शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

जलकुंभांची स्थिती विदारक

By admin | Updated: July 8, 2016 23:50 IST

औरंगाबाद : महानगरपालिका आणि वॉटर युटिलिटी कंपनीने शहरातील जलकुंभांच्या देखभाल-दुरुस्ती व स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले आहे.

औरंगाबाद : महानगरपालिका आणि वॉटर युटिलिटी कंपनीने शहरातील जलकुंभांच्या देखभाल-दुरुस्ती व स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले आहे. स्वच्छतेअभावी अनेक टाक्यांमध्ये अक्षरश: कचरा आणि घाण साचली आहे. बऱ्याच टाक्यांची वरची झाकणेच गायब झाली आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी सरळ या टाक्यांमध्ये पडते आहे. या सर्व कारणांमुळे शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती निर्माण झाली आहे. लोकमतने गुरुवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये ही विदारक परिस्थिती समोर आली. संपूर्ण शहराला पिण्यासाठी मनपाच्या वतीने पाणीपुरवठा केला जातो. त्याकरिता स्वतंत्र जलवाहिन्यांद्वारे जायकवाडी धरणातून आधी फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी आणण्यात येते. या ठिकाणी विविध प्रक्रिया करून शुद्ध झालेले पाणी शहरातील जलकुंभांमध्ये पोहोचविले जाते. मात्र यानंतर हे पाणी शुद्धच राहत असल्याचा समज चुकीचा असल्याची बाब गुरुवारी समोर आली. लोकमतच्या प्रतिनिधींनी शहरातील क्रांतीचौक, कोटला कॉलनी, गिरिजादेवी हाऊसिंग सोसायटी, दिल्लीगेट, ज्युबली पार्क, रेल्वेस्टेशन, पुंडलिकनगर, सेव्हन हिल, ज्योतीनगर, शहागंज, सिडको एन- ७ यांसह शहरातील विविध जलकुंभांची पाहणी केली. त्यात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. बहुतेक जलकुंभांवरील लोखंडी झाकण गायब झाले आहेत. त्यामुळे हवेतील धूळ, कचरा तसेच पावसाचे पाणी थेट या जलकुंभात जात आहेत. बऱ्याच ठिकाणी तळाला माती आणि कचरा साचलेला आहे. तर काही ठिकाणी शेवाळही आले आहेत. नियमानुसार जलकुंभांची ठराविकपणे स्वच्छता करणे अपेक्षित आहे. मात्र मनपाच्या वतीने पाणीपुरवठ्याचे काम पाहणाऱ्या वॉटर युटिलिटी कंपनीकडून त्याकडे दुर्लक्ष होत आहे. क्रांतीचौक, कोटला कॉलनी, शहागंज, दिल्लीगेट, ज्युबली पार्क आदी ठिकाणी जलकुंभांवर दर्शविलेली स्वच्छतेची तारीख केव्हाच निघून गेलेली आहे. परंतु त्यानंतरही स्वच्छता झालेली नसल्याचे आढळून आले. फारोळा येथून शहरात शुद्ध पाणी येत असले तरी ते नागरिकांपर्यंत पोहोचताना पुन्हा दूषित होत आहे. त्यामुळे शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती निर्माण झाली आहे. स्वच्छतेच्या तारखा नावालाचप्रत्येक जलकुंभाची सहा महिन्यातून एकदा स्वच्छता होणे अपेक्षित आहे. स्वच्छता कधी केली गेली आणि पुढची स्वच्छता कधी करणार याच्या तारखा जलकुंभावर नोंदविणे आवश्यक असते. परंतु बऱ्याच ठिकाणी जलकुंभांवर या तारखांची नोंदच नसल्याचे आढळून आले, तर काही ठिकाणी नोंदी असल्या तरी स्वच्छता करण्याची तारीख कधीच निघून गेलेली असली तरी अद्याप स्वच्छता झालेली नसल्याचे दिसून आले.