शहरं
Join us  
Trending Stories
1
वायकर मेहुणे मोबाईल वाद पेटला! आता ठाकरे गटाच्या आमदारावरही गुन्हा दाखल
2
४-४-०-३! वर्ल्ड कप इतिहासातील भारी स्पेल, Lockie Ferguson ने रचला वर्ल्ड रेकॉर्ड, Video 
3
ओबीसी नेते एकवटू लागले! "आरक्षणाला कसा धक्का बसणार नाही हे सांगा"; मुंडे बहीण-भाऊ हाकेंच्या भेटीला
4
Ohh No! सुपर ८ लढतीपूर्वी टीम इंडियाच्या प्रमुख शिलेदाराला दुखापत, वाचा अपडेट्स 
5
Rahul Gandhi: ज्या मतदारसंघाने संकटकाळात आसरा दिला, राहुल गांधी तीच सीट सोडणार; प्रियंका गांधी वायनाड लढणार
6
T20 World Cup 2026 साठी १२ संघ ठरले पात्र, पाकिस्तानलाही मिळाली संधी; पण, कशी?
7
रिल्सच्या नादात तरुणीचा जीव गेला, रिव्हर्समध्ये कार डोंगरावरून दरीत कोसळून भीषण अपघात
8
मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्यानंतर अमित शाह अॅक्टिव्ह, बोलावली उच्चस्तरीय बैठक...
9
"गॅरी, पाकिस्तानसोबत वेळ वाया घालवू नकोस, टीम इंडियाला कोच करण्यासाठी ये!" 
10
६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड
11
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
12
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
13
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
14
सर्वात महाग शहर! १ BHK चं भाडं ४ लाख, हेअरकट ५०००; घरकाम करणाऱ्याला ५० हजार पगार
15
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
16
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
17
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
18
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
19
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
20
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह

'कौतुकाची थाप आयुष्यभर पुरली',बाबासाहेब आंबेडकरांच्या‘ सावलीतली माणसं’ सांगतायत आठवणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 12:18 PM

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti: बाबासाहेबांच्या आठवणी माझ्या मनात आजही ताज्या आहेत

- स. सो. खंडाळकरऔरंगाबाद : महापुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar Jayanti ) यांना नुसतं एकदा पाहिलेली, अनेकदा पाहिलेली, त्यांचा थोडा तरी सहवास लाभलेली माणसं हळूहळू आता दुर्मीळ होत चाललेली आहेत. ‘मिलिंद’मध्ये शिपाई राहिलेले शिवराम जाधव व बाबासाहेबांची दाढी, कटिंग करून शाबासकी मिळवलेले बाबूलाल गारोल, मिलिंद मैदानाची त्याकाळी देखभाल करणारे रज्जाक आपल्यात नाहीत. 

‘मिलिंद’च्या बांधकामाच्या वेळी सुतारकीची कामे करणारे कचरुबाबा कुंजाळे आज वयाच्या १०५ व्या वर्षी ढिंबर गल्लीत आजारी अवस्थेत आहेत. या सर्व मंडळींनी बाबासाहेबांना पाहिले होते. ज्या टेबलावर बाबासाहेब जेवले होते, तो टेबल शिवराम जाधव यांनी सांभाळून ठेवलेला. दाढी, कटिंग चांगली केली म्हणून बक्षिसापोटी दिलेले दहा रुपये गारोल यांनी सांभाळून ठेवलेले. आता ही सारी माणसं काळाच्या पडद्याआड गेली. बोटावर मोजता येतील, अशी काही माणसांशी बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त संवाद साधण्याचा केलेला हा प्रयत्न......

बाबासाहेब माने म्हणतात........आंबेडकर घराण्याचा व वराळे घराण्याचा ऋणानुबंध होता. बळवंतराव वराळे हे माझे मामा. त्यामुळे बाबासाहेबांना पाहण्याचा मला योग आला. पुढे मिलिंद महाविद्यालयात शिकायला आल्यानंतर जेव्हा बाबासाहेब औरंगाबादला येत, तेव्हा मला त्यांना पाहण्याचा योग आला; परंतु मला इंग्रजी चांगले येत नव्हते, म्हणून मी त्यांच्यापुढे जाऊ शकत नव्हतो. कानडी ही माझी मातृभाषा. औरंगाबादला आल्यानंतर मला भाषेची अडचण जाणवू लागली. बाबासाहेब इंग्रजीतून काही विचारतील, या भीतीने मी बाबासाहेबांपुढे जात नसे. धारवाडला एकदा मातोश्री रमाई यांनी मला उचलून घेतले. माझ्या आईला उद्देशून म्हणाल्या, ‘तुझा मुलगा काळा आहे, पण गुटगुटीत आहे.’ १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपुरात बाबासाहेबांनी धम्मदीक्षा घेतली. ‘युगयात्रा’ नाटकाच्या प्रयोगासाठी नाट्यकलावंत म्हणून मी वराळे कुटुंबीयांसमवेत नागपूरला गेलो होतो. धम्मदीक्षेचा तो ऐतिहासिक सोहळा पाहिला. बाबासाहेबांनी पांढरे वस्त्र परिधान केले होते. ते दृष्य आजही माझ्या मन:चक्षूंसमोर जसेच्या तसे उभे राहते. बाबासाहेबांचे हे शेवटचेच दर्शन होते.

अनंत दाशरथे म्हणतात......वयाच्या पंधराव्या वर्षी मला मिलिंद कॅम्पसमध्ये नोकरी लागली होती. बाबासाहेब कधी मुंबईहून तर कधी दिल्लीहून औरंगाबादला ‘मिलिंद’चे बांधकाम पाहण्यासाठी यायचे. सकाळी ते आरामखुर्चीत बसायचे. सोबत माईसाहेबही असायच्या. रुंजाजी भारसाकळे यांच्या खोलीतून बाबासाहेबांची खुर्ची आणून ठेवली जात असे. बाबाबाहेबांची बसण्याची व्यवस्था म. भि. चिटणीस करायचे, तिथे खुर्ची नेऊन ठेवण्याचं काम मी करीत असे. आजही ‘मिलिंद’च्या वस्तूसंग्रहालयात ही खुर्ची आहे. मला हे काम खूप विशेष वाटत होते. त्यांच्याजवळ उभे राहण्याची मला संधी मिळत होती. १९५५ नंतर माझी बाबासाहेबांची भेट झाली नाही; मात्र पुढे तिथेच काम करण्याची संधी मिळाली. आज मी ८२ वर्षांचा आहे. बाबासाहेबांच्या आठवणी माझ्या मनात ताज्या आहेत, त्या सर्वांसोबत ‘शेअर’ करीत असतो.

प्र. ज. निकम गुरुजी सांगतात....बाबासाहेब जाण्यापूर्वीची ही गोष्ट आहे. मी मिलिंद मल्टीपर्पज हायस्कूलमध्ये नववीच्या वर्गात शिकत होतो. टीचर्स डे होता. मुलंच शिक्षक बनून वर्गावर जाऊन शिकवीत असत. मी ज्या वर्गात शिकत होतो, त्याच वर्गावर मी गणिताचा शिक्षक म्हणून शिकवीत होतो. मी शिकविण्यात मग्न होतो आणि व्हीलचेअरवर बाबासाहेब वर्गात आले. माझं शिकवणं पाहून बाबासाहेब उद्गारले, अरे हा तर पंतोजीसारखा शिकवतोय. वर्गातून बाबासाहेब गेल्यानंतर माझ्या वर्गमित्रांनी माझं अभिनंदन करीत सांगितलं, हा तर पंतोजीसारखा शिकवतोय, असं बाबासाहेब म्हणत होते. तुझं कौतुक करीत होते. बाबासाहेबांनी त्याकाळी दिलेली ही कौतुकाची थाप मला आयुष्यभर पुरली. पुढे मी गणिताचा शिक्षक म्हणूनच मी नावारूपास आलो. गणित हा माझ्या आवडीचा विषय राहिला. सामाजिक कार्यात बाबासाहेब हेच माझे प्रेरणास्थान राहिले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर