शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
4
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
5
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
6
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
7
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
8
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
9
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
10
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
11
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
12
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
13
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
14
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
15
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
16
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
17
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
18
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
19
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
20
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
Daily Top 2Weekly Top 5

प्रदेशाध्यक्षपद गेल्याने दानवे समर्थकांचे चेहरे उतरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 13:27 IST

आता राजूरच्या गणपतीऐवजी कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन 

ठळक मुद्देउमेदवारी मिळण्याबाबत संकट महामंडळ अध्यक्ष होण्याचे स्वप्न भंगले

- विकास राऊत 

औरंगाबाद : केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना ‘एक व्यक्ती एक पद’ हा नियम लावत भाजपने त्यांच्याकडून प्रदेशाध्यपदाची जबाबदारी काढून घेतली. महसूल व बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर ती जबाबदारी दिली. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच पद गेल्यामुळे दानवे समर्थकांचे चेहरे उतरले आहेत. आता समर्थकांनी नूतन प्रदेशाध्यक्षांशी जवळीक असणाऱ्यांची मनधरणी करण्यास सुरूवात केली आहे. शहरातील भाजपचे काही पदाधिकारी कोल्हापूरच्या नेटवर्कमध्ये आहेत, त्यांच्याशी जवळीक साधून विधानसभा व इतर पद पदरात पाडून घेण्याचा विचार काहींच्या डोक्यात घोळू लागला आहे. यापुढे राजूरच्या गणपती ऐवजी कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या दर्शनासाठी भाजप पदाधिकारी आवूर्जन जातील.

२०१४ मध्ये केंद्र आणि राज्यामध्ये भाजप-शिवसेनेची सत्ता आल्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री पद काढून घेत दानवे यांना प्रदेशाध्यपदाची जबाबदारी दिली. सुमारे पाच वर्ष ते पदावर राहिल्यामुळे त्यांची पक्ष संघटनेत चांगलीच ‘घडी’ बसली होती. २०१५ च्या मनपा निवडणुकीपासून आजवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या पक्षातून जे कुणी पक्षात आले, त्यांना राज्यमंत्री दानवे यांनी विधानसभा उमेदवारीसह इतर पदांवर बसविण्यासाठी प्रयत्न करण्याचा शब्द दिला होता. त्या सर्व इच्छुकांचे अवसान मंगळवारपासून गळाले आहे. संघटन सत्तेचे केंद्र मराठवाड्यातून पश्चिम महाराष्ट्रात सरकल्यामुळे संघटनेतील ‘दादागिरी’ आता संपुष्टात आल्याची चर्चा सुरू झाली आहे. फु लंब्री आणि पूर्व मतदारसंघातील इच्छुकांना आता पळता भूई थोडी होणार आहे. औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील एक गट दानवे यांच्यासाठीच सक्रीय असायचा. प्रदेशाध्यक्ष संघाच्या मुशीतील असल्यामुळे त्या गटाच्या इच्छा, आकांक्षांवर पाणी फेरले जाण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत संघटन पदाधिकाऱ्यांमध्ये मोठे फेरबदल होतील, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. 

महामंडळ अध्यक्ष होण्याचे स्वप्न भंगलेएका पक्षातून उडी मारून भाजपमध्ये आल्यानंतर राज्यमंत्री दानवे यांच्या मागे-पुढे करणाऱ्याला एका आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष व्हायचे होते. गेल्या आठवड्यात सदरील इच्छुकाने राज्यमंत्री दानवे यांच्यासोबत मुंबईवारी करून पद मिळविण्यासाठी प्रयत्न केले. परंतु पदरी निराशा आल्यामुळे सगळा विषय ठप्प झाला. परंतु लायझनिंग करण्यात काही आयाराम (इतर पक्षातून आलेले) तरबेज आहेत. ते आता चतुर्थीच्या दिवशी राजूरच्या गणपतीच्या दर्शनाला जाण्याऐवजी दर पोर्णिमेला कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या दर्शनाला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

टॅग्स :BJPभाजपाMarathwadaमराठवाडाState Governmentराज्य सरकारPoliticsराजकारण