शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

हर्सूल तलावातील अवैध वाळू उपशाचा सहा आठवड्यांत निर्णय घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 7:29 PM

हर्सूल तलावातील अवैध वाळू व माती उपशासंदर्भात सहा आठवड्यांत निर्णय घेण्याचा जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देऊन औरंगाबाद खंडपीठाचे न्या. प्रसन्ना वराळे आणि न्या. विभा कंकणवाडी यांनी याचिका निकाली काढली.

औरंगाबाद : हर्सूल तलावातील अवैध वाळू व माती उपशासंदर्भात सहा आठवड्यांत निर्णय घेण्याचा जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देऊन औरंगाबाद खंडपीठाचे न्या. प्रसन्ना वराळे आणि न्या. विभा कंकणवाडी यांनी याचिका निकाली काढली.

सामाजिक कार्यकर्ते सुरेश बकले यांनी या वाळू उपशाविरुद्ध जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांना वारंवार निवेदने दिली. दुष्काळामुळे हर्सूल तलाव आटला आहे. तलावाचा तळ उघडा पडला आहे. अवैध वाळू उत्खनन सुरू असून सुपीक माती वीटभट्ट्यांसाठी वापरण्यात येत आहे.

तलावाची भिंत आणि बांधही कोरण्यात आलेला आहे. त्यामुळे भिंत आणि बांध केव्हाही कोसळू शकतो, असा उल्लेख त्यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात केला आहे. मात्र, त्यावर काहीच कारवाई करण्यात आली नाही. त्या नाराजीने त्यांनी अ‍ॅड. रवींद्र गोरे यांच्यामार्फ त खंडपीठात सदर याचिका दाखल केली. सुनावणीअंती खंडपीठाने जिल्हाधिकाºयांना सहा आठवड्यांत निर्णय घेण्याचा आदेश दिला.

तसेच याविषयीचा निर्णय घेताना संबंधित विभागाकडून अभिलेखे मागवू शकता तसेच संबंधितांना सुनावणीची संधी देऊ शकतात आणि त्यानुसार याचिकाकर्त्याच्या निवेदनावर निर्णय घेऊ शकतात, असेही खंडपीठाने स्पष्ट केले. अ‍ॅड. गोरे यांना अ‍ॅड. नारायण मातकर आणि अ‍ॅड. चंद्रकांत बोडखे यांनी सहकार्य केले.

टॅग्स :sandवाळूAurangabadऔरंगाबादHigh Courtउच्च न्यायालय