शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
2
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
3
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
5
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
6
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
7
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
8
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
9
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
10
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
11
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
12
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
13
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
15
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
16
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
17
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
18
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
19
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
20
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

औरंगाबादेत आवक घटल्याने धान्य अडत व्यवहार ठप्प होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 4:40 PM

मक्याचे यंदा दुष्काळामुळे उत्पादन घटले व आवक तीन महिने आधीच संपुष्टात आली आहे.

ठळक मुद्दे मक्याची आवक तीन महिने आधीच संपली तूरची झाली तुरळक आवक 

औरंगाबाद : जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील धान्याचा अडत बाजार ज्या मक्यावर आधारित आहे. त्या मक्याचे यंदा दुष्काळामुळे उत्पादन घटले व आवक तीन महिने आधीच संपुष्टात आली आहे. नवीन तूर किती येईल, याची शाश्वती नाही आणि गहू, ज्वारीचा पेराही कमी आहे. परिणामी, पुढील १० महिने अडत बाजारासाठी कठीण जाणार आहे. यापुढे परपेठेतील शेतमालावरच अवलंबून राहावे लागणार आहे. 

औरंगाबाद जिल्हा मक्याच्या उत्पादनात देशात आघाडीवर आहे. येथील मक्याला देश व विदेशातील विविध स्टार्च फॅक्टरीमधून मागणी असते. जाधववाडीतील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील धान्याचा अडत बाजारातील ७० टक्के वार्षिक व्यवहार एकट्या मक्यावर अवलंबून आहे. मात्र, यंदा ऐनवेळेवर पाऊस पडला नाही. मक्यात दाणेच भरले नाही. यामुळे मक्याचे उत्पादन ६० ते ७० टक्क्यांपर्यंत घटले आहे. परिणामी, धान्याच्या अडत बाजारात मक्याची नवीन आवक आॅक्टोबरपासून सुरू होते आणि फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आवक संपुष्टात येते. मात्र, यंदा केवळ महिनाभरच हंगाम राहिला. महिनाभरात केवळ २१३२९ क्विंटल मक्याची आवक झाली.

मागील वर्षी या काळात २४४४३ क्विंटल मका विक्रीसाठी आला होता. एकूण आवकपैकी केवळ १० टक्के मका अडतमध्ये विक्रीला आला.  मर्चंटस् असोसिएशनचे अध्यक्ष कन्हैयालाल जैस्वाल यांनी सांगितले की, यंदा  दरवर्षीपेक्षा मुगाची आवक केवळ १५ टक्के राहिली. उडीदही ५ टक्केच विक्रीला आला आहे. आतापर्यंत नवीन तुरी बाजारात येत असतात; पण अजून आवक सुरू झाली नाही. ग्रामीण भागात पाहणी केली असता १५ टक्केसुद्धा तूर विक्रीसाठी येणार नाही, अशी शक्यता आहे. रबीत गहू, ज्वारीचा पेराही कमी आहे. यामुळे आता रबीचे पीकही हाती लागणार नाही. यामुळे पुढील वर्षीच्या सप्टेंबरपर्यंत अडत व्यवहार ठप्प राहणार, असे दिसते. व्यापाऱ्यांना आता परराज्यातून धान्य आणून येथे विकावे लागणार आहे. 

यंदा मूग, उडीद, बाजरीही कमीकृउबाचे सचिव विजय शिरसाठ यांनी सांगितले की, मक्याच्या व्यवहारावरच येथील अडत बाजार टिकून आहे; मात्र दुष्काळामुळे महिनाभरातच मक्याची आवक कमी झाली, तसेच यंदा मूग, उडीद, बाजरीही विक्रीला कमी आली. याचा मार्केट फीवर मोठा परिणाम झाला आहे. महिनाअखेरीस याची आकडेवारी उपलब्ध होईल. 

अडत्यासोबत हमालांच्या रोजगारावरही परिणाम स्थानिक शेतकऱ्यांकडून येणारी धान्य, कडधान्याची आवक ७० ते ८० टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. यामुळे आता जे स्थानिक शेतीमालावर अवलंबून आहेत असा अडत व्यवहार पुढील १० महिने ठप्पच राहील. त्यासाठी आता परपेठेतून माल मागवून तो विक्री करावा लागेल. येथे ७५ अडत व्यापारी आहेत, तर १०० च्या जवळपास हमाल काम करीत आहेत, तसेच ५० पेक्षा अधिक लोडिंगरिक्षावालेही येथील व्यवहारावर अवलंबून आहेत. त्यांनी दुसरीकडे काम केले नाही तर त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल. - देवीदास कीर्तिशाही, हमाल प्रतिनिधी

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMarketबाजारFarmerशेतकरीdroughtदुष्काळAgriculture Sectorशेती क्षेत्र