शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

वेरूळ-अजिंठा महोत्सवावर दुष्काळाचे सावट; आयोजनाबाबत विभागीय आयुक्त मंत्र्यांशी चर्चा करणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 13:35 IST

दुष्काळाची भीषणता पाहता यंदा अजिंठा-वेरूळ महोत्सव होणार नाही, अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे.

ठळक मुद्देदोन वर्षांपासून महोत्सव झाला नाही महोत्सावर दुष्काळाचे सावट

औरंगाबाद : जिल्ह्यातील आणि विभागातील दुष्काळाची भीषणता पाहता यंदा अजिंठा-वेरूळ महोत्सव होणार नाही, अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे. दुष्काळाचे सावट मोठ्या प्रमाणावर आहे. पुर्ण जिल्ह्यांतील परिस्थिती भयावर आहे. त्यामुळे महोत्सव घेण्याबाबत मंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. असे विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांनी सांगितले. 

२०१४ ते २०१८ या काळात एक वर्ष हा महोत्सव झाला. गेल्यावर्षीचा महोत्सव ऐनवेळी रद्द करण्यात आला होता. नोव्हेंबरमध्ये महोत्सव घेण्याबाबत आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांनी मध्यंतरी संकेत दिले होते. परंतु औरंगाबादसह मराठवाडा दुष्काळाच्या रेट्याखाली आहे. त्यामुळे सांस्कृतिक मेजवानीचे कार्यक्रम आयोजित करावा की न करावा, यावरून प्रशासनाने आता शासनाकडे बोट दाखविले आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक महोत्सव आयोजित करूच नये, असे मत काही अधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांकडे व्यक्त केले आहे. 

वेरुळ-अजिंठा हा सांस्कृतिक महोत्सव १५ जानेवारी २०१८ च्या आसपास होण्याची शक्यता विभागीय आयुक्त डॉ.पुरूषोत्तम भापकर यांनी गेल्यावर्षी वर्तविली होती. सीताफळ, रेशीम महोत्सवानंतर त्याबाबत नियोजन करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. खाजगी संस्थेऐवजी तो महोत्सव एमटीडीसी व विभागीय प्रशासनाच्या अधिपत्याखाली घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. परंतु नियोजनासाठी वेळ न मिळाल्यामुळे जानेवारी २०१८ मध्ये महोत्सवाचे आयोजन करता आले नाही. दुष्काळामुळे महोत्सव होण्याची शक्यता सध्या तरी नाही.

२००१ पासून वेरूळ लेण्यांच्या पायथ्याशी होणार हा महोतस्व विद्यापीठ परिसरातील सोनेरी महल परिसरात घेण्यास सुरूवात झाली. २००७ पर्यंत हा महोत्सव नियमितपणे झाला. त्यानंतर कोणत्या न कोणत्या कारणामुळे हा महोत्सव आयोजित होऊ शकला नाही. २०११ आणि २०१६ हे दोन वर्ष वगळले तर दहा वर्षांत आठ वेळा सदरील महोत्सव रद्दच करावा लागला.

दुष्काळामुळे महोत्सव घेणे योग्य नाही  आयुक्त डॉ.भापकर म्हणाले, जिल्ह्यासह विभागात दुष्काळ आहेच. संबंधित मंत्र्यांशी चर्चा करूनच वेरूळ-अजिंठा महोत्सवाबाबत निर्णय होईल. मागील दोन वर्षांपासून महोत्सव झालेला नाही, ही बाब देखील खरी आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महोत्सव घेणे योग्य वाटत नाही. काही वेगवेगळे मुद्दे आहेत. प्रशासनाला काय वाटते यापेक्षा अडचणी काय आहेत, हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे निर्णय शासकीय पातळीवर चर्चा करूनच होईल. 

या कारणांनी महोत्सव रद्द झाला २००८- मुंबई दहशतवादी हल्लयामुळे रद्द २००९- स्वाईन फ्ल्यूची साथ आल्याने रद्द २०१०- शिक्षक मतदारसंघ निवडणुकीमुळे रद्द २०१३- दुष्काळामुळे महोत्सव रद्द२०१४- दुष्काळामुळे रद्द२०१५- दुष्काळी स्थितीमुळे रद्द२०१७- नियोजन होऊ शकले नाही२०१८- दुष्काळामुळे महोत्सव घेणे योग्य नाही 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAjantha - Elloraअजंठा वेरूळState Governmentराज्य सरकार