शहरं
Join us  
Trending Stories
1
UPSC Result 2025: यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा!
2
किती धोक्याची? सॅमसंगची स्मार्ट रिंग बॅटरी फुगली, बोटात खुपली; वापरकर्ता विमानतळावरून थेट हॉस्पिटलमध्ये
3
दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
4
अब्जाधीशांच्या यादीत पहिल्यांदाच सामील झाला शाहरुख खान, पाहा किती झाली संपत्ती?
5
Chaitanyananda Saraswati : अय्याशीसाठी संस्थेत बांधली लग्झरी रुम... स्वयंघोषित बाबाचे काळे कारनामे, अश्लील चॅट्सने खळबळ
6
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
7
इलेक्ट्रीक टु-व्हीलर विक्रीत मोठा उलटफेर! ओलाची जागा बजाज, बजाजची जागा ओलाने घेतली, टीव्हीएस, एथरने टिकवली...
8
गुरुवारी दसरा २०२५: ‘अशी’ करा स्वामी सेवा, वर्षभर पुण्य लाभेल; देवी लक्ष्मी लाभच लाभ देईल!
9
"तुझी मैत्रिण किंवा ज्युनियर आहे का, दुबईतल्या शेखला..."; चैतन्यानंदचे हादरवणारे व्हॉट्सअॅप चॅट समोर
10
गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
11
Gold Silver Price 1 October: एका झटक्यात सोनं १२०० रुपयांपेक्षा अधिक वाढलं, चांदीतही जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
12
१७ वर्षांची तरुणी न सांगताच घराबाहेर पडली, आता २ महिन्यांनी जंगलात सापडला मृतदेह, कोकणात खळबळ 
13
EMI भरतोय म्हणून घरावर पतीचा अधिकार होत नाही; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल, प्रकरण काय?
14
नवरात्र घट विसर्जन २०२५: पुरणाचे दिवे आणि कलशाचे पाणी कसे वापरावे? देवीच्या कृपेसाठी खास विधी!
15
फिलिपाईन्स भूकंपात 69 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी; पाहा धक्कादायक व्हिडिओ...
16
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
17
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
18
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
19
नांदेडचे शेतकरी कैलाश रामभाऊ यांनी KBC मध्ये जिंकले ५० लाख, एक कोटी रुपयांच्या प्रश्नावर सोडला खेळ
20
ICC Rankings : अभिषेकनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; T20I च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं

वेरूळ-अजिंठा महोत्सवावर दुष्काळाचे सावट; आयोजनाबाबत विभागीय आयुक्त मंत्र्यांशी चर्चा करणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 13:35 IST

दुष्काळाची भीषणता पाहता यंदा अजिंठा-वेरूळ महोत्सव होणार नाही, अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे.

ठळक मुद्देदोन वर्षांपासून महोत्सव झाला नाही महोत्सावर दुष्काळाचे सावट

औरंगाबाद : जिल्ह्यातील आणि विभागातील दुष्काळाची भीषणता पाहता यंदा अजिंठा-वेरूळ महोत्सव होणार नाही, अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे. दुष्काळाचे सावट मोठ्या प्रमाणावर आहे. पुर्ण जिल्ह्यांतील परिस्थिती भयावर आहे. त्यामुळे महोत्सव घेण्याबाबत मंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. असे विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांनी सांगितले. 

२०१४ ते २०१८ या काळात एक वर्ष हा महोत्सव झाला. गेल्यावर्षीचा महोत्सव ऐनवेळी रद्द करण्यात आला होता. नोव्हेंबरमध्ये महोत्सव घेण्याबाबत आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांनी मध्यंतरी संकेत दिले होते. परंतु औरंगाबादसह मराठवाडा दुष्काळाच्या रेट्याखाली आहे. त्यामुळे सांस्कृतिक मेजवानीचे कार्यक्रम आयोजित करावा की न करावा, यावरून प्रशासनाने आता शासनाकडे बोट दाखविले आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक महोत्सव आयोजित करूच नये, असे मत काही अधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांकडे व्यक्त केले आहे. 

वेरुळ-अजिंठा हा सांस्कृतिक महोत्सव १५ जानेवारी २०१८ च्या आसपास होण्याची शक्यता विभागीय आयुक्त डॉ.पुरूषोत्तम भापकर यांनी गेल्यावर्षी वर्तविली होती. सीताफळ, रेशीम महोत्सवानंतर त्याबाबत नियोजन करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. खाजगी संस्थेऐवजी तो महोत्सव एमटीडीसी व विभागीय प्रशासनाच्या अधिपत्याखाली घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. परंतु नियोजनासाठी वेळ न मिळाल्यामुळे जानेवारी २०१८ मध्ये महोत्सवाचे आयोजन करता आले नाही. दुष्काळामुळे महोत्सव होण्याची शक्यता सध्या तरी नाही.

२००१ पासून वेरूळ लेण्यांच्या पायथ्याशी होणार हा महोतस्व विद्यापीठ परिसरातील सोनेरी महल परिसरात घेण्यास सुरूवात झाली. २००७ पर्यंत हा महोत्सव नियमितपणे झाला. त्यानंतर कोणत्या न कोणत्या कारणामुळे हा महोत्सव आयोजित होऊ शकला नाही. २०११ आणि २०१६ हे दोन वर्ष वगळले तर दहा वर्षांत आठ वेळा सदरील महोत्सव रद्दच करावा लागला.

दुष्काळामुळे महोत्सव घेणे योग्य नाही  आयुक्त डॉ.भापकर म्हणाले, जिल्ह्यासह विभागात दुष्काळ आहेच. संबंधित मंत्र्यांशी चर्चा करूनच वेरूळ-अजिंठा महोत्सवाबाबत निर्णय होईल. मागील दोन वर्षांपासून महोत्सव झालेला नाही, ही बाब देखील खरी आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महोत्सव घेणे योग्य वाटत नाही. काही वेगवेगळे मुद्दे आहेत. प्रशासनाला काय वाटते यापेक्षा अडचणी काय आहेत, हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे निर्णय शासकीय पातळीवर चर्चा करूनच होईल. 

या कारणांनी महोत्सव रद्द झाला २००८- मुंबई दहशतवादी हल्लयामुळे रद्द २००९- स्वाईन फ्ल्यूची साथ आल्याने रद्द २०१०- शिक्षक मतदारसंघ निवडणुकीमुळे रद्द २०१३- दुष्काळामुळे महोत्सव रद्द२०१४- दुष्काळामुळे रद्द२०१५- दुष्काळी स्थितीमुळे रद्द२०१७- नियोजन होऊ शकले नाही२०१८- दुष्काळामुळे महोत्सव घेणे योग्य नाही 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAjantha - Elloraअजंठा वेरूळState Governmentराज्य सरकार