शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

शासननिर्णयाची वाट न पाहता राज्यभरातून पैठणकडे दिंड्यांची कूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 16:29 IST

गतवर्षी कोरोनामुळे अर्ध्या रस्त्यातूनच अनेक दिंड्यांना माघारी परतावे लागले होते.

ठळक मुद्देयात्रेबाबत प्रशासनाच्या निर्णयाकडे लक्ष वारकऱ्यांचे यात्रा रद्द न करण्याचे आवाहन

- संजय जाधवपैठण : नाथषष्ठी यात्रेसंदर्भात प्रशासनाच्या निर्णयाची वाट न पाहता राजभरातील वारकऱ्यांच्या दिंड्यांनी पैठणकडे कूच केली आहे. कोरोनाचे वातावरण निवळले असल्याने प्रशासनाने नाथषष्ठी यात्रा रद्द करू नये, अशी मागणी वारकरी संप्रदायाच्या वतीने करण्यात आली आहे. गतवर्षी कोरोनामुळे अर्ध्या रस्त्यातूनच अनेक दिंड्यांना माघारी परतावे लागले होते.

पैठण येथे नाथषष्ठीच्या निमित्ताने राज्यभरातून वारकरी दिंड्या घेऊन येतात. २ एप्रिल रोजी नाथषष्ठी महोत्सव साजरा होणार आहे. यामुळे राज्यभरातून वारकरी संप्रदायाने पायी दिंड्या घेऊन पैठणकडे प्रस्थान केले आहे. तर काही प्रस्थानाच्या तयारीत आहेत. गतवर्षी शेकडो दिंड्या पैठणच्या सीमेवर येऊन धडकलेल्या असताना कोरोनामुळे सर्वांना परतावे लागले होते. यामुळे प्रथमच ४५० वर्षांची वारीची परंपरा खंडित झाली होती. यंदा मात्र शासन काय निर्णय घेणार याकडे वारकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

कोविडचा प्रभाव आता कमी झालेला असून हळूहळू वातावरण पूर्वपदावर येत असल्याने यंदाच्या नाथषष्ठीला प्रशासनाने मान्यता द्यावी, अशी वारकऱ्यांची मनोमन इच्छा आहे. महिनाभरापासून पैठण नाथषष्ठी यात्रेला जाण्याचे नियोजन सुरू होते. विदर्भ, खान्देश, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक आदी भागांतून नाथषष्ठीसाठी वारकरी पायी दिंड्या घेऊन निघतात. दिंडीचे प्रस्थानस्थळ व पैठणचे अंतर लक्षात घेऊन दिंडी गावातून काढली जाते. काही दिंड्या महिनाभर तर काही दीड महिनाअगोदरच गावातून प्रस्थान करतात. यामुळे प्रशासनाने यात्रेबाबत धोरण निश्चित केल्यास वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही, असे वारकरी संप्रदायाचे म्हणणे आहे.

वारकरी निघाले ; यात्रा रद्द करू नकावारकऱ्यांना गतवर्षी अचानक परत फिरावे लागल्याने मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला होता. पंढरपूर व पैठण वारीचे वारकरी संप्रदायात मोठे महत्त्व असून गतवर्षात वारीची परंपरा खंडित झाल्याने वारकरी दु:खी आहे. यंदा कोरोनाचे वातावरण निवळले आहे. राज्यभरातून वारकरी नाथषष्ठीसाठी पायी दिंड्या घेऊन निघाले आहेत. आता प्रशासनाने नाथषष्ठी यात्रा रद्द करू नये.- ह.भ.प. विठ्ठलशास्री चनघटे, जिल्हाध्यक्ष, अखिल भारतीय वारकरी मंडळ, औरंगाबाद.

यात्रा रद्द केल्यास वारकऱ्यांत रोष निर्माण होईलदेशभरात सर्वकाही सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर वारकरी नाथषष्ठी यात्रेसाठी येणारच आहेत. वारकरी आता काहीएक ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. प्रशासनाने यात्रा रद्द केल्यास वारकरी संप्रदायात मोठा रोष निर्माण होईल.-ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज देशमुख, अध्यक्ष, अखिल भारतीय वारकरी, फडकरी दिंडी समाज संघटना, पंढरपूर.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद