शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

शासननिर्णयाची वाट न पाहता राज्यभरातून पैठणकडे दिंड्यांची कूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 16:29 IST

गतवर्षी कोरोनामुळे अर्ध्या रस्त्यातूनच अनेक दिंड्यांना माघारी परतावे लागले होते.

ठळक मुद्देयात्रेबाबत प्रशासनाच्या निर्णयाकडे लक्ष वारकऱ्यांचे यात्रा रद्द न करण्याचे आवाहन

- संजय जाधवपैठण : नाथषष्ठी यात्रेसंदर्भात प्रशासनाच्या निर्णयाची वाट न पाहता राजभरातील वारकऱ्यांच्या दिंड्यांनी पैठणकडे कूच केली आहे. कोरोनाचे वातावरण निवळले असल्याने प्रशासनाने नाथषष्ठी यात्रा रद्द करू नये, अशी मागणी वारकरी संप्रदायाच्या वतीने करण्यात आली आहे. गतवर्षी कोरोनामुळे अर्ध्या रस्त्यातूनच अनेक दिंड्यांना माघारी परतावे लागले होते.

पैठण येथे नाथषष्ठीच्या निमित्ताने राज्यभरातून वारकरी दिंड्या घेऊन येतात. २ एप्रिल रोजी नाथषष्ठी महोत्सव साजरा होणार आहे. यामुळे राज्यभरातून वारकरी संप्रदायाने पायी दिंड्या घेऊन पैठणकडे प्रस्थान केले आहे. तर काही प्रस्थानाच्या तयारीत आहेत. गतवर्षी शेकडो दिंड्या पैठणच्या सीमेवर येऊन धडकलेल्या असताना कोरोनामुळे सर्वांना परतावे लागले होते. यामुळे प्रथमच ४५० वर्षांची वारीची परंपरा खंडित झाली होती. यंदा मात्र शासन काय निर्णय घेणार याकडे वारकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

कोविडचा प्रभाव आता कमी झालेला असून हळूहळू वातावरण पूर्वपदावर येत असल्याने यंदाच्या नाथषष्ठीला प्रशासनाने मान्यता द्यावी, अशी वारकऱ्यांची मनोमन इच्छा आहे. महिनाभरापासून पैठण नाथषष्ठी यात्रेला जाण्याचे नियोजन सुरू होते. विदर्भ, खान्देश, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक आदी भागांतून नाथषष्ठीसाठी वारकरी पायी दिंड्या घेऊन निघतात. दिंडीचे प्रस्थानस्थळ व पैठणचे अंतर लक्षात घेऊन दिंडी गावातून काढली जाते. काही दिंड्या महिनाभर तर काही दीड महिनाअगोदरच गावातून प्रस्थान करतात. यामुळे प्रशासनाने यात्रेबाबत धोरण निश्चित केल्यास वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही, असे वारकरी संप्रदायाचे म्हणणे आहे.

वारकरी निघाले ; यात्रा रद्द करू नकावारकऱ्यांना गतवर्षी अचानक परत फिरावे लागल्याने मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला होता. पंढरपूर व पैठण वारीचे वारकरी संप्रदायात मोठे महत्त्व असून गतवर्षात वारीची परंपरा खंडित झाल्याने वारकरी दु:खी आहे. यंदा कोरोनाचे वातावरण निवळले आहे. राज्यभरातून वारकरी नाथषष्ठीसाठी पायी दिंड्या घेऊन निघाले आहेत. आता प्रशासनाने नाथषष्ठी यात्रा रद्द करू नये.- ह.भ.प. विठ्ठलशास्री चनघटे, जिल्हाध्यक्ष, अखिल भारतीय वारकरी मंडळ, औरंगाबाद.

यात्रा रद्द केल्यास वारकऱ्यांत रोष निर्माण होईलदेशभरात सर्वकाही सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर वारकरी नाथषष्ठी यात्रेसाठी येणारच आहेत. वारकरी आता काहीएक ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. प्रशासनाने यात्रा रद्द केल्यास वारकरी संप्रदायात मोठा रोष निर्माण होईल.-ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज देशमुख, अध्यक्ष, अखिल भारतीय वारकरी, फडकरी दिंडी समाज संघटना, पंढरपूर.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद