शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

पावसाच्या खंडामुळे जिल्ह्यातील मूग, उडीद उत्पादन घटले; मक्याचा उत्पादनावरही झाला परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 6:39 PM

पावसाने मोेठी दडी मारल्याने दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

औरंगाबाद : पावसाने मोेठी दडी मारल्याने दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी, जिल्ह्यात मूग व उडदाच्या उत्पादनात ६० ते ७० टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. तसेच जिल्ह्यात मक्याच्या उत्पादनावरही ५० टक्के, तर २० टक्क्यांनी कपाशीचे उत्पादन घटण्याचा प्रथम पूर्वानुमान अहवाल कृषी विभागाने जाहीर केला आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यात खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र ७ लाख ३५ हजार ५८५ हेक्टर आहे. त्यापैकी १२,८६५ हेक्टर, तर उडदाची ५,२४४ हेक्टरवर पेरणी झाली. ऐन शेंगा लागणे व भरण्याच्या अवस्थेत असताना जुलै व आॅगस्टमध्ये ३ ते ४ आठवड्यांचा पावसात खंड पडल्याने दोन्हीची उत्पादकता ६० ते ७० टक्क्यांपर्यंत घटली आहे. यंदा १ हजार ५१ हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झाली होती. उत्पादनात ८ ते १० टक्के घट होणार असल्याचे अहवालात म्हटले आहे.

गेल्या पाच वर्षांत ज्वारीचे सरासरी उत्पादकता प्रतिहेक्टरी ९७८ किलोग्रॅम एवढी आहे, तर यंदा ९२६ किलोग्रॅम असल्याचे नमूद करण्यात आले आहे. खरिपात २ लाख ६ हजार ९९४ हेक्टरवर मका लावण्यात आला. त्यापैकी २२,५६३ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. कणसाची वाढ खुंटली, तसेच दाणे कमी प्रमाणात भरल्याने ४० टक्के उत्पादन कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

हेक्टरी २७ किलोने कापसाचे उत्पादन कमी जिल्ह्यात  ३ लाख ८८ हजार ७७८ हेक्टरवर कपाशीची लागवड करण्यात आली आहे. बोंडअळीचा परिणामही जाणवत आहे. २३ हजार ५९९ हेक्टर क्षेत्र हे पावसाच्या खंडाने बाधित झाले आहे. मागील पाच वर्षांत सरासरी उत्पादन (रुई) हेक्टरी २२७ किलो एवढे झाले आहे. यंदा हेक्टरी २०० किलो होण्याचा प्रथम नजर अंदाज नोंदविण्यात आला आहे. 

रबीच्या क्षेत्रात वाढीचे नियोजन औरंगाबाद जिल्ह्यात रबीचे सरासरी क्षेत्र १ लाख ८९ हेक्टर आहे. त्यापैकी मागील रबी हंगामात १ लाख ६९ हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदात २ लाख १५ हजार हेक्टरवर पेरणी होेईल, असे नियोजन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. २७ टक्क्यांनी रबीचे क्षेत्र वाढेल, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबादagricultureशेती