शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

ड्रेनेजच्या चेंबरमधून घुसविली पिण्याच्या पाण्याची लाईन, पाणी कसे मिळणार शुद्ध ?

By साहेबराव हिवराळे | Published: April 18, 2024 3:53 PM

एक दिवस एक वसाहत: लायन्स क्लब कॉलनी, कासलीवाल पूर्व, दत्तनगर, सद्गुरू सोसायटी, शोभानगर, श्री गणेशा, रॉयल पार्क, विमान नगरात पाण्याचा प्रश्न गंभीर

छत्रपती संभाजीनगर : ड्रेनेज चेंबरमधून पाण्याची लाईन घुसविली असल्याने सुरुवातीची दहा ते पंधरा मिनिटे पाणी वाया जाऊ द्यावे लागते. त्यानंतर पाणी भरावे लागते. जालना रोडलगत असलेला लायन्स क्लब कॉलनी, कासलीवाल पूर्व, दत्तनगर, सद्गुरू सोसायटी, शोभानगर, श्री गणेशा, रॉयल पार्क, विमाननगर परिसर गजबजलेला असला तरी येथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे.

कुठे रस्ते अपूर्ण तर कुठे पथदिव्यांची कमतरता आहे. परिसर जलदगतीने विस्तारत असून महानगरपालिकेकडे कर अदा करूनही सुविधा देण्याकडे कानाडोळा केला जात आहे. उन्हाळ्यातील पाणीटंचाईला तोंड देण्यासाठी लोकप्रतिनिधीने दिलेले हातपंप किरकोळ दुरुस्तीअभावी बंद आहेत. घंटागाडी चालकाने दांडी मारल्यास प्रवेशद्वारावरच दुर्गंधीचा त्रास स्थानिकांना सहन करावा लागतो. कारण तेथे कचरा जमा केलेला असतो. ड्रेनेेजच्या जुन्याच लाईन असल्याने चोकअप होण्याचे प्रकारही वाढलेले आहेत. जालना रोड ओलांडून जाताना किंवा मॉर्निंग वॉक करणाऱ्यांना धोका असून लोखंडी जाळ्यांमुळे वाहनाचा अंदाज येत नाही, तेव्हा रस्ता ओलांडणे धोकादायक ठरते.

रेशन दुकान हवेरेशन दुकान नसल्याने चिकलठाणा गावात जावे लागते. चिकलठाणा येथे रेशन दुकानात जाऊन शासकीय योजनेचा लाभ घ्यावा लागतो. अनेकदा उशीर झाल्यास तो मिळत नाही. शासनाने या परिसरासाठी नवीन दुकान दिले पाहिजे.- शेख मतीन, रहिवासी

आरोग्याची समस्याघाण पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे. याविषयी मनपा आयुक्तांकडे अनेकदा तक्रारी करूनही काम मार्गी लागले नाही. त्वरित पाणी व ड्रेनेजलाईन वेगळी करावी. लायन्स क्लब कॉलनी, कासलीवाल पूर्व दत्तनगर, सद्गुरू सोसायटी श्री गणेशा रॉयल पार्क विमाननगरात दूषित पाण्याची समस्या सोडवावी.- सुरेश पवार, रहिवासी

बालवाडी, अंगणवाडी हवीमनपाने बालवाडी, अंगणवाडी व्यवस्था केलेली नाही. सर्वसामान्य नागरिकांना खासगी शाळा परवडत नाही. नाईलाजास्तव कामगार व मध्यमवर्गीयांना मुलांना लांबच्या शाळेत टाकावे लागते. दूरवर ने-आण करणे पालकांसाठी त्रासदायक ठरते.- शेख कलीम, रहिवासी

एकाच खांबावरून जोडण्या किती?शोभानगरातील नागरिकांना प्रशस्त रस्ता म्हाडापासून सुरू असला तरी इतरत्र रस्ता बंद करण्यात आला आहे. विजेचा एकच खांब असून स्थानिक नागरिकांना वीज जोडणी घेताना लाकडी खांबाचा टेकू द्यावा लागतो. सुरळीतपणे वीज मिळावी यासाठी तिन्ही गल्ल्यांत विजेचे खांब टाकून द्यावेत. नाईलाजाने एकाच खांबावरून धोकादायक जोडणी करावी लागते.- संजय दुसाने, रहिवासी

टॅग्स :WaterपाणीAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका