शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
8
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
9
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
10
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
11
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
12
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
13
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
14
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
15
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
16
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
17
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
18
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
19
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
20
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश

शासननिर्णयाची वाट न पाहता राज्यभरातून पैठणकडे दिंड्यांची कूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 16:29 IST

गतवर्षी कोरोनामुळे अर्ध्या रस्त्यातूनच अनेक दिंड्यांना माघारी परतावे लागले होते.

ठळक मुद्देयात्रेबाबत प्रशासनाच्या निर्णयाकडे लक्ष वारकऱ्यांचे यात्रा रद्द न करण्याचे आवाहन

- संजय जाधवपैठण : नाथषष्ठी यात्रेसंदर्भात प्रशासनाच्या निर्णयाची वाट न पाहता राजभरातील वारकऱ्यांच्या दिंड्यांनी पैठणकडे कूच केली आहे. कोरोनाचे वातावरण निवळले असल्याने प्रशासनाने नाथषष्ठी यात्रा रद्द करू नये, अशी मागणी वारकरी संप्रदायाच्या वतीने करण्यात आली आहे. गतवर्षी कोरोनामुळे अर्ध्या रस्त्यातूनच अनेक दिंड्यांना माघारी परतावे लागले होते.

पैठण येथे नाथषष्ठीच्या निमित्ताने राज्यभरातून वारकरी दिंड्या घेऊन येतात. २ एप्रिल रोजी नाथषष्ठी महोत्सव साजरा होणार आहे. यामुळे राज्यभरातून वारकरी संप्रदायाने पायी दिंड्या घेऊन पैठणकडे प्रस्थान केले आहे. तर काही प्रस्थानाच्या तयारीत आहेत. गतवर्षी शेकडो दिंड्या पैठणच्या सीमेवर येऊन धडकलेल्या असताना कोरोनामुळे सर्वांना परतावे लागले होते. यामुळे प्रथमच ४५० वर्षांची वारीची परंपरा खंडित झाली होती. यंदा मात्र शासन काय निर्णय घेणार याकडे वारकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

कोविडचा प्रभाव आता कमी झालेला असून हळूहळू वातावरण पूर्वपदावर येत असल्याने यंदाच्या नाथषष्ठीला प्रशासनाने मान्यता द्यावी, अशी वारकऱ्यांची मनोमन इच्छा आहे. महिनाभरापासून पैठण नाथषष्ठी यात्रेला जाण्याचे नियोजन सुरू होते. विदर्भ, खान्देश, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक आदी भागांतून नाथषष्ठीसाठी वारकरी पायी दिंड्या घेऊन निघतात. दिंडीचे प्रस्थानस्थळ व पैठणचे अंतर लक्षात घेऊन दिंडी गावातून काढली जाते. काही दिंड्या महिनाभर तर काही दीड महिनाअगोदरच गावातून प्रस्थान करतात. यामुळे प्रशासनाने यात्रेबाबत धोरण निश्चित केल्यास वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही, असे वारकरी संप्रदायाचे म्हणणे आहे.

वारकरी निघाले ; यात्रा रद्द करू नकावारकऱ्यांना गतवर्षी अचानक परत फिरावे लागल्याने मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला होता. पंढरपूर व पैठण वारीचे वारकरी संप्रदायात मोठे महत्त्व असून गतवर्षात वारीची परंपरा खंडित झाल्याने वारकरी दु:खी आहे. यंदा कोरोनाचे वातावरण निवळले आहे. राज्यभरातून वारकरी नाथषष्ठीसाठी पायी दिंड्या घेऊन निघाले आहेत. आता प्रशासनाने नाथषष्ठी यात्रा रद्द करू नये.- ह.भ.प. विठ्ठलशास्री चनघटे, जिल्हाध्यक्ष, अखिल भारतीय वारकरी मंडळ, औरंगाबाद.

यात्रा रद्द केल्यास वारकऱ्यांत रोष निर्माण होईलदेशभरात सर्वकाही सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर वारकरी नाथषष्ठी यात्रेसाठी येणारच आहेत. वारकरी आता काहीएक ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. प्रशासनाने यात्रा रद्द केल्यास वारकरी संप्रदायात मोठा रोष निर्माण होईल.-ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज देशमुख, अध्यक्ष, अखिल भारतीय वारकरी, फडकरी दिंडी समाज संघटना, पंढरपूर.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद