शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठ ग्रंथालय बनले शाश्वत ज्ञान स्त्रोत केंद्र; स्थापनेपासून ६,३१० संशोधकांनी मिळवली पीएचडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2021 19:29 IST

Dr. Babasaheb Ambedkar Marathvada University ज्ञान स्त्रोत केंद्र हे विद्यापीठाचे मुख्य वाचनालय असून १९५८ मध्ये स्थापन विद्यापीठ ग्रंथालय आजही लाखो पुस्तकांमुळे समृद्ध आहे.

औरंगाबाद : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या (Dr. Babasaheb Ambedkar Marathvada University) स्थापनेपासून ६ हजार ३१० संशोधकांनी संशोधन करून पीएच.डी.ची पदवी मिळवली. या संशोधनाचे डिजिटलायझेशन करून त्याचे संवर्धन विद्यापीठ ग्रंथालय करत आहे. हार्डकाॅपीपासून सीडी-डीव्हीडी असा झालेला प्रवास आता ऑनलाइनपर्यंत येऊन थांबला आहे. हे संशोधन संशोधक, अभ्यासकांसाठी संदर्भासाठी उपलब्ध करून देताना वाड्मयचाैर्यालाही बऱ्यापैकी चाप लागला आहे.

ज्ञान स्त्रोत केंद्र हे विद्यापीठाचे मुख्य वाचनालय असून १९५८ मध्ये स्थापन विद्यापीठ ग्रंथालय आजही लाखो पुस्तकांमुळे समृद्ध आहे. या ग्रंथालयातील डिजिटलायझेशन राज्यातच नव्हे तर देशातही एक पाऊल पुढे आहे. संशोधक विद्यार्थ्यांना सीडी, डीव्हीडी, प्रबंध सादर करून ग्रंथालय प्रमाणपत्र घेणे अनिवार्य करणारी देशातील पहिली लायब्ररी असल्याचे ज्ञान स्त्रोत केंद्राचे संचालक डाॅ. धर्मराज वीर म्हणाले. आजपर्यंत झालेले प्रत्येक संशोधन ऑनलाइन उपलब्ध आहे. २०१२-१३ मध्ये तत्कालीन कुलगुरू डाॅ. विजय पांढरीपांडे यांच्या काळात सर्व प्रबंधांचे स्कॅनिंग करून डिजिटलायझेशन झाले.

मराठी- हिंदीला चोरी तपासण्याची प्रतीक्षावाङ्मयचौर्य शोधण्यासाठी युजीसीकडून मिळालेल्या साॅफ्टवेअरच्या वापरामुळे ‘कॉपी’ मारून आलेले प्रबंध परत केले जातात. योग्य दुरुस्तीनंतरच ते पुन्हा सादर होतात. पुन्हा सॉफ्टवेअरद्वारे तपासणी करूनच ते स्वीकृत केले जातात. यात मराठी आणि हिंदी भाषेतील तपासणी होऊ शकत नसल्याने त्यासाठी नव्या साॅफ्टवेअरची मागणी केलेली आहे. तीही लवकरच पूर्ण होईल.

सीडी-डीव्हीडी लायब्ररीयूजीसीच्या निकषांप्रमाणे आणि शोधप्रबंधाच्या साच्यातच संशोधकांना प्रबंध तयार करून सीडी डीव्हीडीत जमा करावा लागतो. त्यासाठी ग्रंथालयात स्वतंत्र सीडी डीव्हीडी लायब्ररी आहे. संदर्भानुसार त्या एका क्लिकवर त्या यंत्रातून बाहेर येतात, असे वीर म्हणाले.

सर्वात पहिला प्रबंध रसायनशास्त्र विषयातकमलाकर आनंद ठाकर यांनी रसायनशास्त्र विषयात स्टडीज् इन ऑक्सिजन हेट्रोसायकलिक्स हा प्रबंध जून १९६२ मध्ये ग्रंथालयात सादर केला. तो १५५ पानांचा टंकलिखित प्रबंध आहे. तेव्हापासून आजपर्यंत ६३१० जणांनी पीएच.डी.चे प्रबंध सादर केले

कोरोना काळात दिले १,७७६ ई प्रमाणपत्र१ जून २०२० ते १५ डिसेंबर २०२१ या कोरोनाचे निर्बंध होते. मात्र या काळात विद्यापीठातील ग्रंथालयात ऑनलाइन ८२१ प्रबंध व ९३५ अंतिम संशोधन आराखडे सादर झाले. त्यांची ऑनलाइन तपासणी करून ई प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती ज्ञान स्त्रोत केंद्राचे संचालक डाॅ. धर्मराज वीर यांनी दिली.

सर्वाधिक संशोधनविषय -संशोधनप्राणीशास्त्र -६९७वनस्पतीशास्त्र -५११रसायनशास्त्र -४९३हिंदी -४४२मराठी -३९९अर्थशास्त्र -३७६इंग्रजी -३७०भौतिकशास्त्र -३१७

सर्वात कमी संशोधनकृषी -१आयुर्वेद -१विदेशी भाषा -१कीटकशास्त्र -१वैद्यकीय जीवशास्त्र -१वैद्यकीय सूक्ष्मजीवशास्त्र -१तत्त्वज्ञान -१स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग -१

 

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducationशिक्षणAurangabadऔरंगाबाद