शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

‘एक वेळ जेवण नको; पण पाणी द्या...’;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 15:07 IST

औरंगाबाद महापालिकेला पाझर फुटेना

ठळक मुद्देपाणी टंचाईने नागरिकांचा संताप 

- मुजीब देवणीकर

औरंगाबाद : शहराच्या आसपास असलेल्या १८ खेड्यांचा १९९० मध्ये महापालिकेत समावेश करण्यात आला. मागील ३० वर्षांत महापालिका या खेड्यात राहणाऱ्या नागरिकांना पाणीही देऊ शकत नाही. पाण्याअभावी नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. ‘एक वेळचे जेवण नाही मिळाले तरी चालेल; पण पिण्यासाठी पाणी द्या...’ अशी मागणी त्रस्त नागरिक करीत आहेत. तरीही महापालिकेला पाझर फुटायला तयार नाही. २०० वसाहतींमध्ये शंभर टँकरद्वारे ६०० फेऱ्या दररोज करण्यात येत असल्याचा दावा मनपाकडून करण्यात येतो. हा दावा निव्वळ फोल असल्याचे समोर येत आहे.

भगतसिंगनगरची अवस्था वाळवंटासारखीहर्सूल गावाचा अविभाज्य भाग असलेला परिसर म्हणजे वॉर्ड क्र.२, म्हसोबानगर-भगतसिंगनगर होय. २०१५ मध्ये या भागातील नागरिकांनी मोठ्या आशेने शिवसेनेचे बन्सी जाधव यांना निवडून दिले. जाधव यांनी नागरिकांच्या अपेक्षांवर पाणी फेरले. या भागातील जुन्या आणि नवीन वसाहतींना पाणी देण्यासाठी महापालिकेने जलवाहिन्याच टाकलेल्या नाहीत. १८ ते २० नागरिकांनी एकत्र येऊन ग्रुप बनवून मनपाकडे पैसे भरले. त्यानंतरही महापालिका त्यांना टँकरद्वारे पाणी द्यायला तयार नाही. या भागातील विंधन विहिरींनाही अजिबात पाणी नाही. उन्हाळ्यात तर सर्वच बोअर आटले आहेत. न्यू हायस्कूल, हर्सूलपासून पुढे छत्रपतीनगर, शिवदत्तनगर, हरिसिद्धीनगर, अशोकनगर आदी अनेक नवीन वसाहती निर्माण झाल्या आहेत. या भागातील नागरिकांना दररोज  २० रुपयांचा जार खरेदी करून तहान भागवावी लागत आहे. वापरण्यासाठी खाजगी टँकरवर अवलंबून राहावे लागते.  सारा सिद्धी या सोसायटीत तर १०० घरे आहेत. एका अपार्टमेंटमध्ये जवळपास १६ घरे आहेत. याशिवाय रो-हाऊसेस वेगळी आहेत. पूर्वी मनपा टँकरद्वारे पाणी देत होती. आता नागरिकांना २१ हजार रुपये ड्यू भरा, असा आग्रह प्रशासन करीत आहे. आम्ही पाणी घेतलेले नसतानाही पैसे भरा, असे मनपाचे म्हणणे असल्याचे नागरिकांनी सांगितले.

हर्सूलमध्ये दहा दिवसांनंतर पाणीपुरवठावॉर्ड क्र. १ हर्सूलमधील जुन्या गावात राहणाऱ्या नागरिकांना जायकवाडीचे पाणी मिळते. तब्बल दहा दिवसांनंतर गावात पाणीपुरवठा होतो. दोन वर्षांपूर्वी भाजपचे नगरसेवक पूनम बमणे यांनी जलवाहिनी टाकून घेतली. हर्सूल कारागृहाजवळील टाकीवरून गावाला पाणी मिळते. गावात अनेक नवीन वसाहती तयार झाल्या आहेत. त्या वसाहतींना थेंबभरही पाणी मिळत नाही. फुलेनगर, यासीननगर, फातेमानगर, जहांगीर कॉलनी, हरिसिद्धी माता मंदिर परिसर, डेअरी फार्मच्या पाठीमागील वसाहतींना अजिबात पाणी नाही. पाण्याअभावी नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेने टँकरने प्रत्येक वसाहतीला किमान तीन दिवसांआड पाणी द्यावे, अशी रास्त मागणी नागरिक करीत आहेत. मनपाचे टँकर कुठे येतात आणि कुठे जातात, हेच माहीत नसल्याचे अनेक नागरिकांनी सांगितले. उन्हाळ्यात पाणी जास्त लागते. त्यामुळे जार, खाजगी टँकरवर नागरिकांना घामाचा पैसा खर्च करावा लागतो. महापालिकेच्या पाणीपुरवठ्यावर नागरिक अजिबात समाधानी नाहीत. नागरिकांकडे दुसरा पर्यायही नाही. त्यामुळे जेवढे पाणी मिळत आहे, ते घेणे हाच एक पर्याय आहे. मनपाने पाणीपुरवठ्याच्या वेळाच निश्चित केलेल्या नाहीत. कोणत्या वसाहतीला किती वाजता पाणी येईल याचा नेम नसतो. 

मयूर पार्कच्या काही वसाहती तहानलेल्यामयूर पार्क वॉर्ड क्र. ७ मध्येही पाण्याची परिस्थिती समाधानकारक नाही. ज्या वसाहतींना पाणीपुरवठा होतो, त्यांना कमी दाबाने पाणी देण्यात येते. मारुतीनगर, मयूर  पार्क आदी वसाहतींमध्ये मनपाने जलवाहिन्या टाकल्या आहेत. वॉर्डाच्या बाऊण्ड्रीवर असलेल्या विविध वसाहती आजही तहानलेल्या आहेत. नागरिकांची तहान भागविण्यात उपमहापौर विजय औताडे यांना यश आले नाही. पार्वती कॉलनी व आसपासच्या परिसरात किराणा दुकानांमध्ये पाण्याच्या जारची विक्री होते. नागरिक २० रुपये देऊन दुचाकीवर एक जार घेऊन जातात. रिकामा जार आणून द्यायचा आणि नवीन घेऊन जायचा, अशी पद्धत आहे. पार्वती सोसायटी, शिव कॉलनी येथे जलवाहिन्या टाकलेल्या आहेत; पण पाणी कोठून द्यायचे, असा प्रश्न मनपासमोर आहे. समांतर जलवाहिनीचे वाढीव पाणी आले, तरच नवीन जलवाहिन्यांना जोडणी देण्यात येईल, अशी भूमिका मनपाने घेतली आहे. पाण्यासाठी आणखी किती वर्षे वाट पाहावी, असा संतापजनक प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. तहानलेल्या वसाहतींना महापालिका टँकरनेही पाणी देण्यास तयार नाही. मयूर पार्कच्या ज्या वसाहतींना मनपाकडून पाणीपुरवठा करण्यात येतो त्या वसाहतींमध्ये अनेकदा पाणी आल्यावर वीजपुरवठा खंडित होतो. मोठ्या अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या नागरिकांना पाणीच मिळत नाही. या भागात पाणीपुरवठा कधी चार दिवसांआड, तर कधी सहा दिवसांआड होतो.

वॉर्डातील प्रमुख वसाहती : - मयूर पार्क, आॅडिटर सोसायटी, सिद्धेश्वरनगर, राजे संभाजीनगर, म्हस्केवाडी, प्रथमेश सोसायटी, गुरुदत्तनगर,  सुजाता सोसायटी, नाथनगर आदी. लोकसंख्या - 10701 - हर्सूल गावचा जुना भाग, फुलेनगर, खत्रीनगर, जमनज्योती, यासीननगर, फातेमानगर, जहांगीर कॉलनी.लोकसंख्या- ११,११७- भगतसिंगनगर, म्हसोबानगर, हर्सूल गाव, बेरीबागचा काही भाग, साफल्यनगर, घृष्णेश्वर कॉलनी. लोकसंख्या- १०,५३७

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाwater scarcityपाणी टंचाईWaterपाणी