शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

औरंगाबाद जिल्हा परिषदेमध्ये ‘समाजकल्याण’च्या निधी वाटपात गोंधळ; जिल्हाधिकार्‍यांनी केले निधीचे पुनर्नियोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2017 16:48 IST

निधी वाटप करताना झालेली गडबड वेळीच लक्षात आल्यामुळे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी निधीचे पुनर्नियोजन करून दलित वस्ती सुधार योजनेसाठी ३० कोटी आणि कृषी विभागामार्फत विहिरींच्या योजनेसाठी १२ कोटी रुपयांचा निधी जिल्हा परिषदेकडे वर्ग केला. 

ठळक मुद्देनिधी वाटपातील या गोंधळामुळे जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण व कृषी विभागातील अधिकार्‍यांमध्ये काही काळ संभ्रम निर्माण झाला होता. ही बाब मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या निदर्शनास आणून दिली जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी स्वत:च्या अधिकारात समाजकल्याण विभागाकडून प्राप्त निधीचे पुनर्नियोजन केले.

औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणार्‍या दलित वस्ती सुधार योजनेसाठी ४२ कोटी आणि कृषी विभागामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत विहिरींसाठी अवघे १० लाख रुपयांचे अनुदान मंजूर झाले होते. निधी वाटप करताना झालेली गडबड वेळीच लक्षात आल्यामुळे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी निधीचे पुनर्नियोजन करून दलित वस्ती सुधार योजनेसाठी ३० कोटी आणि कृषी विभागामार्फत विहिरींच्या योजनेसाठी १२ कोटी रुपयांचा निधी जिल्हा परिषदेकडे वर्ग केला. 

निधी वाटपातील या गोंधळामुळे जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण व कृषी विभागातील अधिकार्‍यांमध्ये काही काळ संभ्रम निर्माण झाला होता. ही बाब मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी स्वत:च्या अधिकारात समाजकल्याण विभागाकडून प्राप्त निधीचे पुनर्नियोजन केले.

जि.प.च्या समाजकल्याण विभागामार्फत दलित वस्ती सुधार योजना व कृषी विभागामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना या दोन्ही योजना प्राधान्याने अनुसूचित जाती तथा बौद्ध समाजाच्या नागरिकांसाठीच राबविल्या जातात. त्यामुळे राज्याच्या समाजकल्याण विभागामार्फत निधीचे वाटप करताना अनावधानाने दलित वस्ती सुधार योजनेच्या लेखाशीर्षवर कृषी विभागाच्या वाट्याचाही निधी वितरित झाला. तथापि, या आर्थिक वर्षासाठी जि.प.च्या समाजकल्याण विभागाने दलित वस्ती सुधार योजनेसाठी २० कोटी रुपये, तर कृषी विभागाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेसाठी १२ कोटी रुपयांची मागणी केली होती; परंतु चुकीने दलित वस्ती सुधार योजनेसाठी ४२ कोटी आणि कृषी विभागाला अवघे १० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. निधी वितरणात झालेली गडबड अधिकार्‍यांच्या लक्षात आल्यामुळे वेळीच निधीचे पुनर्नियोजन करण्यात आले.

यंदा कृषी विभागाचे ५०० विहिरींचे उद्दिष्टपूर्वी कृषी विभागामार्फत अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांसाठी विशेष घटक योजनेंतर्गत विहिरींसाठी १ लाख रुपयांचे अुनदान दिले जात होते. मागील वर्षांपासून विहिरींसाठी २ लाख ५० हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. ५ जानेवारी २०१७ रोजी या योजनेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, असे नामकरण झाले. यंदा प्राप्त १२ कोटी रुपयांच्या निधीतून सुमारे ५०० लाभार्थ्यांना विहिरींसाठी अनुदान देण्याचे कृषी विभागाचे उद्दिष्ट असल्याचे कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवा यांनी सांगितले. यासाठी २ हजार ६०० आॅनलाईन अर्ज प्राप्त झाले असून, सध्या या अर्जांची छाननी सुरू आहे. गेल्या वर्षी या योजनेसाठी ६ कोटी ९५ लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले होते. त्यातून ३९३ शेतकर्‍यांना विहिरींचा लाभ देण्यात आला.

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदAurangabadऔरंगाबाद