शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
3
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
4
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
5
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
6
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
7
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
8
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
9
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
10
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
11
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
12
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
13
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
14
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
15
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
16
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
17
Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
18
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
19
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
20
IPL 2026 : १८० पेक्षा अधिक धावसंख्येचा पाठलाग करताना कसा आहे CSK चा रेकॉर्ड?
Daily Top 2Weekly Top 5

ठिबकाच्या क्रांतीमुळे आर्थिक समृद्धी

By admin | Updated: June 10, 2014 00:17 IST

विश्वास साळुंके, वारंगाफाटा वारंगाफाटा : कमीत कमी वेळेत, कमीत कमी खर्चात, किमान मेहनतीद्वारे शेतीतून अधिकाधिक उत्पन्न मिळविण्याची शेतकऱ्यांकडून धडपड व स्पर्धा वाढली आहे.

विश्वास साळुंके, वारंगाफाटा
वारंगाफाटा : कमीत कमी वेळेत, कमीत कमी खर्चात, किमान मेहनतीद्वारे शेतीतून अधिकाधिक उत्पन्न मिळविण्याची शेतकऱ्यांकडून धडपड व स्पर्धा वाढली आहे. म्हणूनच ठिबक सिंचनाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याने यंदा हळद व कापूस लागवडीची लगबग दिसून येत आहे. गतवर्षी वारंगाफाटा परिसरातील अनेक उत्पादकांनी ठिबक सिंचनाचा वापर करून विक्रमी उत्पादन काढले. परिणामी परिसरात आर्थिक समृद्धी आल्याने ठिबक सिंचनाची क्रांती घडून येत आहे.
आधुनिक शेतीकडे शेतकरी वळले आहेत. प्रामुख्याने ठिबक सिंचनाचा अधिक वापर करण्यावर शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. एकीकडे ठिबक सिंचन संच खरेदीचा खर्च तेवढा लागत आहे. दुसरीकडे मात्र निंदणी, खत टाकणी व इतर मशागतीची कामे ठिबक सिंचनामुळे सुलभ, कमी वेळेची आणि अल्पखर्ची ठरत आहेत. कारण कृषीपंपाला दिवसाकाठी केवळ ८ तास वीज मिळत आहे. या वेळेत संपूर्ण क्षेत्र भिजणे कठीण असल्याने ठिबक सिंचन उपयोगी पडत आहे. ठिबकामुळे एका तासात एक ते दोन एकर जमिनीवरील पिके पाण्याच्या आवश्यकतेनुसार समान पाणी देऊन भिजत आहेत. मोकाट पाणी दिले नसल्याने तणाची उगवण कमी झाल्याने पिकांच्या ंिनंदणीसाठी लागणारा खर्च मोठ्या प्रमाणात वाचला जातो.
शासनाने रासायनिक खतांवरील सबसिडी काढून घेतल्याने रासायनिक खत खरेदी करणे शेतकऱ्यांना अवघड झाले आहे. उलट बाजारात पाण्यात विरघळणारी खते उपलब्ध झाली आहेत. ही खते ठिबकाद्वारे पिकांना आवश्यकतेनुसार व कमी वेळात देता येतात. त्यामुळे खतांसाठी लागणारा खर्च व वेळेची बचत होते. पारंपारिक पद्धतीने रासायनिक खत पिकांना लागू होण्यास फार दिवस लागतात; मात्र पाण्यातून दिलेली खते केवळ ४८ तासांत पिकांला लागू होतात. शिवाय खर्च व मेहनतीमध्ये मोठ्या प्रमाणावर बचत होते. सर्व बाबींचा विचार करून कळमनुरी तालुक्यातील वारंगाफाटा परिसरात ठिबक सिंचनाचा वापर वाढला आहे. त्यातून पिकांचे उत्पादन दुप्पटीनेच वाढल्याने उत्पादकांना लाखो रूपयांचा माल झाला. म्हणून कळमनुरी तालुक्यातील वारंगाफाटा परिसरात आर्थिक सुबत्ता आल्याने ठिबक क्रांती घडत आहे.
दहा वर्षांपासून ठिबक सिंचनाद्वारे दरवर्षी कापूस, हळद, केळी आदी महत्वाची पिके घेत आहे. दरवर्षी ४० ते ४५ क्विंटल हळदीचे उत्पन्न मिळते. यापूर्वी ठिबक सिंचन नसताना केवळ २५ ते ३० क्विंटल एवढेच हळदीचे उत्पादन होत होते. तसेच दरवर्षी किमान २५ ते २७ क्विंटल कापूस एका एकरात होत आहे. प्रतिवर्षी सर्वच पिकांचे विक्रमी उत्पादन वाढल्याने ठिबक ही काळाची गरज बनली आहे.
- नामदेवराव साळुंके,
वारंगाफाटा