शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

Drought In Marathawada : ‘ताई, तुमीबी बगा की खारं पाणी कसं लागतंय ते!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 14:02 IST

ग्रामस्थ म्हणतात,‘यंदाचा दुष्काळ लई वाईट...’

ठळक मुद्देसिरेसायगावातील भीषण वास्तव सध्या मराठवाडा भीषण दुष्काळ परिस्थितीला सामोरा जात आहे.

- अबोली कुलकर्णी-शेलदरकर

औरंगाबाद : ‘१९७२ वर्षानंतरचा लई भीषण दुष्काळ हाय ताई... आत्तापतूर पाह्यला नाय असा बेक्कार दुष्काळ हाय हा... पाण्याचा थेंब नाय घरात... लेकरांना हंडाभर पाण्यासाठी लई लांब जावं लागतया... आमच्या हाताला काईबी काम नाई बगा... कुणाच्या लग्नाला जावं मनलं तर हातात एक रुपयाबी न्हाई... आमचं वावर, जनावरं, लेक रं लईच होरपळलेत बगा...’ हे उद्गार आहेत लासूर गावानजीक असलेल्या दुष्काळग्रस्त सिरेसायगावातील एका महिलेचे... 

सध्या मराठवाडा भीषण दुष्काळ परिस्थितीला सामोरा जात आहे. पाणीटंचाई, शासकीय योजनांचा अभाव, पीक विमा, चाराटंचाई याबाबींपासून ग्रामस्थ दुरावल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात दिसत आहे. अशाच काही दुष्काळग्रस्त गावांची माहिती घेतली असता पालखेड, लासूर आणि सिरेसायगाव या गावांची पाहणी करायचे ठरवले. औरंगाबादपासून साधारण ५० कि.मी. अंतरावर असलेल्या दुष्काळग्रस्त सिरेसायगाव या गावाला भेट दिली. एक हजार वस्ती असलेले हे गाव. या गावात जाण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून डांबरी रस्ता नाही. ग्रामस्थ पायवाटेनेच ये-जा करतात. गावाच्या पाटीपासून मात्र सिमेंटचा रस्ता आहे. गावात पोहोचताच जागोजागी ग्रामस्थ विहिरीवरून पाण्याचे हंडे भरताना दिसले. दहा वर्षांच्या मुलीपासून ते ८० वर्षांच्या आजीपर्यंत सगळे जण पाण्याची सोय लावण्यात व्यस्त होते. ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्याकडून एकंदरीत गावातील पाण्याची व्यवस्था, रस्ते, चाऱ्याची टंचाई, ग्रामस्थांची शेती, उत्पन्न, पीकपाणी, कोण-कोण शासकीय योजनांपासून वंचित याबाबी जाणून घेतल्या. 

जवळपास ३० घरांतील ग्रामस्थांसोबत चर्चा केल्यानंतर मथुराबाई जगताप यांचे घर गाठले. साधारण ५५ वर्षांच्या या बाई. त्या शेतावर कामाला जात असत. दररोजची मजुरी १०० रुपये त्यांना मिळते. मात्र, दुष्काळामुळे आता शेतात कुठलेच पीक नाही. त्यामुळे कुठलेच कामही नाही. त्या म्हणाल्या की, ‘काय सांगू ताई, औंदा लईच तरास हाय बगा दुष्काळाचा... हाताला कायबी काम उरलं न्हाई... नुसतं करा, खा अन् घरात बसा... पाण्याचीबी लई वानवा हाय... आमाला प्यायचं पाणीबी लई लांबून आणावं लागतया... टँकर येतं; पण त्याला लई गर्दी राहतीया... जनावरांचबी लई अवघड झालंय... आमाला कितीतरी जनावरं दुष्काळापायी विकून टाकावी लागली... त्यांना तरी पानी कुठलं द्यायचं हो आमी? ताई, तुमी येऊन बगा, किती खारं पाणी हाय ते... कसं पिनार वं... कु नीबी पिऊ शकणार नाय... कवा ह्ये एकदाचे चार महिने जातेत असं झालंय बगा... आतापतूर कदीबी नाय बघितला असा दुष्काळ... कुणी लग्नाला चला म्हनलं, तर हातात एक रुपयाबी नाय बगा...’ मथुराबार्इंनी स्वत:च्या अनुभवातून अख्ख्या मराठवाड्यातील दुष्काळाची भीषणता सांगितली.

निवडून कुनीबी आला, तर फरक नाई पडतलोकसभा निवडणुकांबाबत त्या म्हणाल्या की, ‘ताई, निवडून कुनीबी येऊ... आमाला गरिबाला काय त्याचा फायदा? श्रीमंत लोक खिसे भरून गरम करू लागले... गरिबाला काय हाय त्याचं? आमाला काहीबी म्हटले की आमी निगतो... पैशे देणं-घेणं सगळंच एकदम आलबेल राहतंय बगा... आता काय सांगणार अजून? कुनीबी निवडून आलं तरीबी आमच्यासाठी कोन काम करणार? आमाला दुष्काळाच्या झळा बसतायेत. एवढं मातर खरं...’ 

पाण्याचा अभाव : भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत महाराष्ट्राने अनेकदा दुष्काळ पाहिला आहे; पण यावर्षीच्या दुष्काळाने कहर केला आहे. पिण्याचे पाणी आणि सांडपाण्याचा अभाव. जागोजागी जनावरांना चारा छावणीत नेऊन ठेवण्याची वेळ. ग्रामीण भागात रोजगाराचा अभाव व त्यामुळे जवळच्या शहरांकडे ग्रामस्थांची होणारी वाटचाल, असे यंदाच्या दुष्काळाचे चित्र दिसून येत आहे. 

अडचणींची वाट : १९७२ ला असाच मोठा दुष्काळ पडला होता. पाण्याचे दुर्भिक्ष, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न, टँकरचे वाढते प्रमाण, शेतात कुठलेही पीक नाही, शेतकऱ्यांच्या हाताला काम नाही, अपुरी मजुरी, स्थलांतरितांचा प्रश्न, शासकीय योजनांपासून वंचित, पीकविम्याचा मोबदला नाही, अशा सर्व अडचणींमधून शेतकरी आपला मार्ग काढत आहेत. काही ग्रामस्थांनी तर अपुऱ्या पैशांअभावी सोन्याचे दागिनेदेखील गहाण ठेवले आहेत. मायबाप सरकारपर्यंत हे कधी पोहोचणार?

टॅग्स :droughtदुष्काळAurangabadऔरंगाबादWaterपाणी