मुलांच्या पालकांचे मन परिवर्तन करीत मुलांना शाळेत पाठविण्यास राजी केले आहे.

जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या मार्गदर्शनात प्राथमिक शिक्षण विभागाने दिवाळीपूर्वी ऊसतोड मजूर स्थलांतर करण्यापूर्वीच अनेक पालकांचे समुपदेशन करीत मुलांना गावी ठेवण्यास भाग पाडले होते. त्यानंतरही काही पालकांना आपल्या पाल्यांना सोबत नेल्यामुळे त्यांना परत आणण्यासाठी बालरक्षक टीम पाठविण्यात आल्या होत्या. त्या माध्यमातून ५२ विद्यार्थ्यांना परत आणण्यात यश मिळाले. त्याचवेळी गुजरात राज्यातील कुकरमुंडा आणि नंदुरबार जिल्ह्यातील तळाेदा या ठिकाणी तब्बल २२ विद्यार्थी असल्याची माहिती मिळाली होती. या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी त्यांच्या पालकांचे समुपदेशन करणे आवश्यक होते. त्यामुळे प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांच्यासह उपशिक्षणाधिकारी नीता श्रीश्रीमाळ, गीता तांदळे, शिक्षण विस्तार अधिकारी संगीता सावळे, मुख्याध्यापक देविसिंग राजपूत, शिक्षक कल्याण पवार, किशोर आगळे, ज्ञानेश्वर वाघ यांची टीम या दोन्ही ठिकाणी पोहोचली. त्या ठिकाणी शिक्षणाधिकाऱ्यांनी ऊसतोड कामगारांच्या समस्या समजावून घेतल्या. त्यानंतर मुलांच्या शिक्षणाचे महत्त्व त्यांना पटवून सांगण्यात आले. तेव्हा पालकांनाही मुलांना परत पाठविण्यास होकार दर्शविला आहे. या मुलांना घेऊन एक टीम छत्रपती संभाजीनगरकडे गुरुवारी (दि. २६) येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली.

मुलांसाठी हंगामी वसतिगृह सुरूऊसतोडणीसाठी गेलेल्या मजुरांच्या मुलांसाठी हंगामी वसतिगृहे सुरू केली आहेत. या वसतिगृहात ही मुले राहू शकतात. त्यामुळे त्यांना पाठविण्यात यावे, अशी विनंतीही शिक्षण विभागाच्या पथकाने केली. तेव्हा मुलांच्या शिक्षणात खंड पडू न देण्याचे आश्वासन पालकांनी दिले.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरEducationशिक्षणStudentविद्यार्थी