योजनांवर किती पैसे खर्च केले, यावर त्यांचे मुल्यमान करु नका : हरिभाऊ बागडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 19:24 IST2018-09-08T17:53:31+5:302018-09-08T19:24:49+5:30

योजना सत्कारणी लागल्या, यावर योजनांच्या यश- अपयशाचे मोजमाप करावे, असा सल्ला विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी दिला

Do not value them on how much money they spent on the schemes: Haribhau Bagade | योजनांवर किती पैसे खर्च केले, यावर त्यांचे मुल्यमान करु नका : हरिभाऊ बागडे 

योजनांवर किती पैसे खर्च केले, यावर त्यांचे मुल्यमान करु नका : हरिभाऊ बागडे 

औरंगाबाद : आपण योजनांवर किती पैसे खर्च केले, यावर त्या योजनांचे मुल्यमान करु नका, तर हाती घेण्यात आलेल्या किती योजना सत्कारणी लागल्या, यावर योजनांच्या यश- अपयशाचे मोजमाप करावे, असा सल्ला विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आज (शनिवारी) येथे झालेल्या राज्यस्तरीय स्वच्छता अभियान पुरस्कार प्रदान समारंभात अध्यक्षीय भाषणात दिला. 

यावेळी संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात अहमदनगर जिल्ह्यातील हिवरेबाजार ग्रामपंचयातीला राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचे २५ लाख रुपयांचे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.

Web Title: Do not value them on how much money they spent on the schemes: Haribhau Bagade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.