शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
6
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
7
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
8
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
9
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
10
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
11
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
12
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
13
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
14
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
15
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
16
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
17
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
18
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
19
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
20
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
Daily Top 2Weekly Top 5

निधीच्या विनियोगासाठी जि.प.त समन्वय समिती

By admin | Updated: December 18, 2014 00:41 IST

औरंगाबाद :विकास निधीचा विनियोग निर्धारित वेळेत व गुणवत्तापूर्ण कामासाठी व्हावा, याचा पाठपुरावा करणे व त्या अनुषंगाने अधिकाऱ्यांत सुसंवाद साधण्यासाठी ‘समन्वय समिती’ स्थापन करण्यात आली

औरंगाबाद : जिल्हा परिषदेला सरकारकडून प्राप्त विकास निधीचा विनियोग निर्धारित वेळेत व गुणवत्तापूर्ण कामासाठी व्हावा, याचा पाठपुरावा करणे व त्या अनुषंगाने अधिकाऱ्यांत सुसंवाद साधण्यासाठी ‘समन्वय समिती’ स्थापन करण्यात आली आहे. मुख्य वित्त व लेखाधिकारी या समितीच्या अध्यक्षपदी राहणार असून, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता हे सदस्य सचिव राहणार आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी यांनी मंगळवारी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विविध विकासकामांचा आढावा घेतला. ते म्हणाले की आरोग्य, पशुसंवर्धन, शिक्षण, बांधकाम आदी विभागांची सर्व बांधकामे व दुरुस्तीची कामे बांधकाम विभागाला करावी लागतात; परंतु अनेकदा समन्वयाअभावी काही तांत्रिक बाबींकडे दुर्लक्ष होते व तो निधी अखर्चित राहतो. निधी अन्य एखाद्या विभागाचा असतो व तो बांधकाम विभागाला खर्च करावा लागतो; परंतु सदर कामाचे नियोजन व प्रशासकीय मान्यता मिळविण्याचे काम त्या-त्या विभागाचे असते. त्यात दोन्ही विभागांत समन्वय नसला, तर कामांना विलंब होतो व पर्यायाने निधी लॅप्स होण्याचे प्रमाण वाढते. यापुढे जिल्हा परिषदेला मिळणारी पै अन् पै निर्धारित वेळेत खर्च करण्याचा आमचा प्रयत्न राहील. त्यासाठी एक समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीच्या अध्यक्षपदी मुख्य वित्त व लेखाधिकारी उत्तम चव्हाण व सदस्य सचिव म्हणून बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता भरतकुमार बाविस्कर यांची निवड केली आहे. शिक्षणाधिकारी एम.के. देशमुख, पशुसंवर्धन विभागाचे डॉ. एम.एल. साळवे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी.टी. जमादार हे समितीचे सदस्य आहेत. या समितीची बैठक प्रत्येक महिन्याच्या सोमवारी कॅफोच्या दालनात होईल. समितीची पहिली बैठक दि.२२ डिसेंबर रोजी होणार आहे, असे चौधरी यांनी सांगितले.