शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
2
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
3
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
4
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
6
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
7
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
8
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
9
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
10
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
11
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
12
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
13
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
14
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
15
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
16
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
17
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
18
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
19
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
20
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

स्थलांतरित विद्यार्थ्यांच्या शोधात शिक्षणाधिकारी गेल्या गुजरातेत; २२ उसतोड मंजुरांची मुलं परतली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 11:17 IST

ऊसतोडणीसाठी गेलेल्या मजुरांच्या मुलांना शाळेत पाठविण्यासाठी शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण या पथकासह थेट गुजरातमध्ये पोहोचल्या. त्याठिकाणी मजुरांच्या कोपीसमोर बसून संवाद साधत संबंधितांचे मन परिवर्तन केले.

छत्रपती संभाजीनगर : घरची आर्थिक परिस्थिती तोलामोलाची असल्यामुळे ग्रामीण भागातील अनेकांना पोटाची खळगी भरण्यासाठी गाव सोडून पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटकसह गुजरातमध्ये जावे लागते. घरी कोणीच नसल्यामुळे लहान मुलांनाही सोबत नेण्यात येते. त्यामुळे या मुलांची शाळा बंद पडते. अशा मुलांचा शोध घेण्यासाठी प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांच्यासह पथकाने ऊसतोडणीसाठी गेलेल्या मजुरांच्या मुलांच्या शोधासाठी गुजरात राज्य गाठले. त्याठिकाणी कन्नड तालुक्यातील २२ मुलांच्या पालकांचे मन परिवर्तन करीत मुलांना शाळेत पाठविण्यास राजी केले आहे.

जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या मार्गदर्शनात प्राथमिक शिक्षण विभागाने दिवाळीपूर्वी ऊसतोड मजूर स्थलांतर करण्यापूर्वीच अनेक पालकांचे समुपदेशन करीत मुलांना गावी ठेवण्यास भाग पाडले होते. त्यानंतरही काही पालकांना आपल्या पाल्यांना सोबत नेल्यामुळे त्यांना परत आणण्यासाठी बालरक्षक टीम पाठविण्यात आल्या होत्या. त्या माध्यमातून ५२ विद्यार्थ्यांना परत आणण्यात यश मिळाले. त्याचवेळी गुजरात राज्यातील कुकरमुंडा आणि नंदुरबार जिल्ह्यातील तळाेदा या ठिकाणी तब्बल २२ विद्यार्थी असल्याची माहिती मिळाली होती. या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी त्यांच्या पालकांचे समुपदेशन करणे आवश्यक होते. त्यामुळे प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांच्यासह उपशिक्षणाधिकारी नीता श्रीश्रीमाळ, गीता तांदळे, शिक्षण विस्तार अधिकारी संगीता सावळे, मुख्याध्यापक देविसिंग राजपूत, शिक्षक कल्याण पवार, किशोर आगळे, ज्ञानेश्वर वाघ यांची टीम या दोन्ही ठिकाणी पोहोचली. त्या ठिकाणी शिक्षणाधिकाऱ्यांनी ऊसतोड कामगारांच्या समस्या समजावून घेतल्या. त्यानंतर मुलांच्या शिक्षणाचे महत्त्व त्यांना पटवून सांगण्यात आले. तेव्हा पालकांनाही मुलांना परत पाठविण्यास होकार दर्शविला आहे. या मुलांना घेऊन एक टीम छत्रपती संभाजीनगरकडे गुरुवारी (दि. २६) येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली.

मुलांसाठी हंगामी वसतिगृह सुरूऊसतोडणीसाठी गेलेल्या मजुरांच्या मुलांसाठी हंगामी वसतिगृहे सुरू केली आहेत. या वसतिगृहात ही मुले राहू शकतात. त्यामुळे त्यांना पाठविण्यात यावे, अशी विनंतीही शिक्षण विभागाच्या पथकाने केली. तेव्हा मुलांच्या शिक्षणात खंड पडू न देण्याचे आश्वासन पालकांनी दिले.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरEducationशिक्षणStudentविद्यार्थी