शहरं
Join us  
Trending Stories
1
पाथर्डीत मतदान कर्मचाऱ्यांकडेच सुजय विखे पाटील यांची प्रचार पत्रके, ग्रामस्थांचा आक्षेप
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 6.45 टक्के मतदान झाले
3
Narendra Modi : उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला किती जागा मिळतील?; पंतप्रधान मोदींनी केला मोठा दावा
4
अणुबॉम्बच्या भीतीने पीओके जाऊ द्यायचे का? मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यावर अमित शहांचे प्रत्युत्तर
5
Maharashtta Lok Sabha Election 2024 मराठी कलाविश्वातील या कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, चाहत्यांनाही केलं आवाहन
6
निकालानंतर पुन्हा भाजपासोबत जाणार का?; राऊतांचा प्रश्न अन् उद्धव ठाकरेंचं सडेतोड उत्तर
7
मतदारयादीत नाव त्यांचेच पण आडनाव दुसऱ्याचे; सकाळीच रांगेत आलेले पती-पत्नी मतदानाला मुकले
8
Panchayat 3 ची झलक बघायची आहे? 'या' दिवशी रिलीज होणार सीरिजचा ट्रेलर
9
Tata Motors चे शेअर्स जोरदार आपटले, ८ टक्क्यांची घसरण; Q4 निकालांमुळे गुंतवणूकदार नाराज
10
Life Lesson : अस्थिर, अशांत, अविवेकी मनाला शांत कसं करायचं? उपाय सांगताहेत गौर गोपाल दास!
11
मध्य रेल्वे: ठाणे-कळवा स्थानकादरम्यान लोकल १ तासाहून अधिक वेळ थांबलेली; सहा मार्ग झालेले बंद
12
शिंदे कट्टर शिवसैनिक, ते बंड करणारे नव्हते, पण...; देवेंद्र फडणवीसांनी पडद्यामागचं राजकारण सांगितलं
13
Success Story: ₹८५० च्या पगारावरून ₹५५,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, नशीब बदलणाऱ्या उद्योजकाची कहाणी
14
पुण्यात पैसे वाटल्याचा धंगेकरांचा आरोप, मुरलीधर मोहोळांचे सडेतोड उत्तर; म्हणाले...
15
छत्रपती संभाजीनगरमध्ये २५ ईव्हीएम बंद पडली, परळीतही गोंधळ; टक्केवारीवर परिणाम
16
"उद्धव ठाकरेंचं स्वत:चं मेटावर्स जग, त्या जगाचे राजे तेच, नियमही त्यांचेच..."
17
Stock Market Opening Bell: Sensex-Nifty वर विक्रीचा दबाव, बाजार उघडताच गुंतवणूकदारांचे ₹४७.५ हजार कोटी बुडाले
18
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचा अपघातात मृत्यू, बसने कारला धडक दिली अन्...
19
राज ठाकरेंच्या राजकारणाचा शेवट, आग लावण्याची कामं बंद करा; जितेंद्र आव्हाड संतापले
20
NPS: Retirement वर पाहिजेय ₹२ लाखांचं Pension? पाहा तुम्हाला किती करावी लागेल गुंतवणूक

गतवर्षी कमी पाऊस झाल्याने उन्हाळी पिकाचे क्षेत्रही निम्म्यावर

By बापू सोळुंके | Published: March 28, 2024 5:46 PM

यंदा जायकवाडी प्रकल्पातून उन्हाळी पिकांसाठी पाणी न देण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला. यामुळे सुमारे ४५ टक्के शेतकऱ्यांनीही उन्हाळी पिकांसाठी पेरणी न करण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येते.

छत्रपती संभाजीनगर : गतवर्षी अत्यल्प पाऊस झाल्याचा परिणाम आता स्पष्टपणे दिसू लागला आहे. धरणे आणि विहिरी आटल्याने मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांतील उन्हाळी पिकांची सरासरी पेरणी निम्म्यावर आली आहे.

विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयांतर्गत असलेल्या छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या जिल्ह्यांत दरवर्षी उन्हाळ्यात सर्वसाधारणपणे ३२ हजार ६५८ हेक्टर क्षेत्रावर उन्हाळ्यात ज्वारी, मका, बाजरी, भुईमूग, सोयाबीन आणि सूर्यफूल या पिकांची पेरणी केली जाते. दरवर्षी जलसंपदा विभागाकडून त्यांच्या आधिपत्याखालील धरणांमधून उन्हाळी पिकांसाठी पाटाचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पुरविले जाते. मात्र, गतवर्षी मुसळधार पाऊस न झाल्याने नदी, नाले भरले नव्हते. परिणामी लहान, मोठ्या धरणांमध्ये पाणी न साचल्याने शिल्लक पाण्याचा वापर केवळ पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.

यंदा जायकवाडी प्रकल्पातून उन्हाळी पिकांसाठी पाणी न देण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला. यामुळे सुमारे ४५ टक्के शेतकऱ्यांनीही उन्हाळी पिकांसाठी पेरणी न करण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सरासरी १४ हजार हेक्टरवर उन्हाळी पिकांची पेरणी होते. यावर्षी केवळ ८ हजार ९०० हेक्टरवर उन्हाळी पिकांची पेरणी झाली. जालना जिल्ह्यात सरासरी १० हजार हेक्टर उन्हाळी पिकाचे क्षेत्र आहे. प्रत्यक्षात या जिल्ह्यात केवळ १,५४२ हेक्टरवर आतापर्यंत पेरणी झाली. बीड जिल्ह्यात सरासरी ७ हजार ४५५ हेक्टर उन्हाळी पिकाचे क्षेत्र आहे. बीड जिल्ह्यात १०२ टक्के क्षेत्रावर पेरणी झाल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारीवरून दिसून येते.

‘असे’ शेतकरीच उन्हाळी पिके घेतातज्या शेतकऱ्यांकडे शेततलाव पाण्याने भरलेले आहेत, ज्यांच्या विहिरींना बाराही महिने उत्तम असा जलस्रोत आहे, असे शेतकरीच उन्हाळी पिके घेतात, असे कृषी सहसंचालक डॉ. तुकाराम मोटे यांनी सांगितले. गतवर्षी पाऊस कमी झाला होता, यामुळे उन्हाळी पिकाचे क्षेत्रही घटले आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रWaterपाणी