शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

पाणी प्रश्नावरून मराठवाड्याचा चोहोबाजूंनी कोंडीचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 18:35 IST

मराठवाड्याची चोहोबाजूंनी कोंडी करण्याचा प्रयत्न शासकीय आणि राजकीय पातळीवर सुरू आहे.

औरंगाबाद : मराठवाड्याची चोहोबाजूंनी कोंडी करण्याचा प्रयत्न शासकीय आणि राजकीय पातळीवर सुरू आहे. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाला रेखांकन मंजुरीसाठी २५०० कोटींच्या अनुदानाची गरज आहे. ते अनुदान आजवर शासन देत नाही, तर दुसरीकडे समन्यायी पाणी वाटपाचा विचार होत नाही. त्यामुळे मराठवाड्याचे मोठे नुकसान होत आहे.

लाभक्षेत्राच्या रेखांकनाआधारे ६५ टक्क्यांवर साठा मिळत नाही. जायकवाडीला १६.५ टीएमसी हवे होते; परंतु १०.५ टीएमसी देण्याबाबत विचार सुरू आहे. जायकवाडीवरील धरणांचा पाणी वापर ९८ टक्के होतो आहे, तर जायकवाडीचा ६५ टक्क्यांवर होणार आहे. असे असताना ६.५ टीएमसी पाणी स्वत:कडे ठेवूनही उर्वरित पाणी देण्यास राजकीय विरोध होतो आहे. लाभक्षेत्राचे रेखांकन अनुदानाअभावी थांबले आहे. रेखांकनाच्या कामाला शासन अनुदान देत नाही. दुसरीकडे पाणी सोडायचे नाही. अशा पद्धतीने राजकारण करून मराठवाड्याची चोहोबाजूंनी कोंडी करण्याचा प्रयत्न होतो आहे काय, असा प्रश्न आहे. 

समान पाणी वाटप होणे गरजेचे आहे. रेखांकनामुळे भुर्दंड बसतो आहे. रेखांकनासाठी महामंडळ पैसे मागून थकले आहे. लाभक्षेत्राच्या रेखांकन कायद्याप्रमाणे ‘कमांड’ परिसरात पाणी वापर संस्था निर्माण करून प्रकल्प संस्थेला हस्तांतरित करायच्या. याचा अर्थ शासन पाणी देऊ शकत नाही असा नाही. नवीन कायद्यानुसार हे सर्व प्रकल्प लाभार्थ्यांना हस्तांतरित करायचे, या कामाला वेळ लागेल. कालवा दुरुस्ती करणे, शेतापर्यंत पाणी देण्याची व्यवस्था करणे, पाणी वापर संस्थांची हद्द ठरविण्यासाठी अनुदानाची गरज आहे. १५ ते २० शेतकऱ्यांच्या गटाची एक संस्था ठरते. काही ठिकाणी कागदोपत्रीच हे काम चालते, तर काही ठिकाणी संस्था आहेत. महामंडळाने यासाठी अनुदान मागितले आहे; परंतु ते न दिल्यामुळे रेखांकन अर्धवट पडले आहे. त्यामुळे जायकवाडीला ६५ टक्क्यांवर साठा मागता येत नाही. परिणामी आज सहा टीएमसी पाणी मागू शकत नाही. कारण जायकवाडी ६५ टक्क्यांवर जाते. 

४ टीएमसीचे नुकसान होणार

१६.५ टीएमसी कायद्यानुसार पाणी मिळावे. ६ टीएमसी मिळणार नाही, कारण ६५ टक्क्यांवर जायकवाडीचा वापर होतो. पाणी सोडण्याचा निर्णय पावसाळ्यात घेतला असता, तर पाणी जास्त मिळाले असते, आता ४ टीएमसी कन्वहेन्स लॉसेसची (प्रवाह गळती) शक्यता आहे. १०.५ टीएमसी सोडले तरी ४ टीएमसी लॉसेसमध्ये जाऊ शकते. दबाव आणि दडपणाच्या राजकारणामुळे हा सगळा प्रकार सुरू असल्याच्या प्रतिक्रिया जलतज्ज्ञांतून उमटत आहेत.

टॅग्स :droughtदुष्काळMarathwadaमराठवाडाWaterपाणीJayakwadi Damजायकवाडी धरणState Governmentराज्य सरकार