शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

समृद्धीच्या कामात भेगा; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2020 17:06 IST

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग हा मागील सरकारचा सर्वात महत्त्वाकांक्षी असलेला महत्त्वाचा प्रकल्प आहे.

ठळक मुद्देमहामार्गाचे काम काही खाजगी कंपन्यांना देण्यात आले आहे.कोरोना संसर्ग आणि पावसाळ्यामुळे या महामार्गाचे काम संथ गतीनेपावसामुळे कंत्राटदाराने केलेल्या कामाचे पितळ उघडे

- बाबासाहेब धुमाळ 

वैजापूर : वैजापूर तालुक्यातून जात असलेल्या समृद्धी महामार्गाच्या कामात अनेक त्रुटी आढळून येत आहेत. महामार्ग उंच करण्यासाठी कंत्राटदाराने वापरलेली माती व मुरूम पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याने रस्त्यावर मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. याकडे सरकार व संबंधित अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने महामार्गाच्या कामाची गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळत आहे.

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग हा मागील सरकारचा सर्वात महत्त्वाकांक्षी असलेला महत्त्वाचा प्रकल्प आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून २०१८-१९ दरम्यान या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. महामार्गाचे काम काही खाजगी कंपन्यांना देण्यात आले आहे. मात्र, गेल्या चार ते पाच महिन्यांपासून कोरोना संसर्ग आणि पावसाळ्यामुळे या महामार्गाचे काम संथ गतीने सुरू आहे. ठिकठिकाणी पूल, काँक्रिटीकरण, तर कोठे मातीचा भराव टाकण्याचे काम केले जात आहे. वैजापूर तालुक्यातील करंजगाव, बोरदहेगाव, सटाणा, अगरसायगाव, डवाळा, खंबाळा, सुराळा आदी गावांतून हा महामार्ग गेला असून, त्यासाठी एल अँड टी कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे.

बोरदहेगाव शिवारातील जुने पालखेड, दहेगाव व सटाणा या गावांजवळ कंत्राटदाराने माती व मुरमाचा भराव टाकून महामार्गाची उंची सुमारे ६ मीटरपर्यंत वाढवली आहे. त्यावर सिमेंट काँक्रिटीकरण करून येथील काम पूर्णदेखील झाले आहे. मात्र, आता ज्या ठिकाणी पुलाचे काम करण्यात आले आहे त्या पुलाखालील माती आणि मुरमाचा भराव पावसाच्या पाण्याने मोठ्या प्रमाणात वाहून गेला आहे. त्यामुळे या रस्त्याला मोठमोठ्या भेगा पडल्या असून, समृद्धी महामार्गावरील या जागेवर मोठा धोका निर्माण झाला आहे. या गंभीर घटनेकडे एल अँड टी कंपनीचे दुर्लक्ष होत आहे. शिवाय समृद्धी महामार्गाच्या कामावर लक्ष देण्यासाठी असलेले अधिकारीदेखील याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महामार्गाच्या कामासाठी नेमलेल्या कंपन्यांमध्ये काम पूर्ण करण्यासाठी स्पर्धाच सुरू असल्याचे समजते. 

पावसामुळे पितळ पडले उघडेसध्या पावसाळा सुरू असून, पावसाचे पाणी समृद्धी महामार्गाच्या रस्त्यावरून वाहत्या रस्त्याखाली उतरत आहे. त्यामुळे कंत्राटदाराने केलेल्या कामाचे पितळ उघडे पडण्यास सुरुवात झाली आहे. कंत्राटदाराने महामार्ग उंच करण्यासाठी वारलेली माती व मुरूम वाहून जात असल्याने कामाची गुणवत्ता लक्षात येत आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून महामार्ग खचून जाऊ नये याकरिता रस्त्याच्या खाली दोन्ही बाजंूनी दगडाचे संरक्षक पिचिंग करणे गरजेचे होते.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गAurangabadऔरंगाबादState Governmentराज्य सरकार