शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच मदत जमा होणार : मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 19:29 IST

पंतप्रधानांना भेटलो असून लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा केली जाईल

औरंगाबाद : राज्यातील अनेक तालुक्यात दुष्काळ परिस्थिती आहे. या काळात सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून पिण्याचे पाणी पुरविणे, चारा छावण्या सुरु करणे, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी, यासाठी मी पंतप्रधानांना भेटलो असून लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फुलंब्री येथील कार्यक्रमात दिली.

फुलंब्री येथे बारा कोटी रुपये खर्चाच्या प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण त्यांच्या हस्ते आज दुपारी करण्यात आले. याशिवाय शासकीय विश्रामगृह, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय, फुलंब्री पोलीस ठाण्याची इमारत, कान्होरी रस्त्यावरील दोन पुलांचे उद्घाटनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

मुख्यमंत्री फडणवीस पुढे बोलतांना म्हणाले; राज्य सरकारने सेवा हक्क नियम लागू केला. यात संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आलेली आहे. यात राज्यभरातून ६ कोटी लोकांचे अर्ज प्राप्त झाले असून यातील ९८ टक्के अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. उर्वरित दोन टक्के अर्जावर ज्या अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी निभावली नाही, त्यांना शिक्षा भोगावी लागेल, असेही त्यांनी सांगितले. 

हरिभाऊ बागडे यांनी प्रास्ताविकात ग्रामीण भागात करण्यात आलेल्या विविध विकास कामांची माहिती दिली. येणाऱ्या काळात आणखी विविध विकास कामांचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आले असून त्याला लवकरच मंजुरी मिळेल, असे सांगितले. 

कार्यक्रमास भाजपचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, माजी मंत्री डॉ. नामदेवराव गाडेकर, जि.प. अध्यक्षा देवयानी डोणगावकर, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह, जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण, तहसीलदार संगीता चव्हाण,जि.प. सदस्य शिवाजीराव पाथ्रीकर, जितेंद्र जैस्वाल, अनुराधा चव्हाण, सभापती सर्जेराव मेटे, नगराध्यक्ष सुहास शिरसाठ, उपनगराध्यक्ष इंदूबाई मिसाळ, डॉ. सारंग गाडेकर, कैलास गव्हाड, सोमीनाथ कोलते, नरेंद्र देशमुख, गजानन नागरे, जफर चिस्ती, योगेश मिसाळ, मयूर कोलते, बाळासाहेब तांदळे, राजेंद्र डकले, रोशन अवसरमल, अरुण वाहाटुळे, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीAurangabadऔरंगाबादdroughtदुष्काळHaribhau Bagadeहरिभाऊ बागडेraosaheb danveरावसाहेब दानवे