शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
3
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
4
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
5
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
6
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
7
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
8
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
9
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
10
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
11
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
12
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
13
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
14
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
15
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
16
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
17
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
18
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
19
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
20
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...

समृद्धीच्या कामात भेगा; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2020 17:06 IST

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग हा मागील सरकारचा सर्वात महत्त्वाकांक्षी असलेला महत्त्वाचा प्रकल्प आहे.

ठळक मुद्देमहामार्गाचे काम काही खाजगी कंपन्यांना देण्यात आले आहे.कोरोना संसर्ग आणि पावसाळ्यामुळे या महामार्गाचे काम संथ गतीनेपावसामुळे कंत्राटदाराने केलेल्या कामाचे पितळ उघडे

- बाबासाहेब धुमाळ 

वैजापूर : वैजापूर तालुक्यातून जात असलेल्या समृद्धी महामार्गाच्या कामात अनेक त्रुटी आढळून येत आहेत. महामार्ग उंच करण्यासाठी कंत्राटदाराने वापरलेली माती व मुरूम पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याने रस्त्यावर मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. याकडे सरकार व संबंधित अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने महामार्गाच्या कामाची गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळत आहे.

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग हा मागील सरकारचा सर्वात महत्त्वाकांक्षी असलेला महत्त्वाचा प्रकल्प आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून २०१८-१९ दरम्यान या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. महामार्गाचे काम काही खाजगी कंपन्यांना देण्यात आले आहे. मात्र, गेल्या चार ते पाच महिन्यांपासून कोरोना संसर्ग आणि पावसाळ्यामुळे या महामार्गाचे काम संथ गतीने सुरू आहे. ठिकठिकाणी पूल, काँक्रिटीकरण, तर कोठे मातीचा भराव टाकण्याचे काम केले जात आहे. वैजापूर तालुक्यातील करंजगाव, बोरदहेगाव, सटाणा, अगरसायगाव, डवाळा, खंबाळा, सुराळा आदी गावांतून हा महामार्ग गेला असून, त्यासाठी एल अँड टी कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे.

बोरदहेगाव शिवारातील जुने पालखेड, दहेगाव व सटाणा या गावांजवळ कंत्राटदाराने माती व मुरमाचा भराव टाकून महामार्गाची उंची सुमारे ६ मीटरपर्यंत वाढवली आहे. त्यावर सिमेंट काँक्रिटीकरण करून येथील काम पूर्णदेखील झाले आहे. मात्र, आता ज्या ठिकाणी पुलाचे काम करण्यात आले आहे त्या पुलाखालील माती आणि मुरमाचा भराव पावसाच्या पाण्याने मोठ्या प्रमाणात वाहून गेला आहे. त्यामुळे या रस्त्याला मोठमोठ्या भेगा पडल्या असून, समृद्धी महामार्गावरील या जागेवर मोठा धोका निर्माण झाला आहे. या गंभीर घटनेकडे एल अँड टी कंपनीचे दुर्लक्ष होत आहे. शिवाय समृद्धी महामार्गाच्या कामावर लक्ष देण्यासाठी असलेले अधिकारीदेखील याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महामार्गाच्या कामासाठी नेमलेल्या कंपन्यांमध्ये काम पूर्ण करण्यासाठी स्पर्धाच सुरू असल्याचे समजते. 

पावसामुळे पितळ पडले उघडेसध्या पावसाळा सुरू असून, पावसाचे पाणी समृद्धी महामार्गाच्या रस्त्यावरून वाहत्या रस्त्याखाली उतरत आहे. त्यामुळे कंत्राटदाराने केलेल्या कामाचे पितळ उघडे पडण्यास सुरुवात झाली आहे. कंत्राटदाराने महामार्ग उंच करण्यासाठी वारलेली माती व मुरूम वाहून जात असल्याने कामाची गुणवत्ता लक्षात येत आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून महामार्ग खचून जाऊ नये याकरिता रस्त्याच्या खाली दोन्ही बाजंूनी दगडाचे संरक्षक पिचिंग करणे गरजेचे होते.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गAurangabadऔरंगाबादState Governmentराज्य सरकार